शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

कन्या शाळेचा भूखंड बिल्डरच्या घशात, शिक्षणाचे बाजारीकरण, पटसंख्येअभावी जिल्ह्यातील दहा शाळा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 6:02 AM

गरीब मुलींसाठी ठाणे शहरात जिल्हा परिषदेची एक ब्रिटीशकालीन कन्या शाळा आहे. मात्र, तिची इमारत तोडण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे.

ठाणे : गरीब मुलींसाठी ठाणे शहरात जिल्हा परिषदेची एक ब्रिटीशकालीन कन्या शाळा आहे. मात्र, तिची इमारत तोडण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. इमारतीच्या रिकाम्या जागेचे काय करणार याचे उत्तर मात्र अनुत्तरीत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली ही कोट्यवधींची जागा बिल्डरच्या घशात घालण्याच्या हालचाली काही अधिकाºयांनी राजकीय नेत्यांच्या मदतीने सुरू केल्याचे समजते. तेथील विद्यार्थीनींसह बी.जे. हायस्कूलचे विद्यार्थ्यांना अन्य शाळेत स्थलांतरीत करण्यात येणार आहे.जि.प.तील यशवंतराव चव्हाण सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जिपच्या विविध योजनांच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी ग्रामीण भागातील सुमारे एक हजार ३६३ शाळा शंभर टक्के डिजिटल केल्याचा दावा करून ९५० शाळा प्रगत केल्याचे त्यांनी नमूद केले. यास अनुसरून शहरात असलेली ब्रिटीशकालीन जिल्हा परिषदेची कन्या शाळा डिजिटल का झाली नाही, या विषयी विचारले असता ही इमारत तोडणार असल्याचे भीमनवार यांच्यासह शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी सांगितले. शाळा तोडल्यानंतर संबंधीत भूखंडाचा वापर कशासाठी करणार, यावर मात्र समाधानकारक उत्तर देता आले नाही. जिल्हा परिषदेत येणाºया लोकप्रतिनिधींची बॉडी आल्यावर त्याचा काय तो विचार करणार असल्याचे शेंडकर म्हणाल्या. चांगल्या कामांमुळे राज्यपालानी पुुरस्कृत केलेल्या शेंडकर यांना जिल्हा परिषदेची ही शाळा ठाणे महापालिकेत वर्ग केल्याचा प्रश्न विचारला असता त्यांनी ‘आम्ही तर काही प्रस्ताव दिलेला नाही ’ असे सांगून त्यावर अधिक बोलणे टाळले. शाळेच्या या भूखंडाचा वापर कशासाठी करणार... मुलांना अन्य शाळेत स्थलांतरीत करणार काय... यावरून विद्यार्थी महापालिकेसह अन्य शाळांमध्ये समाविष्ट होण्याची भनक शिक्षणाधिकाºयांना नसल्याचे निदर्शनात आले.एकीकडे महिला व मुलींच्या सबलीकरणसाठी शासन कोट्यवधी रूपये खर्च करीत आहे. तर दुसरीकडे गरीब, दीन दलितांच्या मुली शिक्षण घेत असलेली कन्या शाळा तोडून तिचा भूखंड जिल्हा परिषद मोकळा करण्याच्या प्रयत्नात असल्याचे त्यांच्या बोलण्यावरून उघड झाले. ‘लेक शिकवा’ हा शासनाचा उपक्रम राबवणारी जिल्हा परिषद ग्रामीण भागाप्रमाणे कन्या शाळेला डिजिटल न करता तीला आगामी सहा महिन्यात तोडण्याचे नियोजन आहे. तसेच विद्यार्थी संख्ये अभावी जिल्ह्यातील दहा शाळा झाल्या बंद झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.यामुळे हक्काच्या शाळेपासून वंचित होणाºया ठाणे शहरातील सावित्रीच्या लेकींना शहरातील महागड्या शाळेत शिक्षण घेणे शक्य होणार नसल्याचे आजच्या शिक्षणाच्या बाजारीकरणावरून उघड होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची पटसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचा दावा करणाºया जिल्हा परिषदेच्या सुमारे दहा शाळा मागील वर्षात बंद पडल्याचे या पत्रकार परिषदेत उघड झाले. विद्यार्थी संख्येअभावी जवळच्या तीन किलोमीटरच्या शाळेत या विद्यार्थ्यांना समाविष्ट करण्यात आले.प्रगतीपथावर असलेल्या कामांची माहितीशासनाच्या धोरणानुसार दरवर्षी हा कार्यक्रम राबवताना विद्यार्थ्याच्या वाहन व्यवस्थेचीदेखील काळजी घेतली जात असल्याचे भीमनवार यांनी सांगितले. जिल्ह्यात ९५ हजार शौचालये बांधून जिल्हा शंभर टक्के हागणदरीमुक्त होत आहे, नादुरूस्ती शौचालयांची दुरुस्ती, ६५ ग्रामपंचायतींच्या विकास कामांचे आराखडे, गावातील शाळांच्या वीजपुरवठ्याचे बील भरण्यासह साफसफाई व शौचालय देखभालीची जबाबदारी संबंधीत ग्रामपंचायतींवर सोपवण्यात आली. घरकूल बांधणीत जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर असून बहुतांशी घरकूल बांधून पूर्ण झाले. विविध करणांनी रखडलेल्या सुमारे १८८ पाणीपुरवठा योजनांचे कामे पूर्ण करण्यात आले. सॅम, मॅमचे बालके कुपोषणातून मुक्त करण्याची प्रगती आदी विषयांची माहिती दिली. 

टॅग्स :Schoolशाळा