शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघांचा मृत्यू
2
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
3
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
5
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
6
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
7
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
8
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
9
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
10
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
11
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
12
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
13
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
14
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
15
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
16
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
17
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
18
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
19
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
20
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल

मीरा-भाईंदर मध्ये उघड्यारील कचरा कुंड्यां मुळे कचऱ्याचा प्रश्न गंभीर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 18:26 IST

मीरा भाईंदर महापालिका शून्य कचरा कुंडीचे शहर म्हणून मिरवत असली तरी प्रत्यक्षात मात्र ते तद्दन खोटे आहे. कारण शहरात ठिकठिकाणी उघड्यावरील कचरा कुंड्या मोठ्या प्रमाणात असून पालिकेचे कर्मचारी तसेच परिसरातील रहिवाशी कचरा आणून टाकत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड -मीरा भाईंदर महापालिका शून्य कचरा कुंडीचे शहर म्हणून मिरवत असली तरी प्रत्यक्षात मात्र ते तद्दन खोटे आहे. कारण शहरात ठिकठिकाणी उघड्यावरील कचरा कुंड्या मोठ्या प्रमाणात असून पालिकेचे कर्मचारी तसेच परिसरातील रहिवाशी कचरा आणून टाकत आहेत. त्यामुळे घाणीचे आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून रोगराईचा धोका कायम आहे. 

मीरा भाईंदर महापालिका हि स्वच्छ भारत सर्वेक्षणात शासन स्तरावर शहर कचराकुंडी मुक्त शहर असल्याचा दावा करते . शहरात कचरा कुंडी नसल्याचे खोटे सांगून स्वतःची पाठ थोपटवून घेण्यात पालिकेचा हातखंडा आहे . परंतु प्रत्यक्षात मात्र शहरात ठिकठिकाणी आजही कचरा कुंड्या कायम आहेत . शहरातील झोपडपट्टी व गावठाण भागातच नव्हे तर इमारती क्षेत्रात देखील कचरा कुंड्या सर्रास सुरु आहेत . 

वास्तविक महापालिकेने कचरा गोळा करण्यासह साफसफाईसाठी नेमलेल्या ठेकेदाराने घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे अपेक्षित असताना झोपडपट्ट्या, गावठाण व चाळी क्षेत्रात घरोघरी जाऊन कचरा गोळा केला जात नाही. तर ज्या ठिकाणी कचरा गोळा केला जातो तो एकत्र आणून त्याच भागातील एखाद्या मोकळ्या जागेत टाकला जातो . तर काही ठिकाणी परिसरातील रहिवाशी कचरा आणून जवळच्या मोकळ्या जागेत टाकत असतात . 

ओला व सुका कचरा वर्गीकरण न करताच एकत्र आणून रस्त्या व मोकळ्या जागेत टाकला जात असल्याने त्या बेकायदा कचरा कुंड्यांच्या ठिकाणी कचरा सर्वत्र अस्ताव्यस्त पसरतो. त्यावर मोकाट गुरं , श्वान गोळा होतात. कचरा सर्वत्र पसरतो आणि दुर्गंधी पसरते. परिसरात घाणीचे साम्राज्य असते. उत्तन , मोरवा , गणेश देवल नगर आदी भागात तर कांदळवनातच पालिकेने अश्या बेकायदा कचरा कुंड्या चालवल्या आहेत. 

शहरातील ह्या कचरा कुंड्यांवर एकत्र गोळा होणारा कचरा हा ओला व सुका असा वेगळा करून घनकचरा प्रकल्पात न्यावा लागत आहेत . जेणे करून अनेक भागातील कचरा हा एक ते दोन दिवस उचलला जात नाही . परिणामी घाणीचे साम्राज्य पसरून रोगराईची भीती वाढली आहे. परंतु महापालिका मात्र ह्या बेकायदा कचरा कुंड्या बंद करून कचरा टाकणाऱ्या लोकांवर कारवाई न करता त्यांना प्रोत्साहन देत आहेत. पालिका नागरिकांकडून घनकचरा शुल्क वसूल करत आहे मात्र घरोघरी जाऊन ओला व सुका कचरा गोळा करत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकGarbage Disposal Issueकचरा प्रश्न