शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

महाआवास अभियानांतर्गत बांधकाम सुरू असलेल्या घरकुलांची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 4:44 AM

ठाणे : ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काचा निवारा देणाऱ्या योजना गतिमान करण्याकरिता २८ फेब्रुवारीपर्यंत ‘महाआवास’ अभियान हाती घेतले आहे. जिल्ह्यात ...

ठाणे : ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काचा निवारा देणाऱ्या योजना गतिमान करण्याकरिता २८ फेब्रुवारीपर्यंत ‘महाआवास’ अभियान हाती घेतले आहे. जिल्ह्यात या योजनेखाली सुरू असलेल्या घरकुलांच्या बांधकामाची पाहणी ठाणे जिल्हा परिषदेकडून सध्या सुरू आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रूपाली सातपुते व उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी संयुक्त दौरा करून गुरुवारी मुरबाड तालुक्यातील कोरावळे गावातील घरकुलांची पाहणी केली. यावेळी प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे उपस्थित होत्या.

जिल्ह्यात या योजनेखाली एक हजार ५८७ घरकुले बांधण्यात येत आहेत. जिल्ह्याच्या मुरबाड, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, शहापूर या पाचही तालुक्यांत ही घरकुले उभी राहात आहेत. डॉ. सातपुते आणि पवार यांनी दौऱ्यात प्रधानमंत्री आवास योजनेचा आढावा घेतला. ज्या घरांची बांधकामे सुरू आहेत, ती दिलेल्या वेळेत बांधण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकारी व ग्रामपंचायतींना दिल्या.

महाआवास अभियानांतर्गत नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणून महिला बचतगटांच्या महासंघामार्फत घरकुल मार्ट उभारण्याबाबत चर्चा करण्यात आली व ग्रामीण विकास विभागाला सूचना केल्या. तसेच या दौऱ्यादरम्यान त्यांनी वनराई बंधारे, बचतगटातील महिला सदस्यांनी तयार केलेली पोषण परसबाग, जि.प. सेस फंडातून कृषी विभाग राबवत असलेली औजारे बँक आदींची पाहणी केली. यावेळी मुरबाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रमेश अवचार, कोरावळेचे सरपंच, ग्रामसेवक, ग्रामस्थ, तसेच जि. ग्रा. वि. यंत्रणा ठाणे, ग्रामीण जीवन उन्नती अभियान, कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

.............