शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

सत्ताधाऱ्यांनो, चालते व्हा!, खड्ड्यांच्या निषेधार्थ केडीएमसीवर धडक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 3:57 AM

कल्याण शहर परिसरातील असमान रस्ते आणि खड्ड्यांमुळे पाच जणांचा नाहक बळी गेल्याच्या निषेधार्थ मनसेने मंगळवारी केडीएमसी मुख्यालयावर भव्य मोर्चा काढत जबाबदार असलेल्या अधिका-यांवर कारवाईची मागणी केली.

कल्याण : कल्याण शहर परिसरातील असमान रस्ते आणि खड्ड्यांमुळे पाच जणांचा नाहक बळी गेल्याच्या निषेधार्थ मनसेने मंगळवारी केडीएमसी मुख्यालयावर भव्य मोर्चा काढत जबाबदार असलेल्या अधिका-यांवर कारवाईची मागणी केली. कल्याण-डोंबिवली शहरांना खड्ड्यात घालणाºया सत्ताधाºयांनो ‘चले जाव’ यांसह महापालिका प्रशासनाच्या निषेधार्थ अन्य दिलेल्या घोषणांनी महापालिकेचा परिसर मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दणाणून सोडला होता.कल्याण पश्चिमेतील कृषी उत्पन्न बाजार समितीपासून काढलेल्या मोर्चामध्ये मनसेचे अनेक पदाधिकारी, महिला, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. तर खड्ड्यात पडून जखमी झालेल्या डी. एस. बागवे, साईप्रसाद जोशी आणि मुन्नाकुमार या डोंबिवलीत राहणाºया तिघांनीही मोर्चात सहभाग घेत महापालिकेविरोधातील आपला रोष व्यक्त केला. ‘राम नाम सत्य है..सत्ताधारी पैसे खाण्यात व्यस्त है...’, ‘२२ वर्षे केले काय?,’ ‘खाली डोकंवर पाय...१०० नगरसेवक, दोन खासदार, दोन मंत्री...एवढी माणसं करतात काय?’, ‘खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा, शिवसेना भाजप भ्रष्टाचाराचा अड्डा’ आदी प्रकारची जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. यावेळी सत्ताधारी आणि प्रशासनाच्या निषेधार्थ प्रतिकात्मक अंत्ययात्राही काढण्यात आली. मोर्चा महापालिका मुख्यालयाकडे येत असताना मध्येच जोरदार पावसाला सुरुवात झाली. परंतु, न थांबता मुसळधार पावसातही मोर्चा पुढे सरकत होता.महापालिकेच्या परिसरातील रस्त्यावरच मोर्चेकरांना पोलिसांनी रोखून धरले. तुर्भे आणि मंत्रालयाच्या परिसरात झालेल्या आंदोलनाप्रमाणे कल्याणमधील आंदोलनाला हिंसक वळण लागू नये, यासाठी पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर तैनात होता. कल्याण-डोंबिवली मनसेचा संयुक्त मोर्चा असल्याने डोंबिवलीतील रामनगर आणि मानपाडा पोलिस ठाण्यातील कुमकही मागविण्यात आली होती. परंतु, कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.या मोर्चात मनसे सरचिटणीस राजन गावंड, माजी आमदार प्रकाश भोईर, उपाध्यक्ष काका मांडले, राजेश कदम, महापालिका विरोधी पक्षनेते मंदार हळबे, जिल्हाध्यक्ष तथा गटनेते प्रकाश भोईर, उल्हास भोईर, मनोज घरत, उर्मिला तांबे, शीतल विखणकर आदींसह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.>प्रशासनाला १५ दिवसांची डेडलाइनमनसेच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांची भेट घेतली. या वेळी खड्डे आणि त्यामुळे गेलेल्या बळींप्रकरणी आयुक्तांसह संबंधित विभागाच्या अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरण्यात आले. या वेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.आणखी किती बळी गेल्यावर प्रशासन जागे होणार आहे?, असा सवालही करण्यात आला. मनसे पदाधिकाºयांनी अनेक प्रश्नांची सरबत्ती पालिका आयुक्तांवर केली. वरिष्ठ अधिकाºयांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करत तसेच खड्डे बुजवून दोषी अधिकाºयांवर कारवाईच्या मागणीसाठी मनसेने आयुक्तांना १५ दिवसांची डेडलाइन दिली आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका