शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

खाजगी कंपन्यांचा पुढाकार; गावपाड्यांची तीव्र पाणीटंचाई संपणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:57 AM

मुंबईसह जिल्ह्यातील शहरांना मुबलक पाणीपुरवठा ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातून होतो. मात्र, तेथील गावपाडे दरवर्षी तीव्र पाणीटंचाई सहन करत आहेत. त्यावर मात करण्यासाठी खाजगी कंपन्यांनी कंबर कसली आहे.

ठाणे : मुंबईसह जिल्ह्यातील शहरांना मुबलक पाणीपुरवठा ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातून होतो. मात्र, तेथील गावपाडे दरवर्षी तीव्र पाणीटंचाई सहन करत आहेत. त्यावर मात करण्यासाठी खाजगी कंपन्यांनी कंबर कसली आहे. जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या धरणांतील गाळ काढून त्यांची पाणीसाठवण क्षमता वाढवणार आहे. तर, काढलेला गाळ माळरानावर पसरवून गाळयुक्त शिवाराची ११६ कामे खाजगी कंपन्यांद्वारे प्राधान्याने हाती घेण्यात आली आहेत.जागतिक जल दिनाचा कार्यक्रम नियोजन भवन सभागृहात गुरुवारी पार पडला. त्यात जिल्ह्यातील विविध ठिकाणी ११६ कामे सामाजिक उत्तरदायित्वाच्या माध्यमातून हाती घेण्यासाठी छोट्यामोठ्या कंपन्या पुढे आल्याची माहिती उघड झाली. या कार्यक्रमास माजी आ. दिगंबर विशे, उपजिल्हाधिकारी नंदकुमार कोष्टी, अधीक्षक अभियंता बा.भा. लोहार, सहा. आयुक्त उदयकुमार शिरूरकर, वसुंधरा संजीवनी मंडळाचे आनंद भागवत आदी उपस्थित होते.जिल्ह्यातील लहान, मोठ्या कंपन्यांना जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी पत्र देऊन आदिवासी गावांमध्ये पाणीसाठवण क्षमता वाढेल, असे तलाव, बंधाऱ्यांतील गाळ काढणे, नाला खोलीकरण, रुंदीकरण, छोटे बंधारे, रिचार्ज शाफ्ट, विहिरी नूतनीकरण, दुरुस्तीकरण अशी विविध कामे सीएसआरमधून करण्याचे आवाहन कंपन्यांना केले. त्यास अनुसरून यंदा ११६ कामे जिल्ह्यात विविध ठिकाणी कंपन्यांकडून केली जात आहेत.जिल्ह्यातील ११६ कामांपैकी लघुपाटबंधारे विभागाकडून ५० कामे, विहीर दुरु स्तीसारखी ३६ कामे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाद्वारे होणार आहेत. जलसंधारणच्या नियंत्रणातून केटी बंधाºयांसारख्या १० कामांसह छोटे बंधारे बांधले जाणार आहेत. भूजल सर्वेक्षण यंत्रणेकडून १० कामे प्राधान्याने यंदा होतील. या कामांमुळे भविष्यातील पाणीटंचाईवर मात करून शेतीला देखील मुबलक पाणी देणे शक्य असल्याचे उपजिल्हाधिकारी नंदकुमार कोष्टी यांनी सांगितले.जलयुक्त शिवार कामांसाठी यंदा ४४ गावांची निवडयंदा शहापूर, मुरबाड, भिवंडी या ग्रामीण तालुक्यांसह कल्याण, अंबरनाथ या शहरी तालुक्यांच्या ग्रामीण क्षेत्रातील जलयुक्त शिवारच्या कामांसाठी ४४ गावांची निवड झाली आहे. यातील काही गावे आदिवासी क्षेत्रातील आहेत, तर २०१५-१६ मध्ये जलयुक्त शिवारसाठी २६ आणि २०१६ -१७ साठी १८ गावे निवडली होती. मागील वर्षीदेखील पाण्यासाठी जिल्ह्यात गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेत विविध कंपन्या आणि संस्थांचे पाठबळ घेतले होते.यादरम्यान जिल्हा प्रशासनाने ८० कामे करून १.१७ लाख घनमीटर गाळ काढला होता. याप्रमाणेच यंदाही या योजनेतूनच जिल्ह्यात ११६ कामे कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून घेण्यात आली आहेत. मुरबाड तालुक्यातील कनकवीरा नदी जिवंत झाल्याचे आनंद भागवत यांनी यावेळी सांगितले. पाण्याची निर्मिती करता येत नाही, पण पाण्याची बचत आपण करू शकतो.याशिवाय, रेन वॉटर हार्वेस्टिंगवर भर दिला पाहिजे, असे उदयकुमार शिरूरकर यांनी नमूद केले. ठाणे पाटबंधारे विभागाने जलजागृती सप्ताहात विविध कार्यक्र म, स्पर्धा, पथनाट्ये, जलरथ या माध्यमांतून जनजागृती केली आणि नागरिकांच्या समस्या समजावून घेतल्याचे लोहार यांनी स्पष्ट केले. पाण्याचे रिसायकलिंग केल्यास पाण्याचा नाश थांबवणेदेखील शक्य असल्याचे त्यांनी यावेळी पटवून दिले.

टॅग्स :thaneठाणे