शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
3
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
4
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
5
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
6
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
7
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
8
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
9
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
10
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
11
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
12
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
13
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
14
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
15
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
16
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
17
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
18
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
19
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
20
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम

CoronaVirus News in Thane: गरिबांचे घास पुढाऱ्यांच्या घशात, कम्युनिटी किचनला हरताळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 01:35 IST

शासनाने या लोकांसाठी तसेच ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही, अशांसाठी मदतीचा हात पुढे केला. त्याचाच एक भाग म्हणून ठाण्यात अनेक भागांत कम्युनिटी किचन सुरु करण्यात आले.

अजित मांडके ठाणे : संपूर्ण देशात लॉकडाउन झाल्यानंतर हातावर पोट असणाऱ्यांचे हाल सुरु झाले. त्यामुळे शासनाने या लोकांसाठी तसेच ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही, अशांसाठी मदतीचा हात पुढे केला. त्याचाच एक भाग म्हणून ठाण्यात अनेक भागांत कम्युनिटी किचन सुरु करण्यात आले. हे किचन सुरु करण्यामागे लोकांना जेवण तयार करुन देणे हा उद्देश होता; मात्र यामध्ये राजकीय मंडळी आणि त्यांच्या संस्थांचा हस्तक्षेप वाढून या योजनेला हरताळ फासल्याची गंभीर बाब समोर आली आहे. शासनाकडून मिळणा-या मदतीच्या आड अनेक लोकप्रतिनिधींनी आपले मार्केटिंग सुरु केले आहे. काहींनी जेवणाऐवजी किराणा साहित्याची पाकिटे बांधून त्यावर आपल्या नावांची स्टिकर लावली. कहर म्हणजे, काही लोकप्रतिनिधींनी या पाकिटांचे वाटप केवळ आपल्याच मतदारांना केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. केवळ २० टक्के मदत, ख-या गरजूंपर्यंत पोहोचत असल्याचा आरोप जाणकारांकडून केला जात आहे.कोरोनाचा सामना करण्यासाठी शासकीय यंत्रणा जीवाची पर्वा न करता काम करीत आहे. दुसरीकडे या जीवघेण्या संकटाकडे संधीप्रमाणे बघून आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न ठाण्यात सुरु असल्याची बाब समोर आली आहे. लॉकडाउन झाल्यानंतर सुरुवातीला जिल्हा प्रशासनाकडून रोज कमावून रोज खाणाºया आणि ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही, अशांसाठी किराणा देण्याचा उपक्रम सुरु करण्यात आला. यामध्ये काही सामाजिक संस्थांची मदत घेण्यात आली. मात्र त्यात राजकीय हस्तक्षेप झाल्याने जिल्हा प्रशासनाने महापालिकेच्या माध्यमातून ही योजना पुढे सुरु ठेवावी, असे सांगण्यात आले. परंतु मधल्या काळात अन्नधान्याऐवजी हातावरील पोट असणाºयांना कम्युनिटी किचनच्या माध्यमातून जेवण देण्यात यावे, अशी संकल्पना पुढे आली. महापालिकेकडे हा उपक्रम आल्यानंतर या योजनेला पूर्णत: हरताळ फासला केला.अनेक राजकीय मंडळी, बड्या नगरसेवकांनी शेकडो टन तांदूळ, दाळ, तेल, मीठ उचलले. दोन ते तीन दिवस काहींनी हे किचन शासनाच्या पथकाला दाखवले. परंतु आता अनेक ठिकाणी हे किचन बंद झाले असून, काही नतद्रष्ट राजकीय मंडळींनी शासनाच्या किराणा साहित्यावर डल्ला मारण्याचे प्रताप केले आहेत. वास्तविक पाहता, ही मदत शासनाकडून येत आहे. मात्र, राजकीय मंडळी ही मदत आपण करीत असल्याचे प्रभागातील नागरिकांना भासवत असून, तयार जेवण देण्याऐवजी अन्नधान्य आपापल्या प्रभागांमध्ये वाटण्याचे काम सुरूझाले आहे. एवढेच काय, काहींनी तर या साहित्याच्या पाकिटांवर आपले ब्रॅण्डिंग केल्याची धक्कादायक माहितीही पालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी दिली आहे. विशेष म्हणजे शासनाकडून आलेल्या या मदतीसाठी शासनाकडून त्यात्या भागात फलकही लावले जात आहेत. ज्या खºया अर्थाने समाजसेवेत व्यस्त आहेत, अशा संस्थांनी या फलकांवर कोणताही आक्षेप घेतला नाही. मात्र मार्केटींग करणाºया नगरसेवकांनी शासनाची मदत घेतल्यानंतर असे फलक लावण्यास मज्जाव केला आहे. काहींना तर शासनाच्या कर्मचाºयांना दमदाटी करुन, तुमचे फलक लावले तर आम्ही परत निवडून येऊ शकणार नाही, असे म्हणत फलक लावण्यास विरोध करत आहेत.कम्युनिटी किचनच्या माध्यमातून अनेक लोकप्रतिनिधींनी त्यांच्याच सामाजिक संस्थांद्वारे पत्रव्यवहार करुन शेकडो टन किराणा सामान उचलले आहे. परंतु ज्यांना त्याची खरी गरज आहे, त्यांच्यापर्यंत ते पोहचत नसल्याची माहितीही आता समोर येत आहे.।मुंब्य्रात एकाच नगरसेवकाने स्वत:च्या संस्थेच्या नावाखाली हजारो टन किराणा साहित्य उचलल्याने इतर नगरसेवकांनी याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. याविरोधात त्यांनी गुरुवारी ठाणे महानगरपालिकेत चक्क ठिय्याही मांडला. आपल्याकडून मदत पोहोचली नाही, तर नागरिक आपल्याला मतदान करणार नाही, असा सूरही या नगरसेवकाने आळवला.।वाढत्या राजकीय हस्तक्षेपामुळे किचन कम्युनिटी योजनेचा पार बोजवारा उडाला आहे. ज्या सामाजिक संस्था या जनहिताच्या योजनेमध्ये खºया अर्थाने योगदान देत होत्या, त्या संस्थांनाही या मंडळीनी हद्दपार केले आहे. राजकीय त्रासामुळे या सामाजिक संस्थांनी काम बंद केल्याने ज्यांना गरज आहे, अशा अवघ्या २० टक्के नागरिकांपर्यंतच ही मदत पोहोचत असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. उर्वरित मदत नगरसेवकांनी प्रभागातील नागरिकांना अर्थात त्यांच्या संभाव्य मतदारांना दिली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस