शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

इथे कंबरभर पाण्यातूनच न्यावी लागते अंत्ययात्रा; मुंबईपासून हाकेच्या अंतरावरील तलासरीची कथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 05:44 IST

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या तलासरी तालुक्यातील बोरमाळ गावात कंबरभर पाण्यातूनच अंत्ययात्रा न्यावी लागत आहे.

सुरेश काटेतलासरी :

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या तलासरी तालुक्यातील बोरमाळ गावात कंबरभर पाण्यातूनच अंत्ययात्रा न्यावी लागत आहे. अंत्यसंस्कारासाठी नदीतून मृतदेह घेऊन जातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. स्मशानभूमीत जाण्यासाठी पूल नसल्याने अंत्यसंस्कारासाठी पार्थिवासह गावकऱ्यांना जीव मुठीत घेऊन नदीतून जावे लागते. 

मृत्यूनंतरची ही परवड थांबण्यासाठी गावकऱ्यांनी प्रशासनाला साकडे घातले आहे. तलासरीतील कोचाई-बोरमाळ ग्रुप ग्रामपंचायतींतर्गत येणाऱ्या बोरमाळ गावातील भेंडीपाडा, पारसपाडा या गावपाड्यात सुमारे सहाशे ते साडेसहाशे लोकवस्ती आहे. दोन्ही पाड्यांतील नागरिकांना अंत्यविधीसाठी नदीपलीकडे जावे लागते. गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस असल्याने नदीला पूर आला आहे. त्यामुळे भरपावसात उघड्यावर अंत्यविधीची वेळ आली आहे. प्रशासनाने मात्र डोळ्याला झापडे लावली आहेत. मागू भाना धोंडी यांचा २० ऑगस्टला मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव स्मशानभूमीत नेण्यासाठी नातेवाइकांना उपलाट  बोरमाळ आणि उपलाट या गावांतील नदीत उतरून जावे लागले. व्हायरल व्हिडिओमध्ये कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी मृतदेह खांद्यावर घेऊन जात असल्याचे दिसत आहे. त्यांच्या कमरेपर्यंत पाणी आले आहे. अंत्यविधीसाठी लागणारी लाकडे व इतर साहित्य २० किलोमीटर फेरा मारून न्यावे लागत आहे. 

रस्ता आहे, पण पूल नाहीविशेष म्हणजे बोरमाळ भेंडीपाडा येथील नदीपर्यंत डांबरी रस्ता तयार आहे, तर नदीच्या दुसऱ्या बाजूला उपलाट जाबीपाडा ते नदीपर्यंत डांबरी रस्ता आहे. या नदीच्या दोन्ही बाजूला सुमारे सहा ते सात वर्षांपूर्वी डांबरी रस्ता झाला, मात्र नदीपात्रात पूल बांधला नाही. 

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबई