शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

उपेक्षितांची गळचेपी अजून किती काळ ?

By admin | Updated: November 14, 2016 03:51 IST

बेकायदेशीर फेरीवाले रस्ते-फुटपाथ व्यापतात, पण कारवाई होत नाही. अनधिकृत बांधकामे फोफावतात, पण त्यांना पालिका सोयीसुविधा व संरक्षण देते.

बेकायदेशीर फेरीवाले रस्ते-फुटपाथ व्यापतात, पण कारवाई होत नाही. अनधिकृत बांधकामे फोफावतात, पण त्यांना पालिका सोयीसुविधा व संरक्षण देते. मात्र, ज्या अंध-अपंग तसेच चर्मकारांना स्वावलंबी व सक्षम करण्याची गरज आहे, त्यांना उदरनिर्वाहासाठी स्टॉलचे परवाने देण्यास वर्षानुवर्षे छळवणूक सुरू आहे. न्यायालय व शासनाचे आदेश असूनही त्यांचा हक्क नाकारला जात आहे. पालिकेतील सत्ताधारी व प्रशासन स्वार्थी होतेच, पण आता संवेदनाहीन व बधिर झाल्याचे हे लक्षण आहे, असे अंध-अपंगांनी म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. अंध व अपंगांबद्दल विशिष्ट दिनाच्या दिवशी केवळ पोकळ सहानुभूती दाखवली जाते. मात्र, त्यांना स्टॉलचे परवाने देण्यास टाळाटाळ केली जाते. सुरुवातीला त्यांना पीसीओ दिले गेले. मोबाइल व इंटरनेटमुळे ते कालबाह्य झाले. साहजिकच त्यांना रोजगाराचा अन्य पर्याय देणे गरजेचे आहे. चर्मकार समाज आजही अशिक्षित व मागासलेला आहे. पिढ्यान्पिढ्या ते आपला गटई कामाचा पारंपरिक व्यवसाय करून उदरनिर्वाह चालवत आहेत. अनेकांकडे जातीचे पुरावे नसले तरी गटईकामाखेरीज दुसरे काम करीत नाहीत. रस्त्यात जात असताना चप्पल तुटल्यावर भल्याभल्यांना गटई कामगारांची आठवण होते. गटईकाम हीदेखील समाजाची गरज आहे. नगर परिषद काळात १४९ चर्मकारांना गटई स्टॉलचा परवाना दिला होता. महापालिका झाल्यावर आॅगस्ट २००४ मध्ये महासभेने गटई स्टॉल, अंध-अपंग व दूधविक्रीच्या स्टॉलसाठी नवे धोरण निश्चित केले. त्या धोरणात किती अंतरावर स्टॉल असावा, यापासून अनेक अटीशर्ती मंजूर केल्या गेल्या. पालिकेच्या या धोरणास शासनानेदेखील हिरवा कंदिल दाखवला. जून २००५ मध्ये शासनाची मंजुरी मिळाली व पालिकेने शहरात गटईकामाचे नवीन ४९ परवाने दिले. त्यानंतर, आजतागायत पालिकेने नवीन परवाने दिलेच नाहीत. ज्यांना परवाने दिले, त्यांना नूतनीकरणासाठी अडवले जाते. नूतनीकरण न झालेले स्टॉल अनधिकृत ठरवून मोडण्याचा सपाटा प्रशासनाने लावला. शासनाच्या समाजकल्याण खात्याने दिलेले लोखंडी स्टॉलदेखील पालिकेने भुईसपाट केले. स्वत: आमदार, महापौर चर्मकारांच्या स्टॉलवर कारवाई करा, या मागणीसाठी रस्त्यावर बसले. अंध-अपंगांच्या स्टॉलबाबतही पालिकेचे धोरण वेगळे नाही. फुटकळ कारणे पुढे करून त्यांचे स्टॉल उचलले गेले. काही ठिकाणी तर बिल्डर वा अन्य धनदांडग्यांच्या फायद्यासाठी परवाने असलेले स्टॉल बळाचा वापर करून हटवण्यात आले. यामुळे अनेकांची रोजीरोटी उद्ध्वस्त झाली. समाजातील उपेक्षित घटकांची काळजी घेण्याची ‘मन की बात’ केली जाते. मात्र, प्रत्यक्षात पालिका स्तरावर ‘धन की बात’ची चलती सुरू आहे. उपेक्षितांच्या सहनशीलतेचा अंत पाहायचा व त्यांनी हिंसेचा मार्ग अवलंबला तर त्यांच्यावर दमनशक्तीचा वापर करायचा, हे अजून किती काळ सुरू राहणार, हाच सवाल आहे.