शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

मुख्यमंत्र्यांचे जय राजस्थान ; राजस्थानी समाजासाठी शासकीय भूखंड देण्याची होळी संमेलनात ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2018 12:58 IST

राजस्थानवासीयांसाठी शासकीय जमीन मंजूर करण्याची जाहीर ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भार्इंदर येथील राजस्थान वासियांच्या होळी महासंमेलन कार्यक्रमात दिली

मीरारोड - राजस्थानवासीयांसाठी शासकीय जमीन मंजूर करण्याची जाहीर ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भार्इंदर येथील राजस्थान वासियांच्या होळी महासंमेलन कार्यक्रमात दिली.  इंद्रलोक येथील स्व. बाळासाहेब ठाकरे मैदानात राजस्थानी छत्तीस कौम एकता परिषद, जालोर-सिरोही विकास परिषद, राजस्थानी मेवाड प्रवासी संघ, ३६ कौम एकता मंडळ, पाली जिल्हा प्रवासी संघ, सिरोही -जालोर प्रवासी संघ यांनी संयुक्त पणे राजस्थानी होळी महासंमेलनाचे आयोजन शुक्रवारी सायंकाळी केले होते.महापालिकेच्या सभागृह, मंडईच्या इमारतींचे उद्घाटन आटपून मुख्यमंत्री होळी महासंमेलनात आले. वास्तविक राजस्थानी होळी कार्यक्रमासाठी ते आवर्जून भार्इंदरमध्ये आले होते. तशी जाहीर कबुलीच मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात दिली. त्यांचा खास राजस्थानी साफा घालून सत्कार करण्यात आला. महापौर डिंपल मेहता, आमदार नरेंद्र मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैती, सभागृह नेते रोहिदास पाटील, स्थायी समिती सभापती ध्रुवकिशोर पाटील, नागोबा फौंडेशनचे अध्यक्ष तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख शंकर विरकर, शहरप्रमुख धनेश पाटील, संमेलनाचे आयोजक अध्यक्ष गोविंद राजपुरोहित, रतनसिंह राठोड, प्रताप पुरोहित आदी उपस्थित होते. या वेळी मोठ्या संख्येने राजस्थानी समाज बांधव उपस्थित होते.मीरा भार्इंदर हे मीनी राजस्थान असून राजस्थानी समाजाने नेहमीच देण्याचे काम केले आहे असे आमदार मेहता म्हणाले. राजस्थानी जेवढे येतील तेवढी माहाराष्ट्राची भूमी गोड होत जाईल असं स्व. गोपीनाथ मुंडे म्हणायचे अशी आठवण त्यांनी सांगितली. पालिकेने महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्याचा ठराव केला आहे. त्याची मंजुरी शासनाकडून येत्या जयंती आधी मिळेल अशी आशा व्यक्त केली. शासनाने राजस्थानी समाजासाठी सरकारी भूखंड द्यावा अशी मागणी  मेहतांनी या वेळी केली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणाची सुरुवातच आपल्या समोर संपूर्ण राजस्थान दिसत आहे अशी केली. मीरा भार्इंदर महापालिका निवडणुकीच्या वेळी आलो असता गोविंद पुरोहित आदिंशी चर्चा झाली होती. त्यावेळी त्यांनी आम्ही सर्व भाजपालाच निवडून देणार असे सांगितले होते. पण पालिका जिंकून दिल्यावर मात्र तुम्हाला होळीच्या कार्यक्रमाला यावे लागेल अशी अट पण टाकली होती. त्यानुसार आपण राजस्थानी होळी संमेलनास आल्याचे मुख्यमंत्री आवर्जून म्हणाले.होळीच्या शुभेच्छा देतानाच होळी हा सामाजिक सलोख्याचा सण आहे. त्याच सोबत पर्यावरणाला वाचवण्यासाठी झाडांची लागवड करणं गरजेचं आहे. होळी साठी झाडं न तोडता कचरा, सुकी पानं - गवत आदींचा वापर करावा असं आवाहन त्यांनी केलं . राजस्थानी समाजाने आपल्याला खूप प्रेम दिलं आहे. तुम्हाला गरज असेल तेव्हा सांगा, अर्ध्यारात्री येऊ. वर्षा हे तुमचंच घर आहे असं ते म्हणाले.राजस्थानमधून येणारे प्रवासी असतील, उपचारासाठी येणारे लोक असतील त्यांच्यासाठी जागा हवी. समाजाने भूखंडाची मागणी केली असून नरेंद्र मेहता यांनी जागा शोधून द्यावी. ती जागा मंजूर करण्याचे काम शासन करेल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. तर जय राजस्थान म्हणत त्यांनी आपल्या भाषणाचा शेवट केला.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा