शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

300 स्क्वेअर फुटाचे घर द्या अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार; ठाणे झोपडपट्टी धारकांचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2019 2:49 PM

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत मुंबई हद्दीतील रहिवाशांना 300 स्क्वेअर फुटाचे घर दिले जात आहे. मात्र ठाण्यातील झोपडीधारकाला 269 स्क्वेअर फुटाचे घर दिले जात आहे.

ठाणे - झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत मुंबई हद्दीतील रहिवाशांना 300 स्क्वेअर फुटाचे घर दिले जात आहे. मात्र ठाण्यातील झोपडीधारकाला 269 स्क्वेअर फुटाचे घर दिले जात आहे. हा दुजाभाव असून ठाणेकरांनाही 300 स्क्वेअर फुटाचे घर मिळावे अन्यथा ठाण्यातील 210 झोपड्यांमधील नागरिक येत्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालतील असा इशारा ठाणे शहर झोपडपट्टी रहिवाशी संघटनेने आज पत्रकार परिषदेत दिला. सोमवारी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ठाणे जिल्हधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. 

पत्रकार परिषदेला ठाणे शहर झोपडपट्टी रहिवाशी संघटनेचे अध्यक्ष राकेश मोदी, आनंद कांबळे, महादेव पवार, विजयप्रताप सिंह, इमॅन्युअल नाडार, प्रमोद पांडे, सुरेश खेराडे, सितारम नायडू, बाबा राऊत, उमा भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते. ठाणे महानगरपालिका हद्दीत 2011 च्या जनगणनेनुसार शासकीय, निमशासकीय, खासगी तसेच इतर विविध जमिनींवर एकूण 210 झोपडपट्ट्या आहेत. या झोपडपट्ट्यांमध्ये सुमारे साडेनऊ लाखांच्या घरात नागरिक वास्तव्य करित आहेत. झोपडीमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे राहणीमान सुधारावे यासाठी शासनाने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची स्थापना केली. मात्र आता शासन मुंबईसाठी एक न्याय तर ठाण्यासाठी एक न्याय असा दुजाभाव करत असल्याची टीका राकेश मोदी यांनी केली.  

मुंबई मध्येही पूर्वी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत 269 स्क्वेअर फुटाचे घर दिले जात होते. मात्र मे 2018 रोजी मुंबई मध्ये राहणाऱ्या झोपडट्टीधारकांना 300 स्क्वेअर फुटाचे घर देण्याचा निर्णय झाला. ठाण्यातील झोपडीधारकांना मात्र 269 स्क्वेअर फुटाचे घर देण्याचा निर्णय कायम ठेवला गेला. या निर्णयामुळे ठाणेकर झोपडीधारकांवर अन्याय झालेला आहे. ठाणे शहरालाच या योजनेतून का डावलण्यात आले असा संतप्त सवाल यावेळी पत्रकार परिषदेत करण्यात आला. शासनाने घेतलेला हा निर्णय म्हणजे ठाण्यातील झोपडीधारकांना दिलेली ही सापत्नक वागणूकच आहे.  

एसआरए योजनेसाठी मुंबईला मिळणारा एफएसआय व मुंबईला लागून असलेल्या ठाण्याला मिळणारा एफएसआय यामध्ये 31 स्क्वे.फुटाचा फरक, एखादा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविताना मुंबईला 51 टक्के झोपडपट्टीधारकांची सहमती व तोच प्रकल्प ठाण्यामध्ये राबवायचा झाल्यास त्याकरीता 70 टक्के झोपडीधारकांची संमती, मुंबईसाठी चटईक्षेत्र निर्देशांक 4.00 तर ठाण्यासाठी 3.00 चटईक्षेत्र आहे. योजना एकच आणि प्राधिकारण पण एकच मात्र निकष वेगवेगळे कसे असा सवाल पत्रकार परिषदेत उपस्थित करण्यात आला.  

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत मुंबईला लागू असलेले नियम ठाण्यासाठी लागू करा अशी आमची प्रमुख मागणी आहे. ही मागणी मान्य न झाल्यास या झोपडपट्ट्यांमधील 25 हजार नागरिकांचा धडक मोर्चा काढण्यात येऊन येत्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा पत्रकार परिषदेत देण्यात आला. 

टॅग्स :thaneठाणेElectionनिवडणूक