शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

जादा परताव्याच्या आमिषाने गुंतवणूकदारांची साडेपाच कोटींची फसवणूक करणाऱ्या ठकसेनाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 22:55 IST

बांधकाम व्यवसायात जादा परताव्याच्या योजनांचे आमिष दाखवून ठाणे आणि उल्हासनगरच्या ४३ गुंतवणूकदारांची तब्बल पाच कोटी ५४ लाख ५० हजारांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील मुख्य सूत्रधार मनमोहन दिलीपसिंग आयलिसंगांनी (रा. उल्हासनगर) याला ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली.

ठळक मुद्देठाणे, उल्हासनगरच्या ४३ जणांना गंडा ठाणे आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : बांधकाम व्यवसायात जादा परताव्याच्या योजनांचे आमिष दाखवून ठाणे आणि उल्हासनगरच्या ४३ गुंतवणूकदारांची तब्बल पाच कोटी ५४ लाख ५० हजारांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील मुख्य सूत्रधार मनमोहन दिलीपसिंग आयलिसंगांनी (रा. उल्हासनगर) याला ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली. त्याला २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांनी रविवारी दिली.उल्हासनगर येथे सद्गुुरू डेव्हलपर्स आणि त्यांचे भागीदार सुंदर एस बजाज, लाल एस. बजाज, हिरासिंग आयलिसंगानी, मनमोहन आयलिसंगानी, फेरू पी. लुल्ला, नंदलाल पी. लुल्ला तसेच एजंट , गोबिंद मनचंदा आणि ओम मनचंदा या आठ जणांनी आपसात संगनमत करून बांधकाम व्यवसायात पैसे गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळेल, अशा योजनांचे आमिष दाखविले. ही योजना सुरू करण्यापूर्वीच गुुंतवणूक करणाऱ्यांना आकर्षक परताव्याचे प्रलोभन दाखविले. २०१५ पासून सुरू झालेल्या या योजनेत काही गुंतवणूकदारांना सुरुवातीच्या एक ते दीड वर्षात बऱ्यापैकी परतावाही दिला. मात्र, २०१७ पासून तो देण्याचे बंद झाले. वारंवार मागणी करूनही गुंतवणूकदारांना पैसे दिले जात नव्हते. आमिषाला बळी पडून ४३ गुंतवणूकदारांची तब्बल पाच कोटी ५४ लाख ५० हजारांची रक्कम गुंतविल्याचे समोर आले. आपले पैसे परत न मिळाल्याने त्यांनी २३ नोव्हेंबर २०२१ रोजी उल्हासनगर येथील मध्यवर्ती पोलीस ठाण्यात फसवणुकीसह महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थेच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम कायद्याखाली गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर सूत्रधार मनमोहन याच्यासह सर्वच पसार झाले. तर मनमोहन हा दोन महिन्यांपूर्वी परदेशात पसार झाला होता. त्याच्या विरोधात २६ नोव्हेंबर २०२१ रोजी ठाणे पोलिसांनी लूकआऊट नोटीस बजावली होती. तो १२ जानेवारी २०२२ रोजी दुबईतून परतल्यानंतर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर परतला. त्याचवेळी इमिग्रेशन विभागाने त्याला ताब्यात घेतले. ही माहिती मिळताच पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे, सहायक पोलीस आयुक्त अरविंद वढाणकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जगदीश पन्हाळे यांच्या पथकाने त्याला अटक केली. त्याच्या अन्यही साथीदारांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी