शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

खाण्याबाबत प्राण्यांचे अनुकरण करा- जगन्नाथ दीक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 07:16 IST

खाण्याच्या बाबतीत प्राण्यांचे अनुकरण केले, तरी माणसांचे निम्मे आजार कमी होतील, असा विश्वास डॉ. जगन्नाथ विनायक दीक्षित यांनी व्यक्त केला.

बदलापूर : पोट भरल्यावर प्राणी अजिबात काही खात नाही. पण, मनुष्य हा एकमात्र असा प्राणी आहे, जो पोट भरल्यावरदेखील खात असतो. अशा प्रकारे अनावश्यक खाल्ल्यानेच अनेक व्याधी वाढत असतात. यामुळे खाण्याच्या बाबतीत प्राण्यांचे अनुकरण केले, तरी माणसांचे निम्मे आजार कमी होतील, असा विश्वास डॉ. जगन्नाथ विनायक दीक्षित यांनी व्यक्त केला.काका गोळे फाउंडेशनतर्फे आरोग्याविषयी जनजागृतीसाठी डॉ. दीक्षित यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अलीकडे कॅन्सरचे प्रमाण वाढते आहे. याबाबतीत चर्चा केल्यावर असे आढळले आहे की, लठ्ठपणा कमी झाला, तर कॅन्सर बऱ्यापैकी कमी होऊ शकतो. त्यामुळेच विनासायास वेट लॉस हे आपले तत्त्व असल्याचे दीक्षित म्हणाले.आपण चर्चा पुष्कळ करतो, त्यापेक्षा प्रयोग करा. आपल्या परंपरा, धर्म, आयुर्वेद यात आहे तेच महत्त्वाचे आहे. आयुर्वेदाने दोन वेळा जेवायचे सांगितले आहे. जैन धर्मात ब्यासना असते, तर गौतम बुद्धाने एकदाच जेवावे, असे म्हटल्याचे दाखले त्यांनी दिले. संस्कृतमध्ये ब्रेकफास्टला पर्यायी शब्दच नाही. कारण, नाश्ता हा प्रकारच आपल्याकडे नसल्याचेही ते म्हणाले.लठ्ठपणामुळे अनेक व्याधी होत असतात. म्हणूनच, आपण ठरवले तर वर्षभरात आपले वजन कमी होऊ शकते. लठ्ठ होणाऱ्यांमध्ये ९८ टक्के स्वत:मुळे लठ्ठपणा वाढतो. साखर, तूप, आवश्यकतेपेक्षा जास्त खाणे, कमी शारीरिक श्रम यामुळे याचा त्रास वाढत असल्याचेही ते शेवटी म्हणाले.आरोग्याविषयी जागरुक नागरिकांशी संवाद साधण्यासाठी आलो आणि इतकी प्रचंड गर्दी पाहून अंगावर मूठभर मांस चढले आहे. मात्र, हे मांस पोटावर येऊ नये, अशी आशा दीक्षित यांनी भाषणाच्या प्रारंभी व्यक्त केली. आपण इतक्या ठिकाणी कार्यक्रम केले, पण केवळ नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती व्हावी, या एकाच उद्देशाने काका गोळे फाउंडेशनने हे व्याख्यान आयोजित केले आहे, हे पाहून मनाला समाधान वाटल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न