शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
2
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
3
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
4
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
5
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
6
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
7
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
8
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
9
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
10
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
11
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
12
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
13
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
14
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
15
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
16
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
17
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
18
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
19
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
20
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?

कामवारी नदीच्या संवर्धनासाठी केली मानवी साखळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 00:14 IST

दूषित पाण्यामुळे गटारगंगा; महाविद्यालयांचा पुढाकार, भिवंडीच्या नागरिकांमध्ये केली जाणार जनजागृती

भिवंडी : कामवारी नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर दूषित पाणी सोडल्याने नदीची गटारगंगा झाली आहे. तसेच नदीपात्रात अतिक्रमण केल्याने नदी नामशेष होण्याच्या मार्गावर आली आहे. तिला वाचविण्यासाठी ओसवाल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्नेहल दोंदे यांनी कामवारी बचाव मेहीम हाती घेतली आहे. यासाठी ओसवाल महाविद्यालय व अक्सा गर्ल्स महाविद्यालय येथील एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. या मोहिमेबाबत नागरिकांंमध्ये जागृती करण्याच्या निमित्ताने त्यांनी कामवारी नदी वाचविण्यासाठी प्रजासत्ताक दिनी मानवी साखळी तयार केली होती.कामवारी नदीचा उगम तालुक्यातील देपोली येथे होऊन ३४ किलोमीटर प्रवाह वाहत भिवंडी शहराजवळील खाडीपात्रात मिसळते. या नदीपात्रात बारमाही पाणी टिकावे यासाठी प्रशासनाने ठिकठिकाणी बंधारे बांधून पाणी अडविण्याची उपाययोजना केली आहे. परंतु शहराच्या सीमेजवळ या नदीपात्रात अतिक्रमण झाल्याने पात्र अरूंद होऊ लागले आहे. तर नदीजवळच्या डाइंग व सायजिंग मधील दूषित पाणी प्रक्रिया न करता नदीपात्रात सोडले जाते. तसेच नदीतील पाण्याचा बेकायदा उपसा टँकर माफियांकडून रात्रंदिवस होत असतो. या बाबींकडे महसूल विभाग, प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांचे दुर्लक्ष होत असल्याने या नदीची गटारगंगा झाली आहे.नदीच्या शुध्दीकरणाची काळजी वेळेत न घेतल्यास काही वर्षात या नदीचा नाला होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दोन महिन्यांपूर्वी जलपुरूष डॉ. राजेंद्रसिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत कामवारी बचाव मोहिमेची माहिती देण्यात आली होती. त्यासाठी समाजात जनजागृती होणे गरजेचे असल्याने प्रजासत्ताक दिनी हा उपक्रम हाती घेतल्याची माहिती डॉ. दोंदे यांनी दिली. त्यानिमित्ताने नदीनाका येथील टिळक घाट ते नदीपात्रातील बंधारा व शेलार ग्रामपंचायत हद्दीतील घाटावर विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार केली होती.यंत्रणांचे तक्रारींकडे दुर्लक्षकामवारी नदीपात्राची होणारी दुरवस्था स्थानिक नागरिक उघड्या डोळ्याने पाहत आहे,अशी खंत नदीशेजारी राहणाऱ्या मुख्तार फरीद कुटुंबियांनी व्यक्त केली. या बाबत फरीद यांनी वेळोवेळी सरकारी पातळीवर तहसीलदार, प्रांत कार्यालयात लेखी तक्र ारी केल्या. परंतु आजपर्यंत अधिकाºयांनी दुर्लक्ष केल्याचे त्यांनी सांगितले. नदी शुध्दीकरणाचा उपक्र म यशस्वी करण्यासाठी प्राचार्या उनेझा फरीद, प्राध्यापिका फौजिया अन्सारी यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्र माच्या शेवटी पंचायत समिती सभापती रवीना जाधव व महापालिका उपायुक्त वंदना गुळवे यांना निवेदन सादर केले.

टॅग्स :riverनदीpollutionप्रदूषण