शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

लाेकसभा निवडणुकीत ‘खुला फेसबुक, निकला उम्मीदवार’

By संदीप प्रधान | Updated: April 8, 2024 09:37 IST

किमान २५ वर्षांपूर्वीची गोष्ट... एका छोट्याशा गावात राज्यातील एका बड्या राजकीय नेत्याची प्रचारसभा सुरू होती

किमान २५ वर्षांपूर्वीची गोष्ट... एका छोट्याशा गावात राज्यातील एका बड्या राजकीय नेत्याची प्रचारसभा सुरू होती. गावात वीजपुरवठा करण्याचे आश्वासन नेत्याने पाच वर्षांत पूर्ण न केल्याने विरोधकांनी प्रचारात टीका सुरू केली होती. सभा सुरू असताना एक ट्रक येऊन सभेच्या ठिकाणी थांबला. त्यातून विजेचे पोल खाली उतरवले गेले. उमेदवार म्हणाला, वचनपूर्ती, आश्वासनपूर्ती म्हणतात ती हीच. बघा आज विजेचे खांब आले. मतदानानंतर घराघरांत वीज येणार, ही काळ्या दगडावरील पांढरी रेष. लोकांनी टाळ्या पिटल्या. मतदान भरघोस झाले. तो नेता विजयी झाल्याचा गुलाल उधळला गेला. पुन्हा ट्रक आला आणि सर्व विजेचे पोल भरून निघून गेला. गाव अंधारातच राहिले. 

त्यावेळची निवडणूक साधी होती आणि मतदार भोळे होते? उमेदवारांना प्रसिद्धीकरिता इमेज बिल्डिंगकरिता एक-दोन नव्हे तर चांगली पाच-सहा लोकांची टीम तैनात करावी लागते. वास्तववादी जगातील निवडणुकीत विजयश्री खेचून आणण्याकरिता व्हर्च्युअल वर्ल्डमधील आपले मतदार शोधून त्यांच्या मन व मेंदूचा ताबा घेणे ही गरज झाली आहे. त्यामुळेच ‘फटा पोस्टर निकला हिरो’ या धर्तीवर आता येणाऱ्या काळात ‘खुला फेसबुक निकला उम्मीदवार’ हाच अनुभव वारंवार येणार आहे.

देशात स्मार्ट फोन व सोशल मीडियाचा उदय होण्यापूर्वी म्हणजे १९९५ नंतर काही मातब्बर नेत्यांनी इमेज बिल्डिंगकरिता काही मंडळी नियुक्त केली होती. मुख्यमंत्री, मंत्री यांच्या दिमतीला सरकारचा माहिती व जनसंपर्क विभाग असतो. परंतु त्या पलीकडे जाऊन नेत्यांनी ही मंडळी नियुक्त केली. ज्यांची इमेज बिल्डिंग करायची आहे त्यांच्याबद्दल वृत्तपत्रे व वाहिन्यांत कुठल्या बातम्या येतायत, जर विरोधात बातम्या येत असतील तर त्या थोपवण्याकरिता काय उपाययोजना करता येतील, सरकारकडील सहसा पत्रकारांना सहज उपलब्ध न होणारी माहिती देणे, स्वत:हून आपल्या विरोधी पक्षातील किंवा स्वपक्षातील विरोधकांच्या कुलंगड्यांच्या बातम्या देऊन टीकेचा फोकस आपल्यावरून दुसऱ्यांवर जाईल असे पाहणे, अशा पद्धतीने हे इमेज बिल्डिंग करणारे काम पाहत होते. हळूहळू वाहिन्यांची संख्या वाढली. सोशल मीडिया प्रबळ झाला. स्पर्धा तीव्र झाली. अशा वेळी रेडिमेड फुटेज व बातमी जर मिळाली तर लागलीच ब्रेक करणे सोपे होते, हे हेरून राजकीय पक्ष, नेते यांनी पाच ते सहा जणांची टीम बाळगायला सुरुवात केली. यात कॅमेरामन, फोटो एडिटर, मिम्स क्रिएटर, कॉपी रायटर यांचा समावेश असतो.

सोशल मीडियाला संघटनेची साथ हवीसोशल मीडियावरील प्रचाराला संघटनात्मक ताकद व नेतृत्वाची जोड असणे, उमेदवाराचे काम असणे गरजेचे आहे, असे भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सांगितले. भाजपने प्रत्येक बूथनिहाय देशभर लाखो व्हॉट्सॲप ग्रुप केले आहेत. कुठलाही संदेश २० सेकंदांत देशभर पोहोचवण्याची यंत्रणा पक्षाकडे आहे. अन्य पक्षही त्याचेच अनुकरण करीत आहेत.

उमेदवाराला मतदार शोधायला होते मदतउमेदवारांना त्यांच्या मतदारसंघापुरता संदेश द्यायचा असतो. त्यामुळे फेसबुक, व्हॉट्सॲप या माध्यमातून उमेदवार त्यांना कुणापर्यंत जायचे आहे, ती कम्युनिटी निश्चित करू शकतात. खर्च तुलनेने कमी असून उमेदवाराला द्यायचा मेसेज झटपट देता येतो. उमेदवाराबद्दल पर्सेप्शन बदलण्याकरिता खूप फायदा होतो. लोकांच्या प्रतिसादावरून आपला मेसेज त्यांच्यापर्यंत गेला किंवा नाही हे स्पष्ट होते. अल्गोरिदम, डेटा ॲनालिसिस व आर्टिफिशल इंटेलिजन्स या माध्यमातून आता उमेदवाराला सोशल मीडियावरील आपला मतदार कोणता आहे हेही बऱ्यापैकी शोधून त्याला जोडता येते, असे ॲडफॅक्टरचे व्हाइस प्रेसिडेंट परीक्षित जोशी यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४