शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

गजलकार संतोष ‘शजर’ यांच्या ‘दु:खाला सलाम’ या गजल संग्रहाचे प्रकाशन संपन्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 4:35 PM

गजल सागर प्रतिष्ठानतर्फे शनिवारी सायं.नरेंद्र बल्लाळ सभागृह, ठाणे महापालिका येथे गजलकार संतोष ‘शजर’ यांच्या ‘दु:खाला सलाम’ या गजल संग्रहाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. 

ठळक मुद्दे‘दु:खाला सलाम’ या गजल संग्रहाचा प्रकाशन सोहळा गजलमध्ये सच्च माणूस घडविण्याची ताकद आहे - भीमराव पांचाळेदु:खाला सलाम करण्याची हिमत फक्त संतोष यांच्यात - मधुसुदन नानीवडेकर

ठाणे : गजल सागर प्रतिष्ठानतर्फे शनिवारी महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे गजलकार संतोष ‘शजर’ यांच्या ‘दु:खाला सलाम’ या गजल संग्रहाचे प्रकाशन झाले. यावेळी गजलमध्ये सच्च माणूस घडविण्याची ताकद आहे अशा भावना गजलनवाज भीमराव पांचाळे यांनी व्यक्त केल्या. 

     ते म्हणाले की, आम्ही सर्वाना सोबत घेऊन चालण्याचा वसा घेतला आहे. गजलकार संतोष यांच्यामधला गजलकार गजलनेच घडवला असल्याच ते म्हणाले. 9 व्या अ. भा. मराठी गजल संमेलनाचे अध्यक्ष मधुसुदन नानीवडेकर म्हणाले की, दु:खाला शरण सर्वच जण जातात पण त्याच दु:खाला सलाम करण्याची हिमत फक्त संतोष यांच्यात आहे. दु:खाला सलाम करायला कवीमन लागत असते असे सांगत त्यांनी त्यांचे कौतुक केले. महापालिका उपायुक्त संदीप माळवी म्हणाले की, वेदनेमुळे जगणं समृद्ध नव्हे तर समृद्धदार होते. दु:खाला सलाम करण्यासाठी समज असावी लागते. दु:खाला सलाम करीत नाही तोर्पयत दु:खाला भिडण्याचे बळ प्राप्त होत नाही. दु:खाला सलाम करण्याचे धारिष्टय़ संतोष यांच्या गजलांमधून वाचायला मिळेल असे ते म्हणाले. मी गजल, कवितांमधूनच घडलो अशा भावना खास लंडनहून आलेले अॅड. रविंद्र लगाडे यांनी व्यक्त केल्या. त्यानंतर संतोष व त्यांच्या आई यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. सोहळ्य़ानंतर ज्येष्ठ गजलकार ए.के. शेख यांच्या अध्यक्षतेखाली उपस्थित गजलकारांचा मुशायरा पेश झाला. ‘मोगरा फुलतो सकाळी, सोस थोडी कळ जरा’ या विशाल राजगुरूंनी सादर केलेल्या या गजलने मुशायराची सुरूवात झाली. त्यानंतर राजेंद्र वैशंपायन यांनी ‘खोल जखमा माङया उरी, पण थेंब नेत्रीचा गळेना..’, पत्रकार माधव डोळे यांनी ‘ही मंद तेवते वात कधीची आत, ती प्रसन्न दु:खे पावन गाभा:यात’, ‘तूर पिकवली खूप, मिळेना भावच साला, फक्त आमचे शेतकरी नाच साला’, उपायुक्त माळवी यांनी ‘तु खुले आकाश माङो, तू नवा विश्वास माझा’, ‘मी शोध सुखाचा घ्याया, आयुष्य गमावून बसलो’, डी.एन. गांगला यांनी ‘कसे कसे मज धडे मिळाले, हि:याऐवजी खडे मिळाले’, संतोष शजर यांनी ‘माणूस होण्यापेक्षा मी जर पक्षी बनलो असतो, मंदिर, मस्जीद, गिरीजाघर कोठेही बसलो असतो’, नानीवडेकर यांनी ‘तुङयाकडे मागावे काही ही तर माझी हिंमत नाही, समजून काही द्यावे घ्यावे तेवढी तुझी दानत नाही’ तर शेख यांनी ‘सुखाबरोबर दु:खाचा सत्कार करुया, असे सहज आयुष्याचे अलवार करुया’ या गजल सादर झाल्या. यावेळी अधून मधून वाह वाह, क्या बात, बहुत बढीयाची दाद मिळाली. कार्यक्रमाचे निवेदन रवि मानकर यांनी केले. 

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई