शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

कल्याणच्या पत्रीपुलाचे बांधकाम लष्कराकडे हस्तांतरित करा; आमदार नरेंद्र पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 7:18 PM

कल्याण-डोंबिवली शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा अंदाजे १०० वर्षापूर्वीचा पत्रीपूल पाडून नवीन पूल बांधण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.

कल्याण-डोंबिवली शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा अंदाजे १०० वर्षापूर्वीचा पत्रीपूल पाडून नवीन पूल बांधण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र गेली अनेक महिने कामामध्ये प्रगती जाणवत नाही. वाहतूक वाढल्याने नवीन समांतर पुलावर वाहतूक कोंडी होत असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहेत. प्रशासन गतीने काम करत नसल्याने कल्याणकरांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागत असल्याने आमदार नरेंद्र पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत पत्रीपूलाचे बांधकाम तातडीने लष्कराकडे हस्तांतरीत करण्याची मागणी केली. 

आंबिवली रेल्वे स्थानकावरचा पूल लष्कराने विक्रमी वेळात उभारल्याचे उदाहरण समोर असल्याने पत्रिपुलाचे बांधकामही लष्कराकडे सोपविण्यासंदर्भात आमदार नरेंद्र पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. नुकताच पत्रिपुलावर एका व्यक्तीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाला आहे. नवीन पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजनही काही महिन्यांपूर्वी झाले आहे, मात्र कामात गती येत नसल्याने आमदार पवार यांनी ही मागणी केली आहे. या पूलावरुन नवी मुंबई, पनवेल, अंबरनाथ, उल्हासनगर, डोंबिवली तसेच लांब पल्ल्याच्या वाहनांची रहदारी असते. मात्र जुना पूल तोडल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे याचा फटका केवळ कल्याण – डोंबिवली नागरिकांनाच बसत नाही तर रुग्णवाहिकांनाही सहन करावा लागत आहे.    

यासंदर्भात पत्रिपुलाचे बांधकाम लष्कराकडे सोपविण्यासाठी तातडीने संबंधित विभागासा आदेश देऊन नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका करावी अशीही मागणी आमदार नरेंद्र पवार यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका