शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
5
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
6
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
7
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
9
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
10
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
11
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
12
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
13
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
14
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
15
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
16
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
17
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
18
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
19
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
20
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट

पत्रीपुलाचे काम लवकर मार्गी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 12:26 AM

एकनाथ शिंदे : भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याच्या कामाचाही घेतला आढावा

कल्याण : भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याचे सहापदरीकरण तसेच कल्याणच्या पत्रीपुलाचे काम लवकरात लवकर मार्गी लावा, असे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सोमवारी दिले.

भिवंडी-कल्याण-शीळ सहापदरीकरणाच्या कामासह पत्रीपुलाच्या कामाची पाहणी शिंदे यांनी सोमवारी केली. यावेळी त्यांच्यासोबत कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सुभाष भोईर, राज्य रस्ते विकास महामंडळ आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.शीळ येथून सहापदरीकरणाच्या कामाची पाहणी पालकमंत्र्यांनी सुरू केली. भिवंडी-शीळ-कल्याण रस्त्यावरील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी हा रस्ता सहापदरी करण्याच्या कामाचा शुभारंभ ३० डिसेंबर २०१८ ला पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. याचवेळी पत्रीपुलाच्या नव्या उभारणीसाठीच्या कामाचाही शुभारंभ करण्यात आला. भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याच्या सहापदरीकरणाच्या कामासाठी ३९० कोटी रुपये मंजूर आहेत. त्यापैकी १५० कोटी सार्वजनिक बांधकाम विभाग व २४० कोटी रुपये राज्य रस्ते विकास महामंडळाकडून खर्च केले जाणार आहेत. सध्या हा रस्ता चारपदरी असून, त्याचे सहापदरीकरण करण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. मात्र, हे काम संथगतीने सुरू आहे. अनेक ठिकाणी दुतर्फा गटारे तयार केलेली नाहीत. या प्रकल्पासाठी भूसंपादन करण्यात आले आहे. मात्र, काही ठिकाणी सहापदरीकरणाच्या कामाला सुरुवात झालेली नाही. ते तातडीने करावे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना १५ मीटरचा रस्ता हवा. त्यानुसार, हा रस्ता सहापदरीकरणामुळे एकूण ३० मीटर रुंदीचा असावा. त्यासाठी आज काही ठिकाणी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत मोजमाप करण्यात आले. रस्त्याच्या पाहणीनंतर शिंदे यांनी पत्रीपुलाच्या कामाचा आढावा घेतला. पुलाची प्रत्यक्ष पाहणी केली. पूल उभारण्यासाठी पुलाचे आधारखांब उभारण्याचे काम सुरू झाले आहे. पुलाच्या वरचा भाग हैदराबाद येथे तयार करण्यात येत आहे. पत्रीपुलाचे काम मार्च २०२० अखेर पूर्ण करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत असले, तरी हे काम डिसेंबर २०१९ अखेर पूर्ण करण्याचे लक्ष्य अधिकारीवर्गाने डोळ्यांसमोर ठेवून हे काम गतीने मार्गी लावावे, असे आदेश पालकमंत्र्यांनी दिले.बदलापूर जंक्शन येथे हवा उड्डाणपूलकल्याण-शीळ रस्त्यावर काटई गावानजीक असलेल्या बदलापूर जंक्शनकडून एक रस्ता अंबरनाथमार्गे बदलापूरला जातो. बदलापूर जंक्शन ते पलावा जंक्शन यादरम्यान वाहतूककोंडी होते. तेथे एक एलिव्हेटेड मार्गिका असावी. त्यामुळे या जंक्शनपासून पलावापर्यंत वाहतूककोंडी होणार नाही, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली. त्यावर नक्कीच विचार केला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री शिंदे यांनी दिले आहे.

टॅग्स :kalyanकल्याणthaneठाणे