शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
2
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
3
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
4
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
5
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
6
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
7
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
8
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
9
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
10
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
11
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
12
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
13
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
14
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
15
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
16
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
17
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
18
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
19
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
20
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!

धर्मनिरपेक्षता टिकवण्याची जबाबदारी आता हिंदूंची- संजय मंगला गोपाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2020 1:04 AM

‘टॉक शो’मध्ये मांडले मत

ठाणे : देश स्वतंत्र झाला, त्यावेळी फाळणीला आणि धर्माधिष्ठित पाकिस्तानात जाण्यास नकार देऊन भारतीय मुसलमानांनी धर्मनिरपेक्षता सिद्ध केली. सद्य:स्थितीत नागरिकता दुरु स्ती कायदा आणि त्यानंतर अपेक्षित जनसंख्या आणि नागरिक नोंदणीतून या देशाला धर्माधिष्ठित राष्ट्र बनू न देणे, ही हिंदू नागरिकांची जबाबदारी आहे, अशा शब्दांत संजय मंगला गोपाळ यांनी मत मांडले.

महात्मा गांधी स्मृती दिनानिमित्त संविधान, नागरिकता आणि युवकांचे हक्क या विषयावर समता विचार प्रसारक संस्था आणि म्यूज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच आयोजित टॉक शोच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय मंगला गोपाळ होते. यावेळी कायद्याने वागा चळवळीचे राज असरोंडकर म्हणाले की, विविध धर्म, जाती, संस्कृती, वैविध्यातून देश घडला आहे. संविधानाने सर्वांना एका सूत्रात बांधले आहे. संविधानाने जसे धर्म आणि उपासनेचे स्वातंत्र्य बहाल केले आहे, तसेच विवेकवादी बनण्याची दिशाही अधोरेखित केली आहे.

संविधान, नागरिकता आदी मुद्यांवर संवाद प्रक्रिया सुरू ठेवू या. प्रत्येकाला स्वत:चे मत असायला हवे, त्याबरोबरच दुसऱ्यांचे मत ऐकण्याचे सामर्थ्यही असायला पाहिजे. आपले मत दुरु स्त करण्याची तयारीदेखील असली पाहिजे. लेखक आणि संविधान अभ्यासक सुरेश सावंत म्हणाले, संविधान हा एक संकल्प आहे. एका लांब प्रक्रि येतून संविधानाची निर्मिती झाली आहे. लोकांनी निवडून दिलेल्या ३९९ संविधान सभेतील प्रतिनिधींनी प्रदीर्घ चर्चा आणि वाद यातून संविधान निर्माण केले आहे. नागरिकता कायद्यातील दुरु स्ती हे तत्त्व म्हणून संविधानाच्या भूमिकेविरोधी आहे.

‘ओपिनियन फोरम बनवा’

विद्यार्थ्यांनी या प्रश्नावर पालकांशी संवाद साधला पाहिजे. युवकांच्या जडणघडणीसाठी ‘एक ओपिनियन फोरम’ बनवावा, असा सल्ला लघुपटकार डॉ. संतोष पाठारे यांनी यावेळी दिला.

टॅग्स :HinduismहिंदुइझमthaneठाणेMaharashtraमहाराष्ट्र