शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

केंद्राकडून कोळसा मिळत नसल्याने राज्यात भारनियमन - गिरीश महाजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 23:58 IST

राज्यातील भारनियमनासाठी जलसंपदा मंत्र्यांनी गुरुवारी केंद्र सरकारला दोषी धरले. सप्टेंबर आणि आॅक्टोबरमध्ये विजेची जास्त मागणी होती.

डोंबिवली : राज्यातील भारनियमनासाठी जलसंपदा मंत्र्यांनी गुरुवारी केंद्र सरकारला दोषी धरले. सप्टेंबर आणि आॅक्टोबरमध्ये विजेची जास्त मागणी होती. ही समस्या सगळीकडेच आहे. मात्र केंद्राकडूनच कोळसा येण्यास विलंब होत असल्याने महाराष्टÑात भारनियमनाचा प्रश्न कायम असल्याचे स्पष्ट करून, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी १० ते १२ दिवसांत ही समस्या सोडविली जाईल, अशी माहिती येथे दिली.डोंबिवली येथे एका प्रकल्पाचा शुभारंभ महाजन यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आला. याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. महाराष्टÑाचा कोळसा ज्या ठिकाणी निवडणुका आहेत, त्या ठिकाणी वळविला जात आहे, या आरोपाचे त्यांनी खंडण केले. राज्यातील ४० टक्के आमदार, खासदारांची कामे बरोबर नसल्याचा अहवाल अलीकडेच प्रसिद्ध झाला. त्यावर महाजन म्हणाले की, याबाबत सोशल मीडियावर केवळ टाइमपास सुरू आहे. प्रत्यक्षात तशी परिस्थिती नाही. हा खोडसाळपणा जाणीवपूर्वक केला जात आहे.महाराष्टÑाच्या दुष्काळी परिस्थितीबाबत बोलताना ते म्हणाले, मराठवाड्यात केवळ २६ टक्के पाणीसाठे शिल्लक आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ३० टक्क्यांनी कमी आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री राज्यभरात बैठका घेत आहेत. यासंदर्भात औरंगाबाद येथे नुकतीच बैठक पार पडली. सरकार या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजन