शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

हुश्शssss ... आमदार तर एकदाचे झाले ! गंगेत घोडे न्हाले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 19:43 IST

सर्वोच्च न्यायालयानेदेखील विजयी उमेदवारांना सर्वप्रथम 'आमदार' पदाची शपथ विधानसभा सभागृहात प्रथम प्राधान्याने देण्याचे आदेश जारी केले

सुरेश लोखंडे 

ठाणे : विजयश्री प्राप्त करुनही सत्ता संघर्षाच्या वादात नेमकाच आमदार पदाचा शपथ विधी महिन्या भरापासून रखडला होता. त्यामुळे येत असलेल्या समस्या व अडथळे 'जनात जनार्दनानं निवडलं... आमदार परी नाही' या मथळ्याखालील वृत्तात लोकमतने 21 नोव्हेंबरला उघड केले होते. त्यास अनुसरुन अखेर प्राधान्य क्रमाने बुधवारी राज्यातील 288 विजयी उमेदवारांसह ठाणे, पालघर जिल्ह्यातील 24 जणांच्या आमदारकीचा शपथ विधी पार पडला आणि गंगेत घोडे न्हाले...' हुश: ! झाले एकदाचे आमदार आणि सत्ता स्थापनेचा पेच ही दूर' अशी  एकच चर्चा  दिवसभर जिल्ह्यात ऐकायला मिळाली. 

सर्वोच्च न्यायालयानेदेखील विजयी उमेदवारांना सर्वप्रथम 'आमदार' पदाची शपथ विधानसभा सभागृहात प्रथम प्राधान्याने देण्याचे आदेश जारी केले आणि त्यानुसार सर्वांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ आज देऊन 'आमदारकी' बहाल केली.  एक महिन्यापासून 'आमदार' या लोक प्रतिनिधीत्वाचा पेच ही आता दूर झाला . आता या नवनिर्वाचित आमदारांना राजशिष्टाचाराचा 'सलाम' ही प्रशासनाला प्राधान्य क्रमाने घालावाच लागेल, आमदारांच्या हक्कांची व सन्मानाची पायमल्ली होणार नाही यांची काटेकोरपणे दक्षता घ्यावी लागेल. त्यांच्या सूचनांचे आणि मार्गदर्शनांची अंमलबजावणी देखील करावीच लागेल यात आता दुमत नाही. 

निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेसाठी बहुमताचा पेच निर्माण झाला आणि या सत्ता संघर्षात 13 व्या विधानसभेच्या सभागृहाची मुदत संपली होतीआणि ते बरखास्त झाले होते. राज्यपालांच्या निमंत्रणानंतर एकाही पक्षाला बहुमत देता आले नव्हते. यामुळे 14 व्या विधानसभेच्या  सदस्यत्वाची एकाही विजयी उमेदवारास शपथ घेता आली नाही . याच दरम्यान  राष्ट्रपती शासन ही लागू झाले. या राजवटीत 'शपथ' अभावी विजयी उमेदवारास प्रशासनांच्या आमदारकीच्या राज शिष्टाचारपासून वंचित राहावे लागले. त्यांना द्याव्या लागणाऱ्या शासकीय कार्यक्रमांच्या निमंत्रणाची सक्ती प्रशासनावर नव्हती. इच्छा असून शेतकर्‍यांची बाजू अवकाळी पावसाच्या  संकटात मांडता आली नाही.  तब्बल आजपर्यंतच्या एक महिन्याच्या कालावधीनंतर विजयी उमेदवारांना वन बाय वन शपथ घेण्याची संधी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने आज मिळाल्याचे राजकीय तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. आता, आमदारकी पाठोपाठ आता सत्ता स्थापनेचा तिडा ही सुटल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे.

टॅग्स :thaneठाणेMLAआमदार