शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाणी वाढले, बिल वाढले; नागरिकांमध्ये मात्र संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2018 22:21 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेमार्फत शहरातील नागरीकांना होत असलेला पाणीपुरवठा २०१५ पासून अचानकपणे चार महिन्यांपुर्वीच त्याच्या बिलात तब्बल ४० ते ५० टक्के शुल्क वाढले आहे.

- राजू काळे  

भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेमार्फत शहरातील नागरीकांना होत असलेला पाणीपुरवठा २०१५ पासून अचानकपणे चार महिन्यांपुर्वीच त्याच्या बिलात तब्बल ४० ते ५० टक्के शुल्क वाढले आहे. पाणी दरवाढीला १५ डिसेंबर २०१७ रोजीच्या स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली असुन त्याची अंमलबजावणी यंदाच्या एप्रिलपासून होणार आहे. त्यापुर्वीच बिलाची रक्कम अचानक वाढल्याने नागरीक संभ्रमात पडले आहेत.

पालिकेकडुन २०१४ पर्यंत  पाणीपुरवठ्याच्या निवासी व व्यावसायिक वापरासाठी प्रती १ हजार लीटरसाठी अनुक्रमे ७ रुपये व २८ रुपये दर वसुल केला जात होता. गेल्या १० वर्षांत पाणीपट्टीत वाढ झाली नसल्याचे कारण पुढे करीत प्रशासनाने त्याच्या दरवाढीचा प्रस्ताव २०१५ मधील स्थायीत सादर केला होता. स्थायीने त्याला मान्यता दिल्यानंतर ३० एप्रिल २०१५ रोजीच्या महासभेने निवासी दरात ३ रुपये व वाणिज्य दरात १२ रुपये दरवाढीला मान्यता दिली. त्यामुळे सध्या प्रती १ हजार लीटर पाणीपुरवठ्यामागे निवासी वापरासाठी १० रुपये तर व्यावसायिक वापरासाठी ४० रुपये दर पालिकेकडुन वसुल केला जात आहे. या दरवाढीला किमान ३ वर्षे पुर्ण होत नाही तोवर पुन्हा १५ डिसेंबर २०१७ रोजीच्या स्थायी समितीने निवासी दरात २ रुपये व व्यावसायिक दरात १० रुपयांच्या दरवाढीस  मान्यता दिली. गेल्या दिड वर्षांत पाणीपट्टीत केलेली हि दरवाढ जवळपास दुप्पट ठरणार असतानाच पालिकेला दोन वर्षांपुर्वीच्या १२६ एलएलडी पाणीपुरवठ्यात ५० एमएलडी अतिरीक्त पाणीपुरवठा उपलब्ध होऊ लागला आहे. पालिकेला एमआयडीसी कोट्यातून मंजुर झालेल्या ७५ एमएलडीपैकी २०१५ मध्ये २० तर ३० एप्रिल २०१७ पासून ३० एमएलडी अतिरीक्त पाणीपुरवठा मिळण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे नागरीकांच्या पाण्याची समस्या मार्गी लागली असली तरी उर्वरीत २५ एमएलडी पाणीपुरवठा येत्या एप्रिलमध्ये सुरु होण्याची शक्यता प्रशासनाकडुन वर्तविली जात आहे. शहरात निवासी नळजोडण्यांची संख्या ३४ हजार १९४ व व्यावसायिक नळजोडण्यांची संख्या २ हजार ७७० इतकी आहे. तर काही ठिकाणी बेकायदेशीर नळजोडण्या दिल्याचे प्रकार गेल्या काही महिन्यांमध्ये उजेडात आल्याने त्याविरोधात पोलिसांमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. परिणामी वाढलेल्या अतिरीक्त पाण्यामुळे पाण्याची बिले अचानकपणे भरमसाठ वाढल्याने नागरीक संभ्रमात पडले आहेत. वास्तविक पाणी २०१५ पासून वाढले असले तरी बिलात त्यावेळी झालेल्या दरवाढीखेरीज गतवर्षीच्या सप्टेंबर २०१७ पर्यंत पाण्याची बिले १० रुपये दरानेच वसुल करण्यात येत होती. सप्टेंबर २०१७ ते डिसेंबर २०१७ या चार महिन्यांच्या बिलांचे नुकतेच वाटप करण्यात आले असता त्यात अचानक ४० ते ५० टक्के वाढ झाल्याचे निदर्शनास आल्याने नागरीक चक्रावून गेले आहेत. स्थायीने यंदा पाणीपट्टीत प्रती १ हजार लीटरमागे केलेली २ रुपयांची दरवाढ एप्रिल २०१८ पासून लागू केली जाणार असतानाही पाण्याच्या बिलांतील रक्कम कशी काय वाढली, असा प्रश्न नागरीकांसमोर उपस्थित झाला आहे. या वाढीव बिलांचे गौडबंगाल बेकायदेशीर नळजोडण्यांमध्ये असुन बेकायदेशीरपणे होणाय््राा पाणीपुरवठ्याचे शुल्क अधिकृत नळजोडण्यांद्वारे होणाय््राा पाणीपुरवठ्यात समायोजित केले जाते कि काय, असा संशय देखील व्यक्त होऊ लागला आहे. 

अतिरीक्त पाणीपुरवठा वाढल्याने नागरीकांना करण्यात येणाय््राा पाणीपुरवठ्याच्या कालावधीत वाढ झाली आहे. परिणामी नागरीकांकडुन पाण्याचा वापर जास्त होऊ लागल्यानेच बिलांतील शुल्क वाढले आहे. 

-  पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे 

वाढलेला अतिरीक्त पाणीपुरवठा पालिकेला २०१५ व एप्रिल २०१७ पासून मिळत असताना पालिकेने त्यावेळपासुन नागरीकांना कमी पाणी दिले होते का? त्यावेळी व आत्ता आम्हाला पाणी तेवढेच मिळत असताना अचानक सप्टेंबरमध्येच पाणी कसे काय वाढले? नागरीकांना देण्यात आलेल्या वाढीव बिलांतील रक्कम बेकायदेशीर पाणीपुरवठ्यातील तफावतीला दूर करण्यासाठीच केला जात असुन त्याची चौकशी व्हावी. 

-  माजी नगरसेवक ओमप्रकाश गाडोदिया 

टॅग्स :WaterपाणीMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक