शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

मुख्यमंत्र्यांचे जय राजस्थान ; राजस्थानी समाजासाठी शासकीय भूखंड देण्याची होळी संमेलनात ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2018 12:58 IST

राजस्थानवासीयांसाठी शासकीय जमीन मंजूर करण्याची जाहीर ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भार्इंदर येथील राजस्थान वासियांच्या होळी महासंमेलन कार्यक्रमात दिली

मीरारोड - राजस्थानवासीयांसाठी शासकीय जमीन मंजूर करण्याची जाहीर ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भार्इंदर येथील राजस्थान वासियांच्या होळी महासंमेलन कार्यक्रमात दिली.  इंद्रलोक येथील स्व. बाळासाहेब ठाकरे मैदानात राजस्थानी छत्तीस कौम एकता परिषद, जालोर-सिरोही विकास परिषद, राजस्थानी मेवाड प्रवासी संघ, ३६ कौम एकता मंडळ, पाली जिल्हा प्रवासी संघ, सिरोही -जालोर प्रवासी संघ यांनी संयुक्त पणे राजस्थानी होळी महासंमेलनाचे आयोजन शुक्रवारी सायंकाळी केले होते.महापालिकेच्या सभागृह, मंडईच्या इमारतींचे उद्घाटन आटपून मुख्यमंत्री होळी महासंमेलनात आले. वास्तविक राजस्थानी होळी कार्यक्रमासाठी ते आवर्जून भार्इंदरमध्ये आले होते. तशी जाहीर कबुलीच मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात दिली. त्यांचा खास राजस्थानी साफा घालून सत्कार करण्यात आला. महापौर डिंपल मेहता, आमदार नरेंद्र मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैती, सभागृह नेते रोहिदास पाटील, स्थायी समिती सभापती ध्रुवकिशोर पाटील, नागोबा फौंडेशनचे अध्यक्ष तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख शंकर विरकर, शहरप्रमुख धनेश पाटील, संमेलनाचे आयोजक अध्यक्ष गोविंद राजपुरोहित, रतनसिंह राठोड, प्रताप पुरोहित आदी उपस्थित होते. या वेळी मोठ्या संख्येने राजस्थानी समाज बांधव उपस्थित होते.मीरा भार्इंदर हे मीनी राजस्थान असून राजस्थानी समाजाने नेहमीच देण्याचे काम केले आहे असे आमदार मेहता म्हणाले. राजस्थानी जेवढे येतील तेवढी माहाराष्ट्राची भूमी गोड होत जाईल असं स्व. गोपीनाथ मुंडे म्हणायचे अशी आठवण त्यांनी सांगितली. पालिकेने महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्याचा ठराव केला आहे. त्याची मंजुरी शासनाकडून येत्या जयंती आधी मिळेल अशी आशा व्यक्त केली. शासनाने राजस्थानी समाजासाठी सरकारी भूखंड द्यावा अशी मागणी  मेहतांनी या वेळी केली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणाची सुरुवातच आपल्या समोर संपूर्ण राजस्थान दिसत आहे अशी केली. मीरा भार्इंदर महापालिका निवडणुकीच्या वेळी आलो असता गोविंद पुरोहित आदिंशी चर्चा झाली होती. त्यावेळी त्यांनी आम्ही सर्व भाजपालाच निवडून देणार असे सांगितले होते. पण पालिका जिंकून दिल्यावर मात्र तुम्हाला होळीच्या कार्यक्रमाला यावे लागेल अशी अट पण टाकली होती. त्यानुसार आपण राजस्थानी होळी संमेलनास आल्याचे मुख्यमंत्री आवर्जून म्हणाले.होळीच्या शुभेच्छा देतानाच होळी हा सामाजिक सलोख्याचा सण आहे. त्याच सोबत पर्यावरणाला वाचवण्यासाठी झाडांची लागवड करणं गरजेचं आहे. होळी साठी झाडं न तोडता कचरा, सुकी पानं - गवत आदींचा वापर करावा असं आवाहन त्यांनी केलं . राजस्थानी समाजाने आपल्याला खूप प्रेम दिलं आहे. तुम्हाला गरज असेल तेव्हा सांगा, अर्ध्यारात्री येऊ. वर्षा हे तुमचंच घर आहे असं ते म्हणाले.राजस्थानमधून येणारे प्रवासी असतील, उपचारासाठी येणारे लोक असतील त्यांच्यासाठी जागा हवी. समाजाने भूखंडाची मागणी केली असून नरेंद्र मेहता यांनी जागा शोधून द्यावी. ती जागा मंजूर करण्याचे काम शासन करेल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. तर जय राजस्थान म्हणत त्यांनी आपल्या भाषणाचा शेवट केला.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा