शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पोटाची खळगी भरताना स्व: रक्षणासाठी मुलगी झाला मुलगा; ८ महिन्यानंतर पोलीस चौकशीत सत्य आले जगासमोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 17:17 IST

Police News : लॉकडाऊन काळात शांतिनगर परिसरात पोलिस गस्त घालत असताना एका मुलावर संशय आल्याने पोलिसांनी त्याच्याकडे विचारपूस करायला सुरुवात केली.

ठळक मुद्देछाया दशरथ माने ( वय २१ रा.हडपसर पुणे ) असे मुलगा बनून वावरणाऱ्या मुलीचे नाव आहे.

नितिन पंडीतभिवंडी - सध्याच्या जगात मुली अथवा महिला सुरक्षित नसल्याचे अनेक अत्याचाराच्या प्रकरणातून दररोज समोर येत असतात. त्यातच गरिबीमुळे घर सोडून मुंबईस कामाच्या शोधत आलेली मुलगी भिवंडीत तब्बल आठ महिने मुलगा बनून मिळेल ते काम करून गुजराण करीत असल्याचे पोलिसांनी  संशय वरून ताब्यात घेतलेल्या मुलाची चौकशी करीत असताना तो मुलगा नसून मुलगी असल्याचे बिंग फुटले त्यामुळे पोलीस यंत्रणा ही चक्रावून गेली. छाया दशरथ माने ( वय २१ रा.हडपसर पुणे ) असे मुलगा बनून वावरणाऱ्या मुलीचे नाव आहे.          

घरची हलाकीची आर्थिक परिस्थिती असल्याने पैसे कमविण्यासाठी छायाने पुण्यातील घर सोडले व मुंबईची वाट धरली .पण मुंबई मध्ये काम न मिळाल्याने तिने भिवंडी शहर गाठले .भिवंडीत मिळेल ते मोलमजुरीचे काम करून तिने आपली गुजराण सुरू केली . काम न मिळाल्यास कोणी दिलेल्या भाकर तुकड्यावर आपली भूक भागविली .भिवंडीत तब्बल आठ महिन्यांपासून छाया ही मुलगा बनून  वावरत होती. परंतु लॉकडाऊन असल्याने तिला काम काही मिळालं नाही. तरी तिने जिद्द सोडली नाही जे काही काम मिळेल ते काम ती करायची तसेच राहण्याची सोय नसल्याने इमारतीच्या आडोशाला ती झोपायची. आशा परिस्थितीत वावरताना स्वतःचे रक्षण कसे करावे हा प्रश्न तिला सतावत असताना तिने शक्कल लढवली अन् मुलगा बनली. स्वतःचे नाव तिने समीर शेख असल्याचे सांगू लागली .त्यासाठी तिने स्वतःची वेशभूषा देखील बदलून मुलांसारखे केस लहान केले, त्यामुळे परिसरात कोणीही तिला मुलगी म्हणून ओळखू शकलं नाही.       

दरम्यान लॉकडाऊन काळात शांतिनगर परिसरात पोलिस गस्त घालत असताना एका मुलावर संशय आल्याने पोलिसांनी त्याच्याकडे विचारपूस करायला सुरुवात केली. परंतु समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पोलिसांनी या मुलास पोलीस ठाण्यात आणून त्याकडे कसून चौकशी सुरू केली असता हे सत्य समोर आलं की तो मुलगा नसून ती मुलगी आहे. हे समजल्यावर पोलीसही चक्रावले. पोलिसांनी तिच्याकडून माहिती काढत तिचा घरचा पत्ता घेतला. ती पुणे, हडपसर परिसरात राहत असून तिचे खरे नाव छाया माने आहे हे स्पष्ट झाल्यावर शांतीनगर पोलिसांनी हडपसर पोलीस ठाण्यात चौकशी केली असता छाया ही आठ महिन्या पासून बेपत्ता असल्याचे व त्या बाबत कुटुंबियांची तक्रार ही दाखल असल्याचे समजले तेव्हा पोलिसांनी दोन दिवसांच्या प्रयत्नानंतर तिच्या आई-वडिलांचा शोध घेऊन त्यांना भिवंडीत पाचारण केले व छाया हिस तिच्या कुटुंबियां कडे सुखरूप स्वाधीन केले आहे .

टॅग्स :bhiwandiभिवंडीPoliceपोलिसFamilyपरिवारMumbaiमुंबईthaneठाणे