शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

दोन महिन्यांपासून आजीचे वास्तव्य अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 11:44 PM

वीजबिलाचा शॉक नको

ठाणे : वाढीव वीजबिलाचा शॉक नको म्हणून चंदनवाडी परिसरातील ६५ वर्षांच्या आजीबाई गेले दोन महिने अंधारात राहत आहेत. गेली १० वर्षे भटक्या प्राण्यांना आश्रय देणाऱ्या आजीबाईंनी वाढीव वीजबिलाची धास्ती घेतली असल्याने त्यांनी सायंकाळी अंधारातच राहण्याचे ठरविले आहे. मनसेने ही बाब समोर आणून त्यांच्या पाठीशी राहण्याचे आश्वासन दिले. तसेच, त्यांची वीज कापून नेल्यास महावितरणला मनसे स्टाईलने धडा शिकवला जाईल, असा इशाराही दिला.

वाढीव वीजबिल रद्द करण्यासाठी सकाळी मनसेने आंदोलन केले असता दुसरीकडे संध्याकाळी मनसेने एक वेगळा प्रकार समोर आणला. मनसेचे कोपरी पाचपाखाडी विभाग अध्यक्ष महेश कदम यांच्याकडे त्यांच्या परिसरात गेली अनेक वर्षे वास्तव्यास असणाऱ्या ६५ वर्षांच्या आजीबाई लक्ष्मी सूर्यवंशी यांना वीजबिल वाढीव आल्यानंतर त्या गेले दोन महिने अंधारात राहत असल्याचे उघड झाले. त्यांना लॉकडाऊन काळात दहा हजार रुपये बिल आले. त्यांना या बिलाचा इतका धक्का बसला की सायंकाळी सहानंतर त्या दिवे लावत नाहीत. मेणबत्ती लावून त्या घरात काम करतात तर दिवसा उजेड असल्याने त्या उजेडातच काम करतात. आजीबाईच्या मुलाचे निधन झाले असून त्या आपल्या मुलीसोबत राहतात. रस्त्यावरील कुत्री-मांजरींना कोणीही मारत असते, गाडीखाली येऊन त्यांचे अपघात होतात म्हणून प्राण्यांवर प्रेम करणाऱ्या या आजीबाईंनी आपल्या घरात १० कुत्री, सात मांजरींना आश्रय दिला आहे. दहा बाय दहाच्या खोलीत राहणाऱ्या या आजीबाई गेले दोन महिने अंधारात राहत आहेत. लाइट लावायची मला भीती वाटते, असे सांगताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते.

मनसेस्टाइल धडा शिकवण्याचा इशारा अंधारात राहणाऱ्या या आजीबाईंची प्रथम भीती दूर केली. त्यांना वीजबिल भरू नका, असे मी स्पष्ट सांगितले आहे. जर या आजीबाईंची वीज कापायला कोणी अधिकारी आले तर त्यांना मनसे स्टाईल धडा शिकवला जाईल, असे महेश कदम यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका