शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
5
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
6
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
8
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
9
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
10
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
11
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
12
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
13
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
14
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
15
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
16
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
17
गोंधळ घालत मनसैनिकांची मुख्याध्यापिकेला मारहाण
18
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
19
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
20
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"

राज्यपालांकडे फाईल गेली की जास्त दिवस थांबते!, उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांची कोपरखळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 05:56 IST

विद्यापीठातही अशा प्रकारचे युवा साहित्य संमेलन व्हावे, अशी माझी इच्छा आहे. त्याचा प्रस्तावदेखील तयार करू; परंतु त्याची फाईल मंजुरीकरिता राज्यपालांकडे पाठवावी लागेल.

ठाणे :  

विद्यापीठातही अशा प्रकारचे युवा साहित्य संमेलन व्हावे, अशी माझी इच्छा आहे. त्याचा प्रस्तावदेखील तयार करू; परंतु त्याची फाईल मंजुरीकरिता राज्यपालांकडे पाठवावी लागेल. राज्यपालाकंडे फाईल गेल्यावर जास्त दिवस थांबते, असा आमचा अनुभव असल्याची कोपरखळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भगतसिंह कोश्यारी यांचा नामोल्लेख न करता मारली.

प्रस्तावाची फाईल मंजूर करण्यासाठी वेळ पडल्यास मधू मंगेश कर्णिक यांना घेऊन जाऊ; किमान त्यामुळे तरी फाईल लवकर मंजूर होईल, अशी टिप्पणीही त्यांनी केली. अ. भा. साहित्य, नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाकरिता होणाऱ्या निवडणुका, वाद यांमुळे तीन महिने अगोदरच या अध्यक्षपदाचा मान संपतो, असा टोला सामंत यांनी साहित्यिकांना लगावला.कोकण मराठी साहित्य परिषद आणि ठाणे महापालिका यांच्यातर्फे डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित दुसऱ्या युवा साहित्य संमेलनाचे प्रमुख पाहुणे  म्हणून सामंत उपस्थित होते. यावेळी त्यांच्यासमवेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू भालचंद्र मुणगेकर, कोमसपचे अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक, संमेलनाचे अध्यक्ष प्रणव सखदेव, स्वागताध्यक्ष नरेश म्हस्के उपस्थित होते. सामंत म्हणाले की, अ. भा. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष निवडायचे झाल्यास तीन-तीन महिने खलबते चालतात. कोण अध्यक्ष होणार, त्याचा कार्यकाळ काय, किती पुस्तके लिहिली, याची चर्चा होते. परंतु युवा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड बिनविरोध करण्यात आली. हे चांगल्याचे लक्षण आहे. युवा साहित्य संमेलनाने पाडलेला पायंडा अ. भा. मराठी साहित्य संमेलनाने आचरणात आणावा, असे सामंत म्हणाले. साहित्यामध्ये किंवा साहित्यिकांमध्ये निवडणूक कसली करायची? निवडणूक आम्ही राजकीय नेते लढवतो ते बस्स आहे. साहित्य, नाट्यसंमेलन अध्यक्षपदासाठी निवडणूक घेताना वाद होत असल्यामुळे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान हा तीन महिने आधीच संपतो, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. यापुढील युवा साहित्य संमेलन रत्नागिरीला करुया, असा प्रस्ताव त्यांनी मांडला. जिल्ह्याच्या स्तरावर तेथील प्रत्येक कलाकारांची, साहित्यिकांची स्मारके तयार झाली पाहिजे, असे सामंत यांनी सांगितले. यापुढील परीक्षा ऑफलाइनमहाराष्ट्रातील विद्यार्थी कोणत्याही संकटाला घाबरत नाहीत. ज्यावेळेस संकट होते, त्यावेळी ऑनलाइन परीक्षा घेतल्या, वेळप्रसंगी रद्दही केल्या; परंतु प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचा संवाद झाला पाहिजे. शिक्षण जर ऑनलाइन झाले तर त्याचे तीनतेरा वाजू शकतात. त्यामुळे परीक्षा ऑफलाइन घेणे हेच योग्य असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.राजकारण्यांचे कवी संमेलन घ्यासाहित्य संमेलनात एकदा राजकारण्यांचे कवी संमेलन घ्या, अशी विनंती सामंत यांनी केली. त्याचे अध्यक्ष कोण असतील, हे तुम्हाला माहिती आहे, असे सामंत बोलताच सभागृहात हशा पिकला. मी कोणाचेही नाव  घेतले नाही, कुणाचे नाव घेऊन कुठे माझी चौकट छापून येईल, असे मी काही करत नसल्याची कोपरखळी  त्यांनी रामदास आठवले यांचे नाव न घेता त्यांना लगावली. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी स्त्रियांच्या बाबतीत भारताइतकी वाईट स्थिती कोणत्याही देशात नसल्याचे मत व्यक्त केले. स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनंतर स्त्री सक्षम होणे दूर राहिले. तिच्या संरक्षणाचा मुद्दादेखील सुटू शकला नाही, याबद्दल खंत व्यक्त केली.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी