शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

तिथेही गप्पांची मैफिल जमवायला...देवांना हसवायला! एक हसरा चेहरा हरवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 23:35 IST

अशोक शेवडे यांच्यावर एक लेख लिहा, असा मला फोन आला आणि आठवणींचे मोहोळ उठले. मोहोळामधल्या मधमाश्या सभोवताली फिरू लागल्या, पण मला मुळीच न डसता... उलट, आनंदाच्या विविधरंगी फुलांवर विराजमान झाल्या, आणि मधुर मधासारख्या अनेक आनंददायी आठवणी मनामध्ये पाझरू लागल्या...

प्राची देवस्थळी

‘तुमच्या सदाबहार व्यक्तिमत्त्वाचे रहस्य काय?’ ‘चंदेरीसोनेरी कार्यक्रमातील हा माझा त्यांना पहिलाच प्रश्न... त्यावर केवळ उत्तरच नाही तर अनेक गमतीदार किस्से, विनोदी चुटकुले, सुविचार, स्वानुभव यांची बरसात सुरू व्हायची. हंशा टाळ्यांचा पाऊस पडायचा! अशोक शेवडे नावाची ‘मैफिल’च रंगायची म्हणा ना! अशोकजी... खरे तर एक असे व्यक्तिमत्त्व जे कधीच कोणाच्याही हाताला लागले नाही! किंबहुना त्यांचे लाडके कवी ‘सुरेश भट’ यांच्या काव्यात सांगायचे झाले तर- ‘रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!’

तसे पाहायला गेले तर मनमोकळ्या गप्पा मारणारे अशोकजी साऱ्यांनाच हवेहवेसे वाटणारे. मग ते दूरच्या प्रवासाला निघालेले त्यांचे परममित्र रसिकराज सुशीलकुमार शिंदे असोत किंवा मराठी चित्रपट दुनियेवर राज्य करणारे रमेश देव असोत. यांच्या प्रवासात अखंड ‘शब्दौघ’ घेऊन अशोकजी स्वत:ही एंजॉय करायचे आणि सहप्रवाशालाही आनंदी करायचे. हसत ठेवायचे!!

नावात काय आहे? असे म्हणून पुढच्या प्रश्नाकडे जाताना मी नेहमी म्हणायचे, ‘मंडळी, अहो, नावातच खूप काही आहे! आता पाहा यांचे नाव ‘अशोक’ अर्थात जिथे शोक (दु:ख) नाही ते ‘अ-शोक’. ‘यावर तितक्याच तत्परतेने ते म्हणायचे, ‘जगामधल्या दु:खापेक्षा माझे लक्ष नेहमीच सुखाकडे, आनंदाकडे असते. तुम्हीही तेच करा. आनंदाचा विचार करा म्हणजे तुम्हीही अ-शोक व्हाल. आनंदी राहाल.’ गेल्या पस्तीस वर्षांत मी आणि त्यांच्या सहवासात आलेला प्रत्येक जण त्यांच्याकडून खूप काही शिकत आलाय. ‘आधी केले मग सांगितले’ या उक्तीप्रमाणे ते स्वत: प्रत्येक गोष्ट अनुभवणार आणि करणार आणि मगच सांगणार. विविध माध्यम लीलया हाताळताना ‘अभ्यासूनि प्रकटावे’ हे तंतोतंत पाळून ५००० मुलाखतींचा विक्रम करणारे अशोकजी हे एक अजबच रसायन होते! मार्गदर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येकाला इतके काही सांगायचे की, येणारा परत जाताना ‘तृप्त’ होऊन जायचा. त्यांचा मित्रपरिवार प्रचंड होता. त्यांना ‘रिकामपण’ असे कधीच आले नाही. अत्यंत हरहुन्नरी! रोज नवनवीन कल्पना सांगणे, ‘चंदेरी सोनेरी’च्या ४००व्या प्रयोगाची जणू काही उद्याच कार्यक्रम आहे, अशा रीतीने तयारी करणे, सतत काहीतरी लिहिणे, अनेक कात्रणे, विनोदी गोष्टी जमवणे, जमविलेले सारे व्यवस्थित वहीत चिकटवून ठेवणे. सारे काही प्रचंड वेगाने ते करायचे. विचारांचा वेग तर वादळालाही लाजवेल असा असायचा! एखादी गोष्ट, एखादा किस्सा सांगायला घेतला की त्यात खूप सारे तपशील सांगायचे. कारण अनुभवाचे भलेमोठे भांडार त्यांच्याकडे होते. त्या भांडारामध्ये हिरे, माणके, मोती, सोने-नाणे इतके होते की कधीच न संपणारे. अगदी द्रौपदीच्या थाळीसारखे!

मार्च महिन्याच्या सुरुवातीचे काही दिवस अशाच गप्पाटप्पा अर्थात भ्रमणध्वनीवर चालू होत्या आणि अचानक ‘मी हॉस्पिटलमध्ये आहे.’ हे त्यांचे वाक्य ऐकले आणि मी सुन्न झाले. त्यानंतर संपर्क तुटला! त्यांचा सुपुत्र अमित याला शेवटी फोन केला आणि सारे काही कळले. पाहता पाहता त्यांची तब्येत खालावत गेली आणि अखेर तो हृदयद्रावक क्षण आला. लोकप्रिय मुलाखतकार, निवेदक, लेखक-दिग्दर्शक, दूरदर्शन आकाशवाणी कलावंत, प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा हा कोणाचा मित्र, कोणाचा गुरू, कोणाचा मार्गदर्शक मुख्य म्हणजे एक अफलातून रसिक सर्वांना दु:खात लोटून स्वत: डोळे मिटून शांतपणे हे जग सोडून गेला. थेट स्वर्गात... तिथेही गप्पांची मैफिल जमवायला... देवांना हसवायला! परमेश्वराला त्याचेच पृथ्वीवरचे किस्से सांगून मनसोक्त हसवायला. परमेश्वराला तरी कोण हसवणार?