शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

खाण्याबाबत प्राण्यांचे अनुकरण करा- जगन्नाथ दीक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 07:16 IST

खाण्याच्या बाबतीत प्राण्यांचे अनुकरण केले, तरी माणसांचे निम्मे आजार कमी होतील, असा विश्वास डॉ. जगन्नाथ विनायक दीक्षित यांनी व्यक्त केला.

बदलापूर : पोट भरल्यावर प्राणी अजिबात काही खात नाही. पण, मनुष्य हा एकमात्र असा प्राणी आहे, जो पोट भरल्यावरदेखील खात असतो. अशा प्रकारे अनावश्यक खाल्ल्यानेच अनेक व्याधी वाढत असतात. यामुळे खाण्याच्या बाबतीत प्राण्यांचे अनुकरण केले, तरी माणसांचे निम्मे आजार कमी होतील, असा विश्वास डॉ. जगन्नाथ विनायक दीक्षित यांनी व्यक्त केला.काका गोळे फाउंडेशनतर्फे आरोग्याविषयी जनजागृतीसाठी डॉ. दीक्षित यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अलीकडे कॅन्सरचे प्रमाण वाढते आहे. याबाबतीत चर्चा केल्यावर असे आढळले आहे की, लठ्ठपणा कमी झाला, तर कॅन्सर बऱ्यापैकी कमी होऊ शकतो. त्यामुळेच विनासायास वेट लॉस हे आपले तत्त्व असल्याचे दीक्षित म्हणाले.आपण चर्चा पुष्कळ करतो, त्यापेक्षा प्रयोग करा. आपल्या परंपरा, धर्म, आयुर्वेद यात आहे तेच महत्त्वाचे आहे. आयुर्वेदाने दोन वेळा जेवायचे सांगितले आहे. जैन धर्मात ब्यासना असते, तर गौतम बुद्धाने एकदाच जेवावे, असे म्हटल्याचे दाखले त्यांनी दिले. संस्कृतमध्ये ब्रेकफास्टला पर्यायी शब्दच नाही. कारण, नाश्ता हा प्रकारच आपल्याकडे नसल्याचेही ते म्हणाले.लठ्ठपणामुळे अनेक व्याधी होत असतात. म्हणूनच, आपण ठरवले तर वर्षभरात आपले वजन कमी होऊ शकते. लठ्ठ होणाऱ्यांमध्ये ९८ टक्के स्वत:मुळे लठ्ठपणा वाढतो. साखर, तूप, आवश्यकतेपेक्षा जास्त खाणे, कमी शारीरिक श्रम यामुळे याचा त्रास वाढत असल्याचेही ते शेवटी म्हणाले.आरोग्याविषयी जागरुक नागरिकांशी संवाद साधण्यासाठी आलो आणि इतकी प्रचंड गर्दी पाहून अंगावर मूठभर मांस चढले आहे. मात्र, हे मांस पोटावर येऊ नये, अशी आशा दीक्षित यांनी भाषणाच्या प्रारंभी व्यक्त केली. आपण इतक्या ठिकाणी कार्यक्रम केले, पण केवळ नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती व्हावी, या एकाच उद्देशाने काका गोळे फाउंडेशनने हे व्याख्यान आयोजित केले आहे, हे पाहून मनाला समाधान वाटल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न