शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
5
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
6
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
7
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
8
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
9
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
10
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
11
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
12
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
13
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
14
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
15
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
16
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
17
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
18
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
19
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
20
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...

कचराकोेंडीवरून सोसायट्यांना सत्ताधाऱ्यांचे मिळणार बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 23:55 IST

महासभेतही उठणार वादळ, विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष

ठाणे : प्रतिदिन १०० किलोग्रॅमपेक्षा जास्तीची कचºयाची निर्मिती करणाºया आस्थापना तसेच ज्या सोसायट्या पाच हजार स्क्वेअर मीटरच्या क्षेत्रात वसल्या आहेत, त्यांनी आहे त्याच ठिकाणी कचºयाची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्याचे बंधन ठाणे महापालिकेने पुन्हा एकदा घातले आहे. यासाठी अशा कामचुकार आस्थापना आणि सोसायट्यांना प्रशासनाने नोटिसा बजावल्यानंतर त्यांना समज देण्याऐवजी गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय सत्ताधारी शिवसेनेने घेतला आहे. यामुळे या मुद्यावरून या वर्षीही वादळ उठण्याची चिन्हे निर्माण झाली असून विरोधकांच्या भूमिकेकडेही लक्ष लागले आहे.

गेल्या वर्षापूर्वी एका व्यक्तीच्या जनहित याचिकेवरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारचे कान टोचल्यानंतर सरकारने अध्यादेश काढून सोसायट्यांनी निर्मितीच्या ठिकाणीच कचरा विल्हेवाटीचे बंधन घातल्यानंतर महापालिकेने गेल्या वर्षी शहरातील आस्थापनांना नोटिसा बजावून कचरा विल्हेवाटीचे बंधन घातले होते. तेव्हाही तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करून आॅक्टोबरअखेरपर्यंतची मुदतवाढ सोसायट्यांना दिली होती. परंतु, त्यानंतर झालेल्या निवडणुका आणि इतर काही घडामोडींमुळे हे प्रकरण बासनात गुंडाळले होते. परंतु, आता पुन्हा वर्षभरानंतर पालिकेने नोटिसा धाडण्यास सुरुवात केल्याने, या प्रकरणाला पुन्हा राजकीय वळण लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.

या विषयावरून येत्या महासभेत यासंदर्भात लोकप्रतिनिधी पुन्हा प्रशासनाची परीक्षा घेणार असल्याचे समजते. मात्र, महापालिका त्यांचे काम करीत आहे, आम्ही लोकांचे हित लक्षात घेऊन त्यांच्या बाजूने उभे राहू, असा पवित्रा महापौर नरेश म्हस्के यांनी घेतला आहे. यातून सत्ताधारी पुन्हा एकदा कचºयाची शास्त्रोक्त विल्हेवाट न लावणाºया शहरातील आस्थापना व सोसायट्यांच्या बाजूने उभे राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे होईल उल्लंघनसर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार देशभरातील सर्वच महापालिका क्षेत्रांतील प्रतिदिन १०० किलोग्रॅम पेक्षा जास्तीची कचºयाची निर्मिती करणाºया आस्थापना तसेच पाच हजार स्क्वेअर मीटर क्षेत्रातील सोसायट्यांना केंद्राने हे कचरा विल्हेवाटीचे बंधन घातले आहे. यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करणे, हे सर्वच पक्षांचे कर्तव्य आहे. परंतु, ठाण्यात जर सत्ताधारी शिवसेनेने कचºयाची विल्हेवाट न लावणाºया कामचुकार सोसायट्यांना पाठिंबा देऊन त्यांची पाठराखण केली, तर ते न्यायालयीन निर्देशांचे उल्लंघन ठरेल, अशी भीती एका अधिकाºयाने व्यक्त केली आहे.