शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

भातसा प्रकल्पाचे सिंचनाचा उद्देश केराच्या टोपलीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:41 IST

शेणवा : भातसा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात नागरीकरण, औद्याेगिकीकरणाचा वेग वाढला आहे. तसेच मुंबई, ठाणे, भिवंडी क्षेत्रातील बिगर सिंचन पाण्याच्या वाढत्या ...

शेणवा : भातसा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात नागरीकरण, औद्याेगिकीकरणाचा वेग वाढला आहे. तसेच मुंबई, ठाणे, भिवंडी क्षेत्रातील बिगर सिंचन पाण्याच्या वाढत्या आरक्षणामुळे जिल्ह्यातील शहापूर, कल्याण व भिवंडी या तालुक्यांसाठी आरक्षित असलेले सिंचनाचे पाणी उपलब्ध होत नल्याने येथील डावा-उजवा कालवा तिराची लांबी सीमित करण्याच्या शासनाच्या निर्णयाने शेतकऱ्यांना सिंचनाच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागणार आहे. कालव्यासाठी लागणारी वनविभागाची जमीन दहा वर्षांनंतरही संपादित न झाल्याने कालव्याचे काम रखडले आहे. भातसा प्रकल्पाचे सिंचनाचे उद्देश फोल ठरून उद्देशालाच केराची टोपली दाखवली आहे.

मुंबई महापालिकेची पाण्याची गरज विचारात घेता व पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाने १९६१ मध्ये साजिवली गावाजवळ असलेल्या भातसा व चोरणा नदीच्या संगमावर भातसा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. या प्रकल्पातून २३ हजार हेक्टर सिंचन क्षेत्रापैकी सहा हजार ३२० हेक्टर क्षेत्र डावा तीर कालव्यावर व १६ हजार ६८० हेक्टर क्षेत्र उजवा कालव्यात सिंचन करणे प्रस्तावित होते. मुंबई महापालिकेस पिण्यासाठी पाणी देणे, शहापूर, भिवंडी, कल्याण तालुक्यातील डावा कालवाअंतर्गत येणाऱ्या व उजवा कालवाअंतर्गत येणाऱ्या गावातील २३ हजार हेक्टर क्षेत्रात सिंचनासाठी लाभ देणे हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

कालव्यांसाठी लागणाऱ्या वनजमिनीची मान्यता केंद्रीय पर्यावरण व वनविभागाने २००९ ला दिली. त्यासाठी २०१३ ला वनविभागाला ४६ कोटी अदा केले आहेत. त्यानंतर वेळोवेळी केंद्रीय पर्यावरण विभाग व वनविभागास अंतिम मान्यतेसाठीचा प्रस्ताव सादर करूनही अंतिम मंजुरी मिळत नसल्याने कालव्यांची कामे रखडली. मुंबईची तहान भागविण्यासाठी पाणी मुंबईला देण्यात येणार असल्याने ६७ किमी लांबीच्या उजवा कालव्याची १३ किमी लांबी शासनाने कमी केली. तर ५४ किमी लांबीच्या डावा तीर कालव्याची ३७ किमी लांबी कमी केली आहे. यामुळे सिंचनाचे क्षेत्र अवघे ९ हजार १९० हेक्टर क्षेत्रावर आले आहे. शासनाच्या ११ सप्टेंबर २०१९ च्या निर्णयानुसार नाशिक येथील मुख्य अभियंता, नियोजन व जलविज्ञान अधिकाऱ्यांनी भातसा धरणातील पाणीसाठ्याबाबत पाहणी केल्यानंतर बिगर सिंचन वजा जाता पाणी उपलब्ध होत असल्याची खातरजमा केल्यानंतरच शासनाच्या परवानगीने कालव्यांची कामे सुरू करावीत, असे आदेश दिल्याने शेतकरी संभ्रमात पडले आहेत.

----

मुंबई महापालिकेच्या हद्दीत पिण्याच्या पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी भातसा प्रकल्पाच्या नियोजनामध्ये सिंचनासाठी आरक्षित ठेवलेले पाणी मुंबईसाठी देण्यात येत असल्याने डावा -उजवा कालवा सीमित करण्यात आला आहे.

- आनंद नारायण उदमले, उपविभागीय अभियंता, भातसा धरण व्यवस्थापन विभाग

....

डावा-उजवा कालवा सीमित करण्याच्या धोरणाविरोधात शासनदरबारी आवाज उठवून कालव्यांची लांबी वाढविण्यासाठी मागणी करणार आहे. कालव्यासाठी शासनाकडे साठ कोटींची मागणी केली आहे.

- दौलत दरोडा, आमदार, शहापूर

-----

साजिवली ते खैरेदरम्यान फक्त खोदून ठेवलेला डावा कालवा पूर्णतः दुर्लक्षित आहे. देखभाल दुरुस्तीअभावी दयनीय अवस्था झालेल्या या कालव्यात साजिवली-सारंगपुरीदरम्यान शेवाळ-दुर्गंधीयुक्त पाणी आहे. या पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना सिंचनासाठी होत नाही की पशुपक्ष्यांना पिण्यासाठी तसेच सारंगपुरी-खैरेदरम्यानच्या कालव्यात पाणीच नसल्याने शेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

- विठ्ठल धारवणे, शेतकरी, खैरे