शहरं
Join us  
Trending Stories
1
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
2
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
3
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
4
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
5
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
6
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
7
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
8
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
9
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
10
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
11
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
12
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
13
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
14
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
15
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
16
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
17
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
18
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
19
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
20
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

‘अनुभवाला कवितेचे अस्तर असलेले लेखन ग्रेटच’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 01:01 IST

कथा, कादंबरी, ललित अशा विविध प्रकारांत लेखन करताना त्यामधील अनुभवविश्व कवितेच्या पातळीवरचे असेल, तर ती कलाकृती वाचकांच्या स्मरणात राहते.

ठाणे : कथा, कादंबरी, ललित अशा विविध प्रकारांत लेखन करताना त्यामधील अनुभवविश्व कवितेच्या पातळीवरचे असेल, तर ती कलाकृती वाचकांच्या स्मरणात राहते. प्रत्येक अनुभवाला कवितेचे अस्तर असेल, तर ते लेखन ग्रेटच म्हणावे लागेल, असे मत ज्येष्ठ कवी, गीतकार अरुण म्हात्रे यांनी व्यक्त केले.कवयित्री, लेखिका मानसी कुलकर्णी हिच्या ‘मौनाची स्पंदने’ या पहिल्या कवितासंग्रहाचा प्रकाशन समारंभ शनिवारी तिच्याच राहत्या घरी पार पडला. यावेळी आपले मनोगत मांडताना म्हात्रे म्हणाले की, कवितेचा एक विशिष्ट प्रकारचा ग्राफ असतो. सर्वसाधारण विचार सारेच करीत असतात, मात्र त्याच्या पलीकडचा, पुढचा विचार करणे, स्वत:मधला बदल समजून येणे, शब्दांमध्ये रमताना साक्षात्कार होणे, ही सर्व जातिवंत कवीची लक्षणे होत.

कवितालेखन करताना स्वत:ला सूर सापडणे, नेमका शब्द सापडणे म्हणजे अवघड गोष्ट. मात्र, ही किमया मानसीला उत्तम साधली आहे, असेही ते शेवटी म्हणाले. यावेळी त्यांनी या संग्रहातील ‘परतीच्या वाटेवर अजूनही’ ही कविता वाचून दाखवली. मानसी मनोगतात म्हणाली की, या संग्रहनिर्मितीचे सारे श्रेय माझ्या आईला देते. माझी आई ही माझ्या कवितेची पहिली रसिक, वाचक आणि टीकाकार आहे. व्यास क्रि एशन्सचे संचालक निलेश गायकवाड प्रास्ताविकेत म्हणाले, मानसीच्या शब्दांमध्ये, विषयांमध्ये वैविध्य आहे.

तरुणाईची भाषा तिला नेमकी समजली आहे. यावेळी व्यास क्रि एशन्सचे मार्गदर्शक श्री.वा. नेर्लेकर, मानसीची आई कवयित्री आरती कुलकर्णी, बाबा राघव कुलकर्णी हे उपस्थित होते. या संग्रहातील मानसीच्या कवितांचे वाचन अनेक मंडळींनी केले. या कार्यक्रमाला लेखिका, अनुवादक जयश्री देसाई, रामदास खरे, मेधा सोमण, निवेदिका साधना जोशी, मेघना साने, दीपा ठाणेकर, मनीषा चव्हाण, साधना ठाकूर, अंजुषा पाटील, वृषाली शिंदे, गीतेश शिंदे, सदानंद राणे, बाळ कांदळकर व इतर उपस्थित होते. मानसीच्या ‘आकाश कवेत घेताना’ या आत्मकथन पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद लवकरच आम्ही प्रकाशित करणार आहोत, असे गायकवाड यांनी शेवटी जाहीर केले. महापौर नरेश म्हस्के यांनी शेवटी मानसीला शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन कवयित्री नीता माळी यांनी केले, तर आरती कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

टॅग्स :kalyanकल्याणthaneठाणे