शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
3
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
4
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
5
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
6
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
7
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
8
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
9
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
10
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
11
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
12
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
13
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
15
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
16
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
17
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
18
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
19
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
20
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 

यंदा हापूस महाग, तर कर्नाटकी आंबा स्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 4:41 AM

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : आंबा म्हटले की, सगळ्य़ांच्याच तोंडाला पानी सुटते. आंबा हा फळांचा राजा असला तरी यालाही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : आंबा म्हटले की, सगळ्य़ांच्याच तोंडाला पानी सुटते. आंबा हा फळांचा राजा असला तरी यालाही लॉकडाऊनचा फटका बसला आहे. बाजारात विविध प्रकारचे आंबे असून, त्यांच्या विक्रीवर लॉकडाऊनचा परिमाण झाला आहे. लॉकडाऊनमध्ये होलसेल व्यापाऱ्यांना दोन तासांची मर्यादा आखून दिली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून आंब्याची मागणी कमी केली जात आहे. एकीकडे होलसेल बाजारात आंब्याला दीडपट कमी भाव मिळत असला तरी किरकोळ बाजारात हा भाव दीडपटीने जास्त आहे.

बाजारात रत्नागिरीचा हापूस कमी असून कर्नाटकी हापूस जास्त आहे. हापूसच्या जोडीला केशर, पायरी, गावरान आंब्याचीही विक्री केली जात आहे. दशेरी हा आंबा उत्तर भारतातून येतो. त्यालाही मागणी आहे. सध्या बाजारात केशर आणि दशेरी आंब्याची चलती आहे. त्याच्या जोडीला तोतापुरी, अलीबाग, बदाम या आंब्याची विक्री होत आहे. सामान्यांना हापूस परवडत नसल्याने त्यांच्याकडून तोतापुरी, बदाम आणि अलिबाग आंब्याला पसंती दिली जात आहे. मागच्या वर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन लागला. त्यावेळी व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला. कारण त्यावेळी शिथिलता नव्हती. फळबाजार सुरू होता. मात्र, मागचे वर्ष फारसे तेजीचे नव्हते. यंदाही फारसी तेजी नाही.

------------

आंबा व्यापारी कोट

१. कोरोनामुळे संचारबंदी आहे. बाजाराची वेळ केवळ दोन तासच आहे. दोन तासांत धंदा काय करणार? त्यामुळे आम्ही माल कमी मागवत आहोत.

- बिसमिल्ला शेख, कल्याण

२. भाव कमी आहे. बाजारात ग्राहक नाहीत. त्यामुळे यंदा आंब्याने निराशा केली आहे. माल मागवून करणार काय? तो खराब होणार. होलसेलला भाव कमी आहे.

-हमीद बाबू, कल्याण

-------------

आंबा उत्पादक शेतकरी अडचणी

१. यंदा अवकाळी पावसामुळे हापूसचे उत्पादन फारसे झाले नाही. त्यामुळे बाजारात कर्नाटकी हापूसला मागणी जास्त आहे. त्यामुळे यंदा हापूस जास्त नाही.

-आबा केसरकर, शेतकरी

२.लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांना विक्रीची वेळ कमी दिली आहे. त्यांच्याकडून मालाची मागणी केली जात नाही. त्यामुळे आम्हाला आंबा शेतात विकण्याची वेळ आली आहे. त्याला भाव जास्त नाही. शहरात भाव जास्त मिळतो.

-दिलीप भोगले, शेतकरी.

-------------

आवक असली तरी आम्हीच माल कमी मागवितो

सध्या रत्नागिरी हापूसपेक्षा कर्नाटकी हापूस बाजारात जास्त आहे. कोकणातील हापूस आंब्याऐवजी गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून आंब्याची आवक आहे. बाजारात रत्नागिरी हापूस महाग असल्याने सामान्य लोक केशर आंब्याला पसंती देत आहेत. शेतकऱ्यांचे फोन येतात. माल घेता का, म्हणून विचारतात. मात्र, माल मागवून काय करणार? कमी वेळेत धंदा काय करणार? घेतलेला माल वेळेत विकला नाही तर तो खराब होणार. त्यामुळे व्यापारीच माल कमी मागवत आहेत.

-------------

आंब्याचे दर

हापूस (रत्नागिरी)-६०० ते ७०० रुपये डझन

हापूस (कर्नाटक) - ७० रुपये प्रतिकिलो

-------------

आंब्याचे प्रतिकिलो दर (किरकोळ)

केशर-१०० रुपये

पायरी-८० रुपये

गावरान-६० रुपये

-------------

आंब्याचे प्रतिकिलो दर (घाऊक)

केशर-७० रुपये

पायरी-४० रुपये

गावरान-३० रुपये

-------------