शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात शनिवारी २०७९ रुग्णांची वाढ; कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंतेत भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2020 01:05 IST

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात ३८८ रुग्ण नव्याने आढळले आहेत. शहरात २९ हजार ८५१ कोरोनाच्या रुग्णांची नोंद आतापर्यंत झाली आहे.

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. शनिवारी तर तब्बल दोन हजार ७९ रुग्णांची नव्याने वाढ झाली. यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंंख्या एक लाख ४४ हजार १७२ झाली आहे. तर, २६ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या आता तीन हजार ८९३ झाली आहे.ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात ३८८ रुग्ण नव्याने आढळले आहेत. शहरात २९ हजार ८५१ कोरोनाच्या रुग्णांची नोंद आतापर्यंत झाली आहे. तर, चार जणांचा मृत्यू झाल्यामुळे ८८९ मृत्यूची नोंद झाली. कल्याण-डोंबिवली परिसरात ५७८ रुग्णांची वाढ झाली.उल्हासनगर महापालिका परिसरात तीन मृत्यूंसह ३९ नवे रुग्ण आढळले. भिवंडी महापालिका क्षेत्रात ४० बाधित आढळले, तर एकाचाही मृत्यू झाला नाही.आता बाधितांची संख्या चार हजार ४७४ झाली असून मृतांची संख्या २९५ झाली आहे. मीरा-भार्इंदरमध्ये २४७ रुग्णांची तर चार जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. तर मृतांचा आकडा ४६८ वर पोहोचला आहे.अंबरनाथमध्ये ५० रुग्णांसह एका जणाच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या पाच हजार ४४६, तर मृतांची संख्या २०४ वर गेली आहे. बदलापूरमध्ये ९२ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या चार हजार ९२० झाली. ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागात २६४ रुग्णांची वाढ झाली, तर दोघांचा मृत्यू झाला. आता बाधितांची ११ हजार २५७ आणि मृतांची संख्या ३३८ झाली आहे.नवी मुंबईत ३० हजारचा टप्पा पूर्णनवी मुंबई : शहरात शनिवारी ३८१ रूग्ण वाढले असून एकूण रूग्णांची संख्या ३०२९५ झाली आहे. उपचारादरम्यान दिवसभरात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबईमध्ये १ लाख ५८ हजार १५ जणांच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. यापैकी ८१ टक्के अहवाल निगेटीव्ह आले आहेत. दिवसभरात ३५९ रूग्ण बरे झाले असून कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २६१३५ झाली आहे.रायगड जिल्ह्यात आढळले ८९३ रूग्णअलिबाग : जिल्ह्यात शनिवारी ८९३ नव्या कोरोना पॉझिटीव्ह रु ग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या ३६ हजार ३४३ वर पोचली आहे. दिवसभरात १४ जणांचा मृत्यू झाला आहे तर आतापर्यंत एकूण ९८८ जणांना मृत्यूने कवटाळले आहे. आतापर्यंत २८ हजार ९१० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.वसई-विरारमध्ये२५९ नवीन रुग्णवसई : वसई-विरार शहरात शनिवारी दिवसभरात २५९ नवे रुग्ण आढळून आले असून २०१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर तीन रुग्णांचा या जीवघेण्या आजारात मृत्यू झाला आहे, अशी माहिती महापालिकेने दिली. महापालिका हद्दीत आता एकूण रुग्णसंख्या १९ हजार १६६ वर पोहोचली आहे. तर एकूण मुक्त रुग्णांची संख्या १६ हजार ६९९ इतकी झाली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे