शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

इथे कंबरभर पाण्यातूनच न्यावी लागते अंत्ययात्रा; मुंबईपासून हाकेच्या अंतरावरील तलासरीची कथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 05:44 IST

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या तलासरी तालुक्यातील बोरमाळ गावात कंबरभर पाण्यातूनच अंत्ययात्रा न्यावी लागत आहे.

सुरेश काटेतलासरी :

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या तलासरी तालुक्यातील बोरमाळ गावात कंबरभर पाण्यातूनच अंत्ययात्रा न्यावी लागत आहे. अंत्यसंस्कारासाठी नदीतून मृतदेह घेऊन जातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. स्मशानभूमीत जाण्यासाठी पूल नसल्याने अंत्यसंस्कारासाठी पार्थिवासह गावकऱ्यांना जीव मुठीत घेऊन नदीतून जावे लागते. 

मृत्यूनंतरची ही परवड थांबण्यासाठी गावकऱ्यांनी प्रशासनाला साकडे घातले आहे. तलासरीतील कोचाई-बोरमाळ ग्रुप ग्रामपंचायतींतर्गत येणाऱ्या बोरमाळ गावातील भेंडीपाडा, पारसपाडा या गावपाड्यात सुमारे सहाशे ते साडेसहाशे लोकवस्ती आहे. दोन्ही पाड्यांतील नागरिकांना अंत्यविधीसाठी नदीपलीकडे जावे लागते. गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस असल्याने नदीला पूर आला आहे. त्यामुळे भरपावसात उघड्यावर अंत्यविधीची वेळ आली आहे. प्रशासनाने मात्र डोळ्याला झापडे लावली आहेत. मागू भाना धोंडी यांचा २० ऑगस्टला मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव स्मशानभूमीत नेण्यासाठी नातेवाइकांना उपलाट  बोरमाळ आणि उपलाट या गावांतील नदीत उतरून जावे लागले. व्हायरल व्हिडिओमध्ये कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी मृतदेह खांद्यावर घेऊन जात असल्याचे दिसत आहे. त्यांच्या कमरेपर्यंत पाणी आले आहे. अंत्यविधीसाठी लागणारी लाकडे व इतर साहित्य २० किलोमीटर फेरा मारून न्यावे लागत आहे. 

रस्ता आहे, पण पूल नाहीविशेष म्हणजे बोरमाळ भेंडीपाडा येथील नदीपर्यंत डांबरी रस्ता तयार आहे, तर नदीच्या दुसऱ्या बाजूला उपलाट जाबीपाडा ते नदीपर्यंत डांबरी रस्ता आहे. या नदीच्या दोन्ही बाजूला सुमारे सहा ते सात वर्षांपूर्वी डांबरी रस्ता झाला, मात्र नदीपात्रात पूल बांधला नाही. 

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबई