शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

...तर उद्धव ठाकरे जबाबदार असतील; SRPF च्या विविध मागण्यांसाठी गेले २० दिवस घरातच उपोषण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2021 22:57 IST

SRPF Agitation: समाजसेविका अश्विनी केंद्रे या किडनी विकाराने ग्रस्त असून आमची मागणी पूर्ण होत नाही तो पर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहणार असल्याचे सांगितले होते.

ठाणे : राज्य राखीव पोलीस बलाची जिल्हा बदली 15 वर्षा ऐवजी 10 वर्ष करावी यासाठी गेल्या 20  दिवसांपासून समाजसेविका अश्विनी केंद्रे यांनी घरातच उपोषण सुरू केलं होते. या आंदोलनाची सुरुवात मार्च 2019 पासून केली असून या आंदोलनासाठी त्यांनी मुंबई ते ठाणे शासकीय कार्यालयाबाहेर देखील आंदोलन केले होते. या दरम्यान समाजसेविका अश्विनी केंद्रे यांनी मुंडन आंदोलन देखील केलं आहे.

समाजसेविका अश्विनी केंद्रे या किडनी विकाराने ग्रस्त असून आमची मागणी पूर्ण होत नाही तो पर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहणार असल्याचे सांगितले होते. मात्र आज त्यांची प्रकृती गंभीर झाली असून श्वास घेण्यास त्रास होत होता यावेळी मुंब्रा पोलिसांनी त्यांच्या घरात येऊन त्यांना थेट कळवा  येथील छत्रपती शिवाजीमहाराज  रुग्णालयात हलवले आहे. यावेळी आंदोलनकर्त्यांनि मज्जाव केला असून जर माज्या जीवितास काही झाले तर याला जबाबदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे असतील, असे आंदोलन कर्त्या अश्विनी केंद्रे यांनी सांगितले.

2 फेब्रुवारी रोजी विधान भवन येथे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यानी बैठक आयोजित केली होती.या बैठकीस समाजसेवक अमोल केंद्रे , SRPF  च्या ADG मॅडम अर्चना त्यागी व विधान सभा अध्यक्ष यांच्यात जिल्हा बदली 10 वर्ष करण्यासाठी चर्चा झाली.विधान सभा अध्यक्ष नाना पटोले साहेबांनी आम्ही लवकर 100% मार्ग काढून निर्णय देवू असे सांगितले.परंतु जो पर्यंत निर्णय होत नाही तो पर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार असे सांगितले.

समाजसेविका अश्विनी अमोल केंद्रे यांनी. 1 डिसेंबर रोजी मंत्रालय येथे मोर्चा आयोजित केला परंतु 9 जणांना अटक केली त्यानंतर सुटल्यावर मुंडण करून सरकारचा निषेध केला होता.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरेPoliceपोलिसNana Patoleनाना पटोले