शहरं
Join us  
Trending Stories
1
जैसलमेर दुर्घटनेतील मृतांचा आकडा २० वर; मोदींकडून दुःख व्यक्त, आर्थिक मदतीची घोषणा
2
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
3
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
4
'२५ हजार दिल्याशिवाय पेन्शन नाही!' रेल्वेच्या लाचखोर मुख्य अधीक्षकाला रंगेहाथ पकडलं
5
रुग्णालयात नेताना आजारी मुलाचा वाटेतच मृत्यू; धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण!
6
अमरावती-गडचिरोली मार्गावर २२० क्विंटल 'पोर्टिफाईड तांदूळ' घेऊन जाणारा ट्रक पकडला
7
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
8
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
9
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
10
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
11
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
12
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
13
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
14
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
15
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
16
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
17
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
18
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
19
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
20
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   

‘अनुभवाला कवितेचे अस्तर असलेले लेखन ग्रेटच’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 01:01 IST

कथा, कादंबरी, ललित अशा विविध प्रकारांत लेखन करताना त्यामधील अनुभवविश्व कवितेच्या पातळीवरचे असेल, तर ती कलाकृती वाचकांच्या स्मरणात राहते.

ठाणे : कथा, कादंबरी, ललित अशा विविध प्रकारांत लेखन करताना त्यामधील अनुभवविश्व कवितेच्या पातळीवरचे असेल, तर ती कलाकृती वाचकांच्या स्मरणात राहते. प्रत्येक अनुभवाला कवितेचे अस्तर असेल, तर ते लेखन ग्रेटच म्हणावे लागेल, असे मत ज्येष्ठ कवी, गीतकार अरुण म्हात्रे यांनी व्यक्त केले.कवयित्री, लेखिका मानसी कुलकर्णी हिच्या ‘मौनाची स्पंदने’ या पहिल्या कवितासंग्रहाचा प्रकाशन समारंभ शनिवारी तिच्याच राहत्या घरी पार पडला. यावेळी आपले मनोगत मांडताना म्हात्रे म्हणाले की, कवितेचा एक विशिष्ट प्रकारचा ग्राफ असतो. सर्वसाधारण विचार सारेच करीत असतात, मात्र त्याच्या पलीकडचा, पुढचा विचार करणे, स्वत:मधला बदल समजून येणे, शब्दांमध्ये रमताना साक्षात्कार होणे, ही सर्व जातिवंत कवीची लक्षणे होत.

कवितालेखन करताना स्वत:ला सूर सापडणे, नेमका शब्द सापडणे म्हणजे अवघड गोष्ट. मात्र, ही किमया मानसीला उत्तम साधली आहे, असेही ते शेवटी म्हणाले. यावेळी त्यांनी या संग्रहातील ‘परतीच्या वाटेवर अजूनही’ ही कविता वाचून दाखवली. मानसी मनोगतात म्हणाली की, या संग्रहनिर्मितीचे सारे श्रेय माझ्या आईला देते. माझी आई ही माझ्या कवितेची पहिली रसिक, वाचक आणि टीकाकार आहे. व्यास क्रि एशन्सचे संचालक निलेश गायकवाड प्रास्ताविकेत म्हणाले, मानसीच्या शब्दांमध्ये, विषयांमध्ये वैविध्य आहे.

तरुणाईची भाषा तिला नेमकी समजली आहे. यावेळी व्यास क्रि एशन्सचे मार्गदर्शक श्री.वा. नेर्लेकर, मानसीची आई कवयित्री आरती कुलकर्णी, बाबा राघव कुलकर्णी हे उपस्थित होते. या संग्रहातील मानसीच्या कवितांचे वाचन अनेक मंडळींनी केले. या कार्यक्रमाला लेखिका, अनुवादक जयश्री देसाई, रामदास खरे, मेधा सोमण, निवेदिका साधना जोशी, मेघना साने, दीपा ठाणेकर, मनीषा चव्हाण, साधना ठाकूर, अंजुषा पाटील, वृषाली शिंदे, गीतेश शिंदे, सदानंद राणे, बाळ कांदळकर व इतर उपस्थित होते. मानसीच्या ‘आकाश कवेत घेताना’ या आत्मकथन पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद लवकरच आम्ही प्रकाशित करणार आहोत, असे गायकवाड यांनी शेवटी जाहीर केले. महापौर नरेश म्हस्के यांनी शेवटी मानसीला शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन कवयित्री नीता माळी यांनी केले, तर आरती कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

टॅग्स :kalyanकल्याणthaneठाणे