शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
3
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
4
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
5
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
6
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
7
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
8
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
9
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
10
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
11
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
12
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
13
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
14
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
15
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
16
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
17
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
18
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
19
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
20
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
Daily Top 2Weekly Top 5

भातसा प्रकल्पाचे सिंचनाचा उद्देश केराच्या टोपलीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:41 IST

शेणवा : भातसा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात नागरीकरण, औद्याेगिकीकरणाचा वेग वाढला आहे. तसेच मुंबई, ठाणे, भिवंडी क्षेत्रातील बिगर सिंचन पाण्याच्या वाढत्या ...

शेणवा : भातसा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात नागरीकरण, औद्याेगिकीकरणाचा वेग वाढला आहे. तसेच मुंबई, ठाणे, भिवंडी क्षेत्रातील बिगर सिंचन पाण्याच्या वाढत्या आरक्षणामुळे जिल्ह्यातील शहापूर, कल्याण व भिवंडी या तालुक्यांसाठी आरक्षित असलेले सिंचनाचे पाणी उपलब्ध होत नल्याने येथील डावा-उजवा कालवा तिराची लांबी सीमित करण्याच्या शासनाच्या निर्णयाने शेतकऱ्यांना सिंचनाच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागणार आहे. कालव्यासाठी लागणारी वनविभागाची जमीन दहा वर्षांनंतरही संपादित न झाल्याने कालव्याचे काम रखडले आहे. भातसा प्रकल्पाचे सिंचनाचे उद्देश फोल ठरून उद्देशालाच केराची टोपली दाखवली आहे.

मुंबई महापालिकेची पाण्याची गरज विचारात घेता व पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाने १९६१ मध्ये साजिवली गावाजवळ असलेल्या भातसा व चोरणा नदीच्या संगमावर भातसा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. या प्रकल्पातून २३ हजार हेक्टर सिंचन क्षेत्रापैकी सहा हजार ३२० हेक्टर क्षेत्र डावा तीर कालव्यावर व १६ हजार ६८० हेक्टर क्षेत्र उजवा कालव्यात सिंचन करणे प्रस्तावित होते. मुंबई महापालिकेस पिण्यासाठी पाणी देणे, शहापूर, भिवंडी, कल्याण तालुक्यातील डावा कालवाअंतर्गत येणाऱ्या व उजवा कालवाअंतर्गत येणाऱ्या गावातील २३ हजार हेक्टर क्षेत्रात सिंचनासाठी लाभ देणे हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

कालव्यांसाठी लागणाऱ्या वनजमिनीची मान्यता केंद्रीय पर्यावरण व वनविभागाने २००९ ला दिली. त्यासाठी २०१३ ला वनविभागाला ४६ कोटी अदा केले आहेत. त्यानंतर वेळोवेळी केंद्रीय पर्यावरण विभाग व वनविभागास अंतिम मान्यतेसाठीचा प्रस्ताव सादर करूनही अंतिम मंजुरी मिळत नसल्याने कालव्यांची कामे रखडली. मुंबईची तहान भागविण्यासाठी पाणी मुंबईला देण्यात येणार असल्याने ६७ किमी लांबीच्या उजवा कालव्याची १३ किमी लांबी शासनाने कमी केली. तर ५४ किमी लांबीच्या डावा तीर कालव्याची ३७ किमी लांबी कमी केली आहे. यामुळे सिंचनाचे क्षेत्र अवघे ९ हजार १९० हेक्टर क्षेत्रावर आले आहे. शासनाच्या ११ सप्टेंबर २०१९ च्या निर्णयानुसार नाशिक येथील मुख्य अभियंता, नियोजन व जलविज्ञान अधिकाऱ्यांनी भातसा धरणातील पाणीसाठ्याबाबत पाहणी केल्यानंतर बिगर सिंचन वजा जाता पाणी उपलब्ध होत असल्याची खातरजमा केल्यानंतरच शासनाच्या परवानगीने कालव्यांची कामे सुरू करावीत, असे आदेश दिल्याने शेतकरी संभ्रमात पडले आहेत.

----

मुंबई महापालिकेच्या हद्दीत पिण्याच्या पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी भातसा प्रकल्पाच्या नियोजनामध्ये सिंचनासाठी आरक्षित ठेवलेले पाणी मुंबईसाठी देण्यात येत असल्याने डावा -उजवा कालवा सीमित करण्यात आला आहे.

- आनंद नारायण उदमले, उपविभागीय अभियंता, भातसा धरण व्यवस्थापन विभाग

....

डावा-उजवा कालवा सीमित करण्याच्या धोरणाविरोधात शासनदरबारी आवाज उठवून कालव्यांची लांबी वाढविण्यासाठी मागणी करणार आहे. कालव्यासाठी शासनाकडे साठ कोटींची मागणी केली आहे.

- दौलत दरोडा, आमदार, शहापूर

-----

साजिवली ते खैरेदरम्यान फक्त खोदून ठेवलेला डावा कालवा पूर्णतः दुर्लक्षित आहे. देखभाल दुरुस्तीअभावी दयनीय अवस्था झालेल्या या कालव्यात साजिवली-सारंगपुरीदरम्यान शेवाळ-दुर्गंधीयुक्त पाणी आहे. या पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना सिंचनासाठी होत नाही की पशुपक्ष्यांना पिण्यासाठी तसेच सारंगपुरी-खैरेदरम्यानच्या कालव्यात पाणीच नसल्याने शेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

- विठ्ठल धारवणे, शेतकरी, खैरे