शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात शनिवारी २०७९ रुग्णांची वाढ; कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंतेत भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2020 01:05 IST

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात ३८८ रुग्ण नव्याने आढळले आहेत. शहरात २९ हजार ८५१ कोरोनाच्या रुग्णांची नोंद आतापर्यंत झाली आहे.

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. शनिवारी तर तब्बल दोन हजार ७९ रुग्णांची नव्याने वाढ झाली. यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंंख्या एक लाख ४४ हजार १७२ झाली आहे. तर, २६ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या आता तीन हजार ८९३ झाली आहे.ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात ३८८ रुग्ण नव्याने आढळले आहेत. शहरात २९ हजार ८५१ कोरोनाच्या रुग्णांची नोंद आतापर्यंत झाली आहे. तर, चार जणांचा मृत्यू झाल्यामुळे ८८९ मृत्यूची नोंद झाली. कल्याण-डोंबिवली परिसरात ५७८ रुग्णांची वाढ झाली.उल्हासनगर महापालिका परिसरात तीन मृत्यूंसह ३९ नवे रुग्ण आढळले. भिवंडी महापालिका क्षेत्रात ४० बाधित आढळले, तर एकाचाही मृत्यू झाला नाही.आता बाधितांची संख्या चार हजार ४७४ झाली असून मृतांची संख्या २९५ झाली आहे. मीरा-भार्इंदरमध्ये २४७ रुग्णांची तर चार जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. तर मृतांचा आकडा ४६८ वर पोहोचला आहे.अंबरनाथमध्ये ५० रुग्णांसह एका जणाच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या पाच हजार ४४६, तर मृतांची संख्या २०४ वर गेली आहे. बदलापूरमध्ये ९२ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या चार हजार ९२० झाली. ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागात २६४ रुग्णांची वाढ झाली, तर दोघांचा मृत्यू झाला. आता बाधितांची ११ हजार २५७ आणि मृतांची संख्या ३३८ झाली आहे.नवी मुंबईत ३० हजारचा टप्पा पूर्णनवी मुंबई : शहरात शनिवारी ३८१ रूग्ण वाढले असून एकूण रूग्णांची संख्या ३०२९५ झाली आहे. उपचारादरम्यान दिवसभरात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबईमध्ये १ लाख ५८ हजार १५ जणांच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. यापैकी ८१ टक्के अहवाल निगेटीव्ह आले आहेत. दिवसभरात ३५९ रूग्ण बरे झाले असून कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २६१३५ झाली आहे.रायगड जिल्ह्यात आढळले ८९३ रूग्णअलिबाग : जिल्ह्यात शनिवारी ८९३ नव्या कोरोना पॉझिटीव्ह रु ग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या ३६ हजार ३४३ वर पोचली आहे. दिवसभरात १४ जणांचा मृत्यू झाला आहे तर आतापर्यंत एकूण ९८८ जणांना मृत्यूने कवटाळले आहे. आतापर्यंत २८ हजार ९१० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.वसई-विरारमध्ये२५९ नवीन रुग्णवसई : वसई-विरार शहरात शनिवारी दिवसभरात २५९ नवे रुग्ण आढळून आले असून २०१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर तीन रुग्णांचा या जीवघेण्या आजारात मृत्यू झाला आहे, अशी माहिती महापालिकेने दिली. महापालिका हद्दीत आता एकूण रुग्णसंख्या १९ हजार १६६ वर पोहोचली आहे. तर एकूण मुक्त रुग्णांची संख्या १६ हजार ६९९ इतकी झाली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे