शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कचराकोेंडीवरून सोसायट्यांना सत्ताधाऱ्यांचे मिळणार बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 23:55 IST

महासभेतही उठणार वादळ, विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष

ठाणे : प्रतिदिन १०० किलोग्रॅमपेक्षा जास्तीची कचºयाची निर्मिती करणाºया आस्थापना तसेच ज्या सोसायट्या पाच हजार स्क्वेअर मीटरच्या क्षेत्रात वसल्या आहेत, त्यांनी आहे त्याच ठिकाणी कचºयाची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्याचे बंधन ठाणे महापालिकेने पुन्हा एकदा घातले आहे. यासाठी अशा कामचुकार आस्थापना आणि सोसायट्यांना प्रशासनाने नोटिसा बजावल्यानंतर त्यांना समज देण्याऐवजी गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय सत्ताधारी शिवसेनेने घेतला आहे. यामुळे या मुद्यावरून या वर्षीही वादळ उठण्याची चिन्हे निर्माण झाली असून विरोधकांच्या भूमिकेकडेही लक्ष लागले आहे.

गेल्या वर्षापूर्वी एका व्यक्तीच्या जनहित याचिकेवरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारचे कान टोचल्यानंतर सरकारने अध्यादेश काढून सोसायट्यांनी निर्मितीच्या ठिकाणीच कचरा विल्हेवाटीचे बंधन घातल्यानंतर महापालिकेने गेल्या वर्षी शहरातील आस्थापनांना नोटिसा बजावून कचरा विल्हेवाटीचे बंधन घातले होते. तेव्हाही तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करून आॅक्टोबरअखेरपर्यंतची मुदतवाढ सोसायट्यांना दिली होती. परंतु, त्यानंतर झालेल्या निवडणुका आणि इतर काही घडामोडींमुळे हे प्रकरण बासनात गुंडाळले होते. परंतु, आता पुन्हा वर्षभरानंतर पालिकेने नोटिसा धाडण्यास सुरुवात केल्याने, या प्रकरणाला पुन्हा राजकीय वळण लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.

या विषयावरून येत्या महासभेत यासंदर्भात लोकप्रतिनिधी पुन्हा प्रशासनाची परीक्षा घेणार असल्याचे समजते. मात्र, महापालिका त्यांचे काम करीत आहे, आम्ही लोकांचे हित लक्षात घेऊन त्यांच्या बाजूने उभे राहू, असा पवित्रा महापौर नरेश म्हस्के यांनी घेतला आहे. यातून सत्ताधारी पुन्हा एकदा कचºयाची शास्त्रोक्त विल्हेवाट न लावणाºया शहरातील आस्थापना व सोसायट्यांच्या बाजूने उभे राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे होईल उल्लंघनसर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार देशभरातील सर्वच महापालिका क्षेत्रांतील प्रतिदिन १०० किलोग्रॅम पेक्षा जास्तीची कचºयाची निर्मिती करणाºया आस्थापना तसेच पाच हजार स्क्वेअर मीटर क्षेत्रातील सोसायट्यांना केंद्राने हे कचरा विल्हेवाटीचे बंधन घातले आहे. यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करणे, हे सर्वच पक्षांचे कर्तव्य आहे. परंतु, ठाण्यात जर सत्ताधारी शिवसेनेने कचºयाची विल्हेवाट न लावणाºया कामचुकार सोसायट्यांना पाठिंबा देऊन त्यांची पाठराखण केली, तर ते न्यायालयीन निर्देशांचे उल्लंघन ठरेल, अशी भीती एका अधिकाºयाने व्यक्त केली आहे.