शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

गुजरातची ‘पानीकम’ शहाळी विक्रीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 04:42 IST

नारळाच्या दरात रुपयाची वाढ : मसाले, सुपारी १०० ते ३०० रुपयांनी महागले

मुरलीधर भवार

कल्याण : केरळला भीषण पुराचा तडाखा बसल्याने कल्याणच्या घाऊक बाजारात नारळ आणि मसाल्याची आवक घटली आहे. शहाळी विकणाऱ्या विक्रेत्यांना सध्या गुजरातमधून ती आणावी लागत आहेत. मात्र, पूजाअर्चा आणि जेवणात खोबºयाकरिता वापरल्या जाणाºया नारळाच्या दरात एक रुपयाने वाढ झाली असून गणेशोत्सव काळात नारळाचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. केरळहून होणारी मसाल्याची आवकही घटल्याने मसाल्याचे दरही वाढले आहेत. मात्र, मसाला पावसाळ्यात केला जात नसल्याने त्याची झळ तूर्तास सर्वसामान्य नागरिकांना बसत नसली, तरी मोठ्या प्रमाणावर मसाले खरेदी करणाºया हॉटेल व्यावसायिकांना बसली आहे. परिणामी, कालांतराने हॉटेलातील तडका महाग होण्याची शक्यता आहे.

कल्याणमधील नारळ-शहाळेविक्रेते कैलास राखोंडे यांनी सांगितले की, ते ३० वर्षांपासून शहाळेविक्रीचा व्यवसाय करत आहेत. केरळमधून होणारी शहाळ्यांची आवक बंद झाली आहे. कल्याणमध्ये मुख्यत्वे केरळ आणि कर्नाटकातून शहाळे येतात. पावसाचा फटका कर्नाटकलाही बसला असल्याने त्याठिकाणाहून माल कमी येतो. सध्या गुजरातमधून शहाळी येत आहेत. एका शहाळ्याची किंमत ३२ रुपये असून दर वाढलेला नाही. पण, केरळच्या शहाळ्यात जास्त पाणी असते. त्या तुलनेत गुजरातच्या शहाळ्यात कमी पाणी असते. आम्ही किरकोळ विक्रेते असल्याने आम्हाला गुजरातचा माल विकत घेऊन धंदा करावा लागत आहे. हेच शहाळे डोंबिवलीत ४० रुपये दराने विकले जात आहे. पावसाळ्यात शहाळ्याला मागणी कमी असल्याने दर फार वाढलेले नाहीत, असे ते म्हणाले.कैलास ज्यांच्याकडून शहाळी घेतात, ते घाऊक विक्रेते साजन मोहंमद सय्यद यांच्याकडे विचारणा केली असता सध्या गुजरातची शहाळी आणली जात आहे. केरळला पूर येण्यापूर्वी दोन ट्रक माल दररोज येत होता. आता गुजरातहून येणाºया एक ट्रक मालावर भागवून घ्यावे लागत आहे. केरळमधून शहाळ्यांची आवक ठप्प झाली आहे. रोजच्या जेवणात वापरल्या जाणाºया नारळाचे होलसेल व्यापारी बी.डी. भानगडे यांनी सांगितले की, लहान नारळ हा सध्या नऊ रुपये दराने विकला जात असून मोठ्या नारळाचा भाव ३० रुपये आहे. घाऊक बाजारात लहान व मोठ्या नारळांच्या किमतीत एक रुपयाने वाढ झालेली आहे. अर्थात, हा नारळ मद्रासहून येतो. त्याचा केरळशी संबंध नाही. केरळच्या पुरामुळे या नारळाची आवक घटली आहे. गणेशोत्सव १५ दिवसांवर येऊन ठेपला आहे.हॉटेलांमधील तडका महाग होण्याची शक्यताच्मसाल्याचे व्यापारी श्रीनिवास चंद्रकांत म्हणाले की, केरळ हे मसाल्याचे बंदर आहे. केरळ बंदराला पुराचा तडाखा बसल्याने इम्पोर्टेड मसाल्याची आवक ठप्प आहे. हिरवी वेलची पुराच्या आधी १४०० रुपये किलोने विकली जात होती. पुरानंतर आवक घडल्याने वेलचीचा भाव किलोला १७०० रुपये झाला आहे.च्काळी मिरी पुराच्या आधी ५०० रुपये किलो दराने विकली जात होती. आता ६०० रुपये किलोने विकली जात आहे. तर सुपारी २७० रुपये किलो दराने विकली जात होती. सुपारीचा भाव किलोला ३१० रुपये झाला आहे. मसाले पावसाळ्यापूर्वी मे महिन्याच्या आत तयार केले जातात.च् सध्या श्रावण महिना सुरू आहे. त्यामुळे घरगुती मसाल्याची मागणी सध्या फारशी नाही. मात्र, हॉटेल व्यावसायिकांना मसाले रोजच लागतात. त्यांच्याकरिता मसाला महागला आहे. साहजिकच, मसाले असेच अधिक महागले तर हॉटेलांमधील ‘तडका’ महागण्याची शक्यता यानिमित्ताने वर्तवली जात आहे.

टॅग्स :thaneठाणेGujaratगुजरात