शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
2
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
3
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
4
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
5
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
6
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
7
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
8
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
9
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
10
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
11
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
12
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
13
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
14
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
15
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
16
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
17
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
18
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
19
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
20
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस

राज्यात सीएए बद्दल बोलता येत नसेल तर ते लांच्छनास्पद आहे: सुनील देवधर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 22:41 IST

भारताची नागरिकता या विषयावर बोलता येत नाही हे चालणार नाही.

डोंबिवली:  राज्यात सीएए बद्दल बोलता येत नाही तर ते लांच्छनास्पद असेल, त्यामुळे व्याख्यानाचा विषय पूर्वांचलतील बदल असा असला तरीही मी आधी सीएए वरच बोलणार  भले मला अटक झाली तरीही चालेल असे वक्तव्य त्रिपुरा राज्याचे भाजपचे प्रभारी सुनील देवधर यांनी केले. ते म्हणाले की पोलीस यंत्रनेला मी आव्हान देतो की त्यांनी मला अटक करावी. डोंबिवली मध्ये राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या 23 व्या स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेच्या शुभारंभाचे व्याख्यान प्रसंगी पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते.

भारताची नागरिकता या विषयावर बोलता येत नाही हे चालणार नाही, आपण कुठे राहतो, हे काय सुरू आहे असा सवाल करत त्यांनी सध्याच्या महाविकास आघाडीला टोला लगावला. कम्युनिस्ट हा भारताचा एक नंबरचा शत्रू असल्याचे ते म्हणाले. त्रिपुरा राज्यात माणिक सरकारचे पितळ आम्ही उघडे केले. त्यामुळे 25 वर्षे तेथे राष्ट्रगान होऊ दिले नाही ही शोकांतिका होती. त्याची चीड सगळ्यामध्ये होतीच. जेव्हा भाजपचे सरकार आले तेव्हा राज्यपाल राज्याच्या अधिवेशनात आले तेव्हा राष्ट्रगान झालं, हे सगळ्यांनी लक्षात घ्यावे. प्रत्येकाला नागरिकता हवी आहे. इंदिरा गांधी, पंडित नेहरू, मनमोहन सिंग यांनी वेळोवेळी सीएए असायला हवे असे म्हंटले होते, पण दिले कोणीच नाही. ते मोदी सरकारने दिले. 

अवॉर्ड वापसी वाले लोक अवॉर्ड मॅनेज लोक होते हे देखील या निमित्ताने लक्षात घ्यायला हवे. अवर्ड्स दिले पण त्याची रक्कम नाही दिली. पैसे ठेवले, कागद पाठवून दिले. फक्त मोदी विरोध साठी हे सगळं केलं. जगात बोंब सुरू आहे की नागरिकत्व जाईल असे खोट सांगितलं।जातं आहे. मोदी, अमित शहा यांची भाषण ऐका, हा नागरिकता देणारा कायदा आहे, काढून घेणारा नाही हे लक्षात घ्या.  नागरिकत्व आणि एनआररसी हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे भारतात कोण लोक राहतात याची नोंद असली तर फरक काय पडला, एनआरसी असावं असं कोणी सांगितलं तर ते पंडित नेहरूंनी म्हंटल होत. आसाम।मध्ये कोणी आणलं ते उच्च न्यायालयाने आदेश दिले. पण अजून मोदींनी कुठेही एनआरसी मांडलं नाही. त्यामुळे कोणालाही काढलं जाणार नाही. भारतात आलेल्या पाकिस्तान, बांगलादेशमधून घुसखोर आलेल्याना भारतात थांबता येणार नाही हे आवर्जून लक्षात घ्यावे असेही ते।म्हणाले.

फाळणी कोणी मागितली, ते इथं येणार मुंब्रामध्ये राहणार. सीएऐवर नका बोलू असे म्हणणारा पोलीस अधिकारी मुंबऱ्यात जाऊन तेथे काय चालले आहे हे आधी फिरून बघून या असे त्यानाआ सांगा ते येतील का ते बघा असेही देवधर म्हणाले. चितगाव येथून चकमा गायब झालेत, ते आता त्रिपुरा, आसाम, मिझोराम येथे ते आहेत. ते।मूळचे कुठले आहेत याचा अभ्यास करावा. 70 वर्षांपासून ते भारतात रहात आहेत. त्यांना भारताचे नागरिकत्व नाही हे त्यांच्यात भय आहे. अनेक प्रख्यात अभिनेत्यांची नाव घेत त्यांनी त्यांच्या मूळ नावाची माहिती सगळ्या उपस्थितांना दिली.

व्यासपीावर संस्थाध्यक्ष डॉ सुभाष वाघमारे,उपाध्यक्ष विलास जोशी,कार्यवाह डॉ दीपक कुलकर्णी हे उपस्थित होते. स्वागत गीत व ईशस्तवन आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. अरुणोदय माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी करिष्मा संजय काळे हिने म्हटलेल्या संपूर्ण  वंदे मातरम् गीताने कार्यक्रमाचा समारोप झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आश्रम शाळेचे मुख्याध्यापक हेमंत चोपडे यांनी केले.पाहुणे परिचय संस्था सदस्य विद्याधर शास्त्री यांनी केला तर आभार अरुण ऐतवडे यांनी मानले.

दरम्यान, दुपारपासून शहरात असलेल्या देवधर यानी भाजपच्या नगरसेवक कार्यकर्त्यांशी चर्चा केली. सीएए विषयावर प्रश्न, शंका निरसन केले. आमदार रवींद्र चव्हाण यांच्यासमवेत देवधर यांनी काही काळ चर्चा केली.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकBJPभाजपाIndiaभारतMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMaharashtraमहाराष्ट्रdombivaliडोंबिवलीthaneठाणे