शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
4
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
5
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
6
पीओकेमधील गोंधळामुळे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले! २३ अब्ज रुपयांचा निधी जाहीर
7
LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
8
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
9
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
10
ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."
11
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
12
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
13
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
14
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
15
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
16
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
17
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
18
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
19
सावत्र लेक दिया मिर्झाला म्हणत नाही आई, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली- "ती मला..."
20
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...

प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरूच; कोरोनानंतरही रिक्षाचालकांची मुजोरी सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 11:29 PM

दोनऐवजी तीन प्रवासी बसवून जास्त भाडे लाटतात

डोंबिवली : कोरोनाची लागण होऊ नये, याकरिता आरटीओने रिक्षात केवळ दोन प्रवासी घेण्याचा नियम केला असताना काही रिक्षाचालक तीन प्रवासी बसवून दुप्पट भाडे आकारत आहेत. रिक्षा बंद राहिल्याने झालेले नुकसान भरून काढण्याकरिता काही रिक्षाचालकांनी प्रवाशांची लूट सुरू केली आहे. त्यामुळे डोंबिवलीकर नाराज व भयभीत झाले आहेत.

डोंबिवलीत दूरच्या अंतराकरिता शेअर पद्धतीने रिक्षा चालवण्यात येत होत्या. मात्र, कोरोना महामारीनंतर जेव्हा रिक्षांची वाहतूक सुरू झाली, तेव्हा केवळ दोघांना बसण्याची परवानगी आरटीओने दिली. मात्र, काही रिक्षाचालक तीन किंवा चार प्रवासी बसवत आहेत. मानपाडा येथून पलावा येथे जाण्यासाठी अगोदर २० रुपये घेतले जात होते. केवळ दोन प्रवासी बसवायचे, या नियमामुळे रिक्षाचालकांनी भाडे दुप्पट वाढवून ४० रुपये केले. नंतर ते नियमही धाब्यावर बसवून तीन प्रवासी बसवले जात आहेत. त्यामुळे भाडे दुप्पट व प्रवासीही तीन बसवायचे, अशी हडेलहप्पी काही रिक्षाचालकांनी सुरू केली आहे.

प्रवाशांची लूट करून त्यांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे. मुंबई प्रवासाकरिता जून, जुलै महिन्यांत अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांनाच परवानगी होती. परंतु, आॅगस्टपासून खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावर येण्याची सक्ती केली. त्यासाठी एसटीचा प्रवास खर्चिक नसला, तरी प्रवासी संख्या वाढल्याने दोन जणांना एका सीटवर बसवतात. त्यामुळे संसर्गाची भीती वाढली आहे.

सकाळी रिक्षाचालक मनमानी पद्धतीने भाडे आकारतात. पूर्वेला इंदिरा गांधी चौकात बसची वाट पाहत उभे राहावे लागते. बस अन्यत्र कुठे थांबत नाही. त्यामुळे ठाकुर्ली, चोळेगाव आदी ठिकाणच्या प्रवाशांना इंदिरा गांधी चौकातच यावे लागते. च्खासगी वाहनाने अंबरनाथ, बदलापूर येथे येण्याजाण्यासाठी दिवसाला ३०० रुपये खर्च येत असल्याचे प्रवासी म्हणाले. रेल्वे वाहतूक बंद असतानाच कॉलेज सुरू झाले, तर हजारो विद्यार्थी प्रवासाकरिता गर्दी करतील. च्अशावेळी हा प्रवास अधिक त्रासदायक होणार असल्याचे अनेकांनी सांगितले. रेल्वे तातडीने सुरू करा आणि आमची या यातनादायक प्रवासातून सुटका करा, अशी मागणी येथील प्रवाशांनी केली.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस