शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भाईंदर मध्ये उघड्यारील कचरा कुंड्यां मुळे कचऱ्याचा प्रश्न गंभीर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 18:26 IST

मीरा भाईंदर महापालिका शून्य कचरा कुंडीचे शहर म्हणून मिरवत असली तरी प्रत्यक्षात मात्र ते तद्दन खोटे आहे. कारण शहरात ठिकठिकाणी उघड्यावरील कचरा कुंड्या मोठ्या प्रमाणात असून पालिकेचे कर्मचारी तसेच परिसरातील रहिवाशी कचरा आणून टाकत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड -मीरा भाईंदर महापालिका शून्य कचरा कुंडीचे शहर म्हणून मिरवत असली तरी प्रत्यक्षात मात्र ते तद्दन खोटे आहे. कारण शहरात ठिकठिकाणी उघड्यावरील कचरा कुंड्या मोठ्या प्रमाणात असून पालिकेचे कर्मचारी तसेच परिसरातील रहिवाशी कचरा आणून टाकत आहेत. त्यामुळे घाणीचे आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून रोगराईचा धोका कायम आहे. 

मीरा भाईंदर महापालिका हि स्वच्छ भारत सर्वेक्षणात शासन स्तरावर शहर कचराकुंडी मुक्त शहर असल्याचा दावा करते . शहरात कचरा कुंडी नसल्याचे खोटे सांगून स्वतःची पाठ थोपटवून घेण्यात पालिकेचा हातखंडा आहे . परंतु प्रत्यक्षात मात्र शहरात ठिकठिकाणी आजही कचरा कुंड्या कायम आहेत . शहरातील झोपडपट्टी व गावठाण भागातच नव्हे तर इमारती क्षेत्रात देखील कचरा कुंड्या सर्रास सुरु आहेत . 

वास्तविक महापालिकेने कचरा गोळा करण्यासह साफसफाईसाठी नेमलेल्या ठेकेदाराने घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे अपेक्षित असताना झोपडपट्ट्या, गावठाण व चाळी क्षेत्रात घरोघरी जाऊन कचरा गोळा केला जात नाही. तर ज्या ठिकाणी कचरा गोळा केला जातो तो एकत्र आणून त्याच भागातील एखाद्या मोकळ्या जागेत टाकला जातो . तर काही ठिकाणी परिसरातील रहिवाशी कचरा आणून जवळच्या मोकळ्या जागेत टाकत असतात . 

ओला व सुका कचरा वर्गीकरण न करताच एकत्र आणून रस्त्या व मोकळ्या जागेत टाकला जात असल्याने त्या बेकायदा कचरा कुंड्यांच्या ठिकाणी कचरा सर्वत्र अस्ताव्यस्त पसरतो. त्यावर मोकाट गुरं , श्वान गोळा होतात. कचरा सर्वत्र पसरतो आणि दुर्गंधी पसरते. परिसरात घाणीचे साम्राज्य असते. उत्तन , मोरवा , गणेश देवल नगर आदी भागात तर कांदळवनातच पालिकेने अश्या बेकायदा कचरा कुंड्या चालवल्या आहेत. 

शहरातील ह्या कचरा कुंड्यांवर एकत्र गोळा होणारा कचरा हा ओला व सुका असा वेगळा करून घनकचरा प्रकल्पात न्यावा लागत आहेत . जेणे करून अनेक भागातील कचरा हा एक ते दोन दिवस उचलला जात नाही . परिणामी घाणीचे साम्राज्य पसरून रोगराईची भीती वाढली आहे. परंतु महापालिका मात्र ह्या बेकायदा कचरा कुंड्या बंद करून कचरा टाकणाऱ्या लोकांवर कारवाई न करता त्यांना प्रोत्साहन देत आहेत. पालिका नागरिकांकडून घनकचरा शुल्क वसूल करत आहे मात्र घरोघरी जाऊन ओला व सुका कचरा गोळा करत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकGarbage Disposal Issueकचरा प्रश्न