शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

गोराई-मनोरी रो-रो सेवा नाणारप्रमाणेच रद्द करण्यास सरकारला भाग पाडू - उल्का महाजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 22:53 IST

राज्य सरकारने गोराई येथे रो-रो सेवा सुरू करण्यासह वाहतुक पूल बांधण्याचा घाट घातला असुन त्यात येथील हिरवळ व कांदळवन नष्ट होऊन वाढत्या वाहनांमुळे प्रदुषणात वाढ होण्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.

भाईंदर - राज्य सरकारने गोराई येथे रो-रो सेवा सुरू करण्यासह वाहतुक पूल बांधण्याचा घाट घातला असुन त्यात येथील हिरवळ व कांदळवन नष्ट होऊन वाढत्या वाहनांमुळे प्रदुषणात वाढ होण्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. सरकारने यासाठी स्थानिकांना विचारात न घेताच हा प्रकल्प जबरदस्तीने ग्रामस्थांच्या माथी मारला जात आहे. हा प्रकल्प नाणारप्रमाणेच जनविरोधातून रद्द करण्यास राज्य सरकारला भाग पाडू, असा इशारा ज्येष्ठ समाजसेविका उल्का महाजन यांनी दिला आहे. 

त्या सोमवारी गोराई चर्च येथे आयोजित गोराई, मनोरी व उत्तन ग्रामस्थांच्या सभेत बोलत होत्या. केंद्र व राज्य सरकार सागरमाला योजनेद्वारे सर्व सागरी किनारे एकमेकांना जोडून रो-रो सेवा  सुरू करणार आहे. त्यापैकी गोराई येथील प्रकल्पासाठी राज्य सरकारने स्थानिक जनमताचा कौल न घेता, त्यांची सुचना व हरकतीची प्रक्रीया मोडीत काढून थेट प्रकल्पाच्या कामालाच सुरुवात केल्याचा आरोप त्यांनी केला. मुंबई उपनगर व आसपासच्या शहरांना येथील हिरवळीमुळे ऑक्सिजन  मिळतो. मुंबईसारखेच काँक्रिटचे जंगल प्रस्तावित रो-रो सेवेमुळे येथेही सरकार साकारण्याचे कटकारस्थान रचत असल्याचा आरोप त्यांनी केला.खाडीतील मासे अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावरील कांदळवन क्षेत्रात येत असतात, कांदळवनच नष्ट झाल्यास मासे अंडी कुठे घालतील, असा प्रश्न उपस्थित करुन मासळीची संख्या रोडावून मासेमारी व्यवसाय धोक्यात येण्याची भिती त्यांनी व्यक्त केली. पावसाळ्यात स्थानिक मच्छिमार आपापल्या बोटी गोराई खाडीत नांगरतात. रो-रो सेवा सुरू झाल्यास या बोटींना नांगरण्यासाठी जागाच उपलब्ध होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारने गोराई, मनोरी, पाली, उत्तन, चौक, डोंगरी, तारोडी या गावांमध्ये विशेष पर्यटन क्षेत्र जाहिर केल्यानंतर गोराई खाडी मार्गे वाहतुक पूल प्रस्तावित केला आहे. या पूलामुळे उत्तन-गोराईमध्ये मोठ्याप्रमाणात वाहनांची वर्दळ वाढणार असुन त्यातून या प्रदुषणविरहित गावांत प्रदुषणाचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढण्याची भिती त्यांनी व्यक्त केली आहे. त्याचा परिणाम येथील हिरवळीवर होणार असल्याचा दावा त्यांनी केला.रो-रो सेवेसाठी गोराई खाडीच्या दोन्ही बाजुंकडील प्रस्तावित जेट्टींच्या बांधकामामुळे तेथील तिवरक्षेत्र नष्टच होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या खाडीकिनारी मासळी विक्रीचा व्यवसाय करणाय््राा कोळी महिलांच्या रोजगारावर गडांतर येणार असताना त्यांच्या रोजगाराचा विचारही या प्रकल्पात करण्यात आला नसल्याचे त्यांनी सांगितले. गावातील रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचा प्रयत्न केला जात असुन या गावांचा कायापालट व सुशोभिकरण हे तेथील ग्रामस्थच करतील. त्याची काळजी सरकारने करु नये, अशी समजही त्यांनी दिली. तत्पुर्वी डिसेंबर २०१८ मध्ये गोराई येथील होली मॅगी डिसेचर्चच्या सभागृहात मुंबई मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत या सातही गावांतील ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी बोर्डाचे अधिकारी हजर होते. त्यावेळी सुद्धा ग्रामस्थांनी या प्रकल्पांना विरोध दर्शविला होता. याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर २५ फेब्रूवारी रोजी सुनावणी पार पडली. त्यावेळी न्या. एन. जे. जमादार व न्या. बी. आर. गवई यांच्या खंडपीठाने एका आठवड्यात राज्य सरकारने वन विभाग, एमसीझेडएमएकडे आदी संबंधित विभागाच्या अटी, शर्तींची पुर्तता करुन परवानगी घ्यावी, त्यानंतरच कामाला सुरुवात करावी, असे निर्देश दिले आहेत. यावर बोलताना महाजन यांनी राज्य सरकारने न्यायालयात खोटी कागदपत्रे सादर केल्याचा आरोप करीत नाणार प्रकल्प जसा तेथील ग्रामस्थांच्या विरोधामुळे रद्द झाला तसाच हा प्रकल्प रद्द करण्यास सरकारला भाग पाडू, असा इशारा देत त्यांनी याविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले. या प्रकल्पांना विरोध करण्यासाठी ग्रामस्थांनी एकत्र यावे, असे आवाहन केले.यासाठी मंगळवारपासून गावागावांत जनजागृतीच्या सभांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी गोराई मच्छिमार संस्थेचे अध्यक्ष जोजफ मनोरकर, उत्तन कोळी जमात कल्मेत गौऱ्या, धारावी बेट बचाव समितीचे अध्यक्ष जोसेफ घोन्सालवीस, समन्वयक प्रा. संदीप बुरकेन, मनोरी मच्छिमार संस्थेचे सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर