शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

घुसखोरी हा भारताला झालेला कॅन्सर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 05:33 IST

हेमंत महाजन : ए.पी. शाह विद्यालयात राष्ट्रीय सुरक्षेवर व्याख्यान, देशाला बाह्य सुरक्षेची चिंता नाही

ठाणे : भारताला सर्वात मोठा धोका अंतर्गत सुरक्षेचा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, बांगलादेशी घुसखोरी हा भारताला लागलेला कॅ न्सर आहे, असे मत वरिष्ठ लेखक, वक्ते, ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी व्यक्त केले. राष्ट्रभक्ती चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर व्याख्यानमालेचे आयोजन ठाण्यात करण्यात आले होते. यावेळी ‘राष्ट्रीय सुरक्षा’ या विषयावर हेमंत महाजन बोलत होते.

ए.पी. शाह महाविद्यालयात शनिवारी या कार्यक्रमाचे आयोजन केले होेते. यावेळी संस्थेचे कैलास म्हात्रे, दत्ता घाडगे, सुरज दळवी, जितेंद्र ढाकणे, प्रमोद धुमाळ, वर्षा सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महाजन म्हणाले, राष्ट्रीय सुरक्षा ही अंतर्गत व बाह्य या दोन प्रकारांत मोडते. अंतर्गत सुरक्षेमध्ये नक्षलवाद, दहशतवादी कारवाया, छुपे युद्ध तसेच काश्मीर, पूर्वांचलमध्ये होणारी घुसखोरी इत्यादी विषय येतात. बाह्य सुरक्षेमध्ये जमिनीवरील सुरक्षा, सागरी सुरक्षा आणि अवकाश सुरक्षा इत्यादी येतात. सध्या देशाची बाह्य सुरक्षा खूप चांगली आहे. आपल्या शेजारील चीन, पाकिस्तान, बांगलादेश यांच्याकडून भारताला धोका आहे. भारताला ७६०० किलोमीटर सागरी सीमा लाभली आहे. भारताच्या तिन्ही बाजूंना समुद्र असल्याने भारत आणि चीन यांच्यामध्ये डोकलाम विषयावरून वाद असला, तरी चीन भारतावर आक्रमण करण्याचा विचारही करू शकत नाही. चीनला लढाईचा अजिबात अनुभव नाही. १९७८ नंतर चीनची लढाई झाली नाही. लढाई झालीच तर चीन, पाकिस्तान, बांगलादेश व देशांतर्गत आक्रमण एकाच वेळी होऊ शकते. चीनची तेलवाहतूक ही भारताच्या समुद्री हद्दीजवळून होत असते. त्यामुळे लढाई झाली, तर चीनचा तेलपुरवठा भारत बंद करू शकतो. म्हणून, चीन भारतावर कधी आक्रमण करू शकत नाही. पाकिस्तानही युद्ध करू शकत नाही, म्हणून ते प्रॉक्झी वॉर करत आहेत. पाकिस्तानची स्थिती हलाखीची आहे. शिवाय, दहशतवादामुळे आंतरराष्ट्रीय दबावही खूप आहे, असे महाजन यांनी सांगितले.

भारताचे सध्याचे परराष्ट्र धोरण योग्य असल्याने शेजारी राष्ट्रे भारताच्या बाजूने आहेत. त्यामुळे बाह्य सुरक्षेबाबत भारताला चिंता करण्याची गरज नाही. भारताबाबत आंतरराष्ट्रीय शक्तीअंतर्गत लढाईमध्ये जास्त रस दाखवते, म्हणून अंतर्गत कारवाईच्या माध्यमातून त्रास देणे सुरू असते. भारतामध्ये विकासविरोधी गट खूप सक्रिय आहे. हे देशासमोर एक मोठे आव्हान आहे. अनेक प्रकल्प स्थानिक लोकांमध्ये गैरसमजुती पसरवून थांबवले जातात. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांमध्ये वादविवाद निर्माण केले जातात. जातीजातीमध्ये तेढ निर्माण करून अंतर्गत सुरक्षा बिघडवण्याचा प्रयत्न केला जातो. आपल्याकडे चिनी वस्तूंची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. त्यामुळे विकासावर फरक पडतो, असे महाजन म्हणाले.भारत सुपरपॉवर नक्की बनेलच्केंद्र सरकार लष्कराच्या बाबतीत चांगल्या योजना राबवत आहे. आपली सागरी सुरक्षा नक्कीच सुधारलेली आहे. आपल्या नॅशनल सिक्युरिटी गार्डची (एनएसजी) दहशत शेजारील राष्ट्रांमध्ये नक्कीच आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भारत सुपरपॉवर नक्कीच बनेल.च्नागरिकांनी स्वच्छता ठेवली पाहिजे. सोशल मीडियातून चुकीच्या गोष्टी पसरवू नये. जर अनुचित प्रकार घडत असतील, तर पोलिसांना माहिती द्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला.च्कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलास म्हात्रे यांनी केले. या कार्यक्रमासाठी जगदीश खैरालिया, जितेंद्र ढाकणे, दत्ता घाडगे यांनी परिश्रम केले.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका