शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
2
Delhi Blast : देशभरात हायअलर्ट! दिल्ली कार स्फोटाचा तपास NIA करणार; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
घोसाळकरांना धक्का, पेडणेकरांचा मार्ग मोकळा; मुंबई मनपा आरक्षण सोडत जाहीर! जाणून घ्या संपूर्ण यादी...
4
Delhi Red Fort Blast : स्फोट प्रकरणात पुलवामा कनेक्शन समोर; डॉ. उमरचा जवळचा मित्र डॉ. सज्जाद अहमद याला अटक
5
दिल्ली लाल किल्ला कार स्फोट: फरिदाबादमधून अटक केलेल्या डॉ. शाहीन शाहिदचा पहिला फोटो समोर
6
₹२००० नं महाग झालं सोनं, चांदीच्या दरातही ३ हजारांपेक्षा अधिक वाढ; अजून किती वाढ होणार?
7
प्रेयसीला गोळी मारून प्रियकरानं स्वत:वरही झाडली गोळी; ७ वर्षात प्रेमात अचानक दुरावा का आला?
8
'या' सरकारी App द्वारे ऑनलाईन रेशन कार्डसाठी अर्ज करता येणार! 'या' राज्यांमध्ये सुविधा सुरू
9
यूट्यूबरच्या कॅमेऱ्यात कैद झाली दिल्ली स्फोटाची ‘लाइव्ह’ घटना, पाहा धक्कादायक व्हिडिओ...
10
Video - पाकिस्तानच्या इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर कारमध्ये भीषण स्फोट; १२ जणांचा मृत्यू, २५ गंभीर जखमी
11
दिल्ली स्फोट: कोणालाही अशीच विकू नका तुमची जुनी कार; खरेदी-विक्री करताना 'हे' तीन नियम पाळाच!
12
दिल्ली लाल किल्ला कार स्फोटानंतर हाफिज सईदचं 'लोकेशन' चर्चेत; कुठे लपून बसलाय?
13
Warren Buffett News: “मी आता शांत होत चाललोय,” ६ दशकांची परंपरा थांबणार; वॅारन बफेंनी सोडलं ‘हे’ काम
14
Delhi Blast : कार स्फोटाने दिल्ली हादरली! मृतांचा आकडा वाढला; १२ जणांनी गमावला जीव, २५ जखमी
15
Vastu Tips: बुधवारी लावलेली 'ही' रोपं ठरतात लक्ष्मीप्राप्तीचा आणि अपयशातून मुक्तीचा राजमार्ग!
16
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
17
दिल्ली ब्लास्ट: 'माझ्याजवळ शरिराचा तुकडा पडला; रात्रभर झोप लागली नाही', प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती
18
Shreyas Iyer Injury Update: अय्यरबाबत जोखीम नको! वनडे मालिकेपूर्वी तब्येतीसंदर्भात मोठा खुलासा
19
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
20
TATA Stock Listing: आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग

भातसा प्रकल्पाचे सिंचनाचा उद्देश केराच्या टोपलीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:41 IST

शेणवा : भातसा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात नागरीकरण, औद्याेगिकीकरणाचा वेग वाढला आहे. तसेच मुंबई, ठाणे, भिवंडी क्षेत्रातील बिगर सिंचन पाण्याच्या वाढत्या ...

शेणवा : भातसा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात नागरीकरण, औद्याेगिकीकरणाचा वेग वाढला आहे. तसेच मुंबई, ठाणे, भिवंडी क्षेत्रातील बिगर सिंचन पाण्याच्या वाढत्या आरक्षणामुळे जिल्ह्यातील शहापूर, कल्याण व भिवंडी या तालुक्यांसाठी आरक्षित असलेले सिंचनाचे पाणी उपलब्ध होत नल्याने येथील डावा-उजवा कालवा तिराची लांबी सीमित करण्याच्या शासनाच्या निर्णयाने शेतकऱ्यांना सिंचनाच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागणार आहे. कालव्यासाठी लागणारी वनविभागाची जमीन दहा वर्षांनंतरही संपादित न झाल्याने कालव्याचे काम रखडले आहे. भातसा प्रकल्पाचे सिंचनाचे उद्देश फोल ठरून उद्देशालाच केराची टोपली दाखवली आहे.

मुंबई महापालिकेची पाण्याची गरज विचारात घेता व पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाने १९६१ मध्ये साजिवली गावाजवळ असलेल्या भातसा व चोरणा नदीच्या संगमावर भातसा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. या प्रकल्पातून २३ हजार हेक्टर सिंचन क्षेत्रापैकी सहा हजार ३२० हेक्टर क्षेत्र डावा तीर कालव्यावर व १६ हजार ६८० हेक्टर क्षेत्र उजवा कालव्यात सिंचन करणे प्रस्तावित होते. मुंबई महापालिकेस पिण्यासाठी पाणी देणे, शहापूर, भिवंडी, कल्याण तालुक्यातील डावा कालवाअंतर्गत येणाऱ्या व उजवा कालवाअंतर्गत येणाऱ्या गावातील २३ हजार हेक्टर क्षेत्रात सिंचनासाठी लाभ देणे हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

कालव्यांसाठी लागणाऱ्या वनजमिनीची मान्यता केंद्रीय पर्यावरण व वनविभागाने २००९ ला दिली. त्यासाठी २०१३ ला वनविभागाला ४६ कोटी अदा केले आहेत. त्यानंतर वेळोवेळी केंद्रीय पर्यावरण विभाग व वनविभागास अंतिम मान्यतेसाठीचा प्रस्ताव सादर करूनही अंतिम मंजुरी मिळत नसल्याने कालव्यांची कामे रखडली. मुंबईची तहान भागविण्यासाठी पाणी मुंबईला देण्यात येणार असल्याने ६७ किमी लांबीच्या उजवा कालव्याची १३ किमी लांबी शासनाने कमी केली. तर ५४ किमी लांबीच्या डावा तीर कालव्याची ३७ किमी लांबी कमी केली आहे. यामुळे सिंचनाचे क्षेत्र अवघे ९ हजार १९० हेक्टर क्षेत्रावर आले आहे. शासनाच्या ११ सप्टेंबर २०१९ च्या निर्णयानुसार नाशिक येथील मुख्य अभियंता, नियोजन व जलविज्ञान अधिकाऱ्यांनी भातसा धरणातील पाणीसाठ्याबाबत पाहणी केल्यानंतर बिगर सिंचन वजा जाता पाणी उपलब्ध होत असल्याची खातरजमा केल्यानंतरच शासनाच्या परवानगीने कालव्यांची कामे सुरू करावीत, असे आदेश दिल्याने शेतकरी संभ्रमात पडले आहेत.

----

मुंबई महापालिकेच्या हद्दीत पिण्याच्या पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी भातसा प्रकल्पाच्या नियोजनामध्ये सिंचनासाठी आरक्षित ठेवलेले पाणी मुंबईसाठी देण्यात येत असल्याने डावा -उजवा कालवा सीमित करण्यात आला आहे.

- आनंद नारायण उदमले, उपविभागीय अभियंता, भातसा धरण व्यवस्थापन विभाग

....

डावा-उजवा कालवा सीमित करण्याच्या धोरणाविरोधात शासनदरबारी आवाज उठवून कालव्यांची लांबी वाढविण्यासाठी मागणी करणार आहे. कालव्यासाठी शासनाकडे साठ कोटींची मागणी केली आहे.

- दौलत दरोडा, आमदार, शहापूर

-----

साजिवली ते खैरेदरम्यान फक्त खोदून ठेवलेला डावा कालवा पूर्णतः दुर्लक्षित आहे. देखभाल दुरुस्तीअभावी दयनीय अवस्था झालेल्या या कालव्यात साजिवली-सारंगपुरीदरम्यान शेवाळ-दुर्गंधीयुक्त पाणी आहे. या पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना सिंचनासाठी होत नाही की पशुपक्ष्यांना पिण्यासाठी तसेच सारंगपुरी-खैरेदरम्यानच्या कालव्यात पाणीच नसल्याने शेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

- विठ्ठल धारवणे, शेतकरी, खैरे