शहरं
Join us  
Trending Stories
1
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
2
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
3
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
4
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
5
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
6
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
7
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
8
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
9
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
10
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
11
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
12
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
13
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
14
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
15
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
16
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
17
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
18
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
19
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
20
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक

माझ्या नादी लागाल, तर पाठीची सालपटं सोलून काढेन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 05:37 IST

गणेश नाईक यांची जीभ घसरली; एकनाथ शिंदेंवर केला पलटवार; ठाण्यातील सभेत मोदींवरही टीकास्त्र

ठाणे : निवडणुकीत स्वत: उभा नसलो, तरी दुसऱ्यांसाठी आम्ही कसे लढतो, हे या वेळी नाईक कुटुंब दाखवून देईल. कोणी कोणत्याही पदावर असेल, तरी मी घाबरत नाही. मी कोणाच्या नादाला लागत नाही; पण माझ्या नादी लागाल तर पाठीची सालपटं सोलून काढेन, असा गंभीर इशारा राष्टÑवादीचे नेते गणेश नाईक यांनी मंगळवारी भरसभेत दिला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाईक यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली होती. नाईक यांनीही शिंदे यांचे नाव न घेता त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. लोकसभेची बाजी मारण्यासाठी आजी आणि माजी पालकमंत्र्यांनी कंबर कसली असल्याने ही निवडणूक त्यांच्या अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.

राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या प्रचारार्थ मंगळवारी ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात गणेश नाईक बोलत होते. या प्रचारसभेसाठी काँग्रेसचे प्रवक्ते, खासदार हुसेन दलवाई, माजी पालकमंत्री गणेश नाईक, आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष मनोज शिंदे, गटनेते विक्रांत चव्हाण, कामगार नेते विश्वास उटगी आदी उपस्थित होते.

ठाणे लोकसभेसाठी सुरुवातीला गणेश नाईक यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती; मात्र त्यांनी उमेदवारी घेण्यास स्पष्ट नकार दिला होता. या मुद्द्यावरून युतीच्या मेळाव्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी, पराभवाच्या भीतीने मैदान सोडल्याची टीका गणेश नाईक यांचे नाव न घेता केली होती. शिंदे यांच्या टीकेला गणेश नाईक यांनी आघाडीच्या प्रचारसभेत प्रत्युत्तर दिले. माझ्या नादी लागाल, तर सालपटं काढून सोडेन, असा इशाराच त्यांनी या वेळी दिला. २००९ च्या निवडणुकीत मी जेवढा गंभीर नव्हतो, तेवढा गंभीर या निवडणुकीत आहे. पालकमंत्री, खासदार आणि आमदार अशी पदे एकाच कुटुंबाला मिळवून देणे, हे केवळ शरद पवारच करू शकतात, असेही त्यांंनी या वेळी स्पष्ट केले.

काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी ही निवडणूक म्हणजे विचारांची लढाई असल्याचे सांगितले. भाजपला या देशातील गांधीवाद संपुष्टात आणून गोडसेवाद रुजवायचा असल्याचा आरोपही त्यांनी केला. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी राहुल गांधी यांच्या जाहीरनाम्याचा उल्लेख करत, या देशाच्या नसानसांत काँग्रेस असून माझ्या रक्तातही काँग्रेस असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी त्यांनी मोदींचे कारनामे सांगणारी स्वरचित कविता सादर केली. काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज शिंदे यांनीदेखील कार्यकर्त्यांमध्ये आपल्या भाषणामधून आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला.‘सत्ताबदल झाल्यानंतर ‘ते’ही देशाबाहेर पळून जातील’या प्रचारसभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. मुंबईचे गँगस्टर सर्वाधिक घातक असतील, असे मला आधी वाटायचे; मात्र गुजरातचा इतिहास पाहिल्यावर माझा गैरसमज दूर झाला. सर्वाधिक घातक माफिया गुजरातचेच असल्याचा आरोप त्यांनी केला.च्एका न्यायाधीशाच्या खुनानंतरही न्याय मिळत नसेल, तर आपल्या देशात लोकशाही राहिली आहे का, असा सवालही त्यांनी केला. साधारणपणे रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर हा कॉमर्स शाखेचा असावा, असा नियम आहे; पण आरबीआयचे सध्याचे गव्हर्नर कला शाखेचे आहेत. न्या. लोहिया, राफेल प्रश्नावर जनतेने प्रतिक्रिया दिली नाही, तर २०२४ मध्ये निवडणुका होणार नाहीत.

भाजप सरकारकडून सत्य दाबले जात आहे. खोट्यानाट्या गोष्टी काढून जनतेची दिशाभूल केली जात आहे. या सत्ताधाऱ्यांनी ज्या चोरांना साहाय्य केले, ते परदेशात पळून गेले आहेत. सत्ताधारी मंडळी गुन्हेगारी मानसिकतेची असून, सत्ताबदल झाल्यानंतर ते थेट नेपाळमार्गे परदेशात पळून जातील, अशी खिल्लीही नाईक यांनी उडवली.

टॅग्स :Ganesh Naikगणेश नाईकEknath Shindeएकनाथ शिंदेlok sabhaलोकसभा