शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

बापरे! महागाईनं कंबरडं मोडलं; चिकन पेट्रोल दरापेक्षा 'ही' भाजी महागली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 6:12 PM

कोरोनाच्या काळात लोक आपल्या आरोग्याकडे जास्त लक्ष देऊ लागले आहेत, त्यामुळे शरीरासाठी पौष्टीक अशा भाज्या खाण्याकडे लोकांचा जास्त कल वाढू लागला आहे..

रणजीत इंगळे

ठाणे - सध्या भाज्यांचे दर हे पेट्रोल आणि चिकन पेक्षाही महाग झालेत. इंधन दरवाढ व अवकाळी पाऊस यामुळे सर्वच भाज्यांनी शंभरी गाठली आहे ,त्यात शेवग्याच्या शेंगाची किंमत तर ४०० रुपये किलो झालीय , तर मटार २०० रुपये किलो झालेत .त्यामुळे ग्राहकवर्गात नाराजगी पसरली आहे. त्यामुळे भाज्या घ्याव्यात की चिकन घ्यावे हा प्रश्न आता सामान्य नागरिकांना पडला आहे. 

आमटी, डाळ, सांबरची चव वाढवणारी तसेच कोरोणच्या काळात अत्यंत गुणकारक असलेली शेवग्याच्या शेंगा बाजारात ३८० ते ४०० रुपये किलो दराने विकली जात आहे. आजच्या घडीला सर्वात महागडी भाजी म्हणून शेवग्याची शेंग भाव खात असल्याने जेवणाच्या ताटातून ती हद्दपार होऊ लागली आहे. नवरात्रोत्सव व दिवाळी या सणासुदीच्या दिवसानंतर अनेकांचा मांसाहार सोडून शाकाहरी खाण्याकडे अधिक कल असतो... भाजी मंडईत सकाळी वाशी, नाशिक, कल्याण येथील मार्केट मधून भाजीपाल्याची आवक होत असते.

परंतु इंधन दरवाढ व अवकाळी पाऊस यामुळे सर्वच भाज्यांनी शंभरी गाठली आहे. त्यात कोरोनाच्या काळात लोक आपल्या आरोग्याकडे जास्त लक्ष देऊ लागले आहेत, त्यामुळे शरीरासाठी पौष्टीक अशा भाज्या खाण्याकडे लोकांचा जास्त कल वाढू लागला आहे. यासाठीच  आरोग्यवर्धक आणि पदार्थाची लज्जत वाढवणाऱ्या शेवग्याच्या शेंगा काही दिवसापुरवी 100 रुपये किलोने विकल्या जात होत्या.  मात्र सध्या ह्याच शेंगा ३८० व ४०० रुपये दराने विकल्या जात आहे. तर मटार २०० रुपये किलो झालेत ...म्हणजेच चिकनपेक्षा ही शेंगा महाग झाल्यात... त्यामुळे आम्ही पहिले हफ्त्याभराच्या भाज्या विकत घेत होतो ,परंतु आता मात्र फक्त १ ते २ दिवसाच्या भाज्याच  विकत घेतो, ते ही पाव किलो ते अर्धा किलो असे ग्राहक सांगत आहेत.. भाज्यांच्या वाढलेल्या किमतींमुळे भाजी विक्रेतेही यामुळे चिंतेत आहेत , अश्या महागड्या भाज्यांच्या खरेदीत ग्राहकांनी पाठ फिरवलेली दिसत आहे. त्यामुळे भाज्यांचे दरवाढ कधी कमी होईल याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.