शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

मी एक अपघाती लेखक, माझा अनुभव लिहिला; विश्वास नांगरे पाटीलांनी लिखाणामागची गोष्ट सांगितली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 21:44 IST

साहित्यविश्वातील उत्तुंग लेखक आणि कवींचा सन्मान करणारा 'लोकमत साहित्य पुरस्कार' आज ठाण्यात पार पडला.

ठाणे- साहित्यविश्वातील उत्तुंग लेखक आणि कवींचा सन्मान करणारा 'लोकमत साहित्य पुरस्कार' आज ठाण्यात पार पडला. साहित्य अकादमी, ज्ञानपीठ अशा अनेक नामवंत पुरस्कारांनी सन्मानित झालेले ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना त्यांच्या प्रदीर्घ साहित्य सेवेसाठी 'जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आलं. यावेळी आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील आणि साहित्यिक पानिपतकार विश्वास पाटील उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपल्या लेखनासंदर्भात अनुभव सांगितले. 

धर्म आणि राष्ट्रीयतेमुळे देशाचं नुकसान, भालचंद्र नेमाडेंचं परखड मत; 'अच्छे दिन' काय तेही सांगितलं!

विश्वास नांगरे पाटील म्हणाले, २०१२ पर्यंत मी फक्त ड्युटीमध्ये होतो. नंतर माझी अँटी करप्शनला बदली झाली, त्यावेळी मला शनिवारी आणि रविवारी वेळ मिळालाचा. यावेळी मी तीन महिन्याची रजा घेऊन पहिलं पुस्तक लिहिलं. आणि कोरोना काळात दुसरं पुस्तक लिहिलं.  

'विश्वास पाटील सरांनी जेवढी पुस्तक लिहिली आहेत, तेवढी पुस्तक मी वाचलेली नाही. मी मला पोलीस खात्यात आलेले अनुभव लिहिले आहेत. मी युपीएससी परीक्षेत यश मिळेपर्यंतचा प्रवास 'मन मैं है विश्वास' या पुस्तकात लिहिला. यानंतर पुढचा प्रवास 'कर हर मैदान फतें' या पुस्तकात लिहिला आहे, असंही विश्वास नांगरे पाटील म्हणाले.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनीही लहानपणीच्या आठवणी सांगितल्या. विश्वास पाटील म्हणाले, माझ्या आणि विश्वास नांगरे पाटलांच्या गावात अंतर ४ किलोमीटचे आहे. आम्ही यांच्या गावात शाळेसाठी जात होतो. मी जाताना डेअरीत दूध देण्यासाठी जात होतो. तेव्हा त्या डेअरीचे चेअरमन विश्वास नांगरे पाटलांचे वडिल होते. त्यामुळे आमच्या दोघांचे नाते पाण्यासारखं गोड आहे, अशी आठवण विश्वास पाटील यांनी सांगितली. 

टॅग्स :Vishwas Nangare Patilविश्वास नांगरे-पाटीलPoliceपोलिस