शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातची ‘पानीकम’ शहाळी विक्रीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 04:42 IST

नारळाच्या दरात रुपयाची वाढ : मसाले, सुपारी १०० ते ३०० रुपयांनी महागले

मुरलीधर भवार

कल्याण : केरळला भीषण पुराचा तडाखा बसल्याने कल्याणच्या घाऊक बाजारात नारळ आणि मसाल्याची आवक घटली आहे. शहाळी विकणाऱ्या विक्रेत्यांना सध्या गुजरातमधून ती आणावी लागत आहेत. मात्र, पूजाअर्चा आणि जेवणात खोबºयाकरिता वापरल्या जाणाºया नारळाच्या दरात एक रुपयाने वाढ झाली असून गणेशोत्सव काळात नारळाचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. केरळहून होणारी मसाल्याची आवकही घटल्याने मसाल्याचे दरही वाढले आहेत. मात्र, मसाला पावसाळ्यात केला जात नसल्याने त्याची झळ तूर्तास सर्वसामान्य नागरिकांना बसत नसली, तरी मोठ्या प्रमाणावर मसाले खरेदी करणाºया हॉटेल व्यावसायिकांना बसली आहे. परिणामी, कालांतराने हॉटेलातील तडका महाग होण्याची शक्यता आहे.

कल्याणमधील नारळ-शहाळेविक्रेते कैलास राखोंडे यांनी सांगितले की, ते ३० वर्षांपासून शहाळेविक्रीचा व्यवसाय करत आहेत. केरळमधून होणारी शहाळ्यांची आवक बंद झाली आहे. कल्याणमध्ये मुख्यत्वे केरळ आणि कर्नाटकातून शहाळे येतात. पावसाचा फटका कर्नाटकलाही बसला असल्याने त्याठिकाणाहून माल कमी येतो. सध्या गुजरातमधून शहाळी येत आहेत. एका शहाळ्याची किंमत ३२ रुपये असून दर वाढलेला नाही. पण, केरळच्या शहाळ्यात जास्त पाणी असते. त्या तुलनेत गुजरातच्या शहाळ्यात कमी पाणी असते. आम्ही किरकोळ विक्रेते असल्याने आम्हाला गुजरातचा माल विकत घेऊन धंदा करावा लागत आहे. हेच शहाळे डोंबिवलीत ४० रुपये दराने विकले जात आहे. पावसाळ्यात शहाळ्याला मागणी कमी असल्याने दर फार वाढलेले नाहीत, असे ते म्हणाले.कैलास ज्यांच्याकडून शहाळी घेतात, ते घाऊक विक्रेते साजन मोहंमद सय्यद यांच्याकडे विचारणा केली असता सध्या गुजरातची शहाळी आणली जात आहे. केरळला पूर येण्यापूर्वी दोन ट्रक माल दररोज येत होता. आता गुजरातहून येणाºया एक ट्रक मालावर भागवून घ्यावे लागत आहे. केरळमधून शहाळ्यांची आवक ठप्प झाली आहे. रोजच्या जेवणात वापरल्या जाणाºया नारळाचे होलसेल व्यापारी बी.डी. भानगडे यांनी सांगितले की, लहान नारळ हा सध्या नऊ रुपये दराने विकला जात असून मोठ्या नारळाचा भाव ३० रुपये आहे. घाऊक बाजारात लहान व मोठ्या नारळांच्या किमतीत एक रुपयाने वाढ झालेली आहे. अर्थात, हा नारळ मद्रासहून येतो. त्याचा केरळशी संबंध नाही. केरळच्या पुरामुळे या नारळाची आवक घटली आहे. गणेशोत्सव १५ दिवसांवर येऊन ठेपला आहे.हॉटेलांमधील तडका महाग होण्याची शक्यताच्मसाल्याचे व्यापारी श्रीनिवास चंद्रकांत म्हणाले की, केरळ हे मसाल्याचे बंदर आहे. केरळ बंदराला पुराचा तडाखा बसल्याने इम्पोर्टेड मसाल्याची आवक ठप्प आहे. हिरवी वेलची पुराच्या आधी १४०० रुपये किलोने विकली जात होती. पुरानंतर आवक घडल्याने वेलचीचा भाव किलोला १७०० रुपये झाला आहे.च्काळी मिरी पुराच्या आधी ५०० रुपये किलो दराने विकली जात होती. आता ६०० रुपये किलोने विकली जात आहे. तर सुपारी २७० रुपये किलो दराने विकली जात होती. सुपारीचा भाव किलोला ३१० रुपये झाला आहे. मसाले पावसाळ्यापूर्वी मे महिन्याच्या आत तयार केले जातात.च् सध्या श्रावण महिना सुरू आहे. त्यामुळे घरगुती मसाल्याची मागणी सध्या फारशी नाही. मात्र, हॉटेल व्यावसायिकांना मसाले रोजच लागतात. त्यांच्याकरिता मसाला महागला आहे. साहजिकच, मसाले असेच अधिक महागले तर हॉटेलांमधील ‘तडका’ महागण्याची शक्यता यानिमित्ताने वर्तवली जात आहे.

टॅग्स :thaneठाणेGujaratगुजरात