शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
4
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
5
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
6
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
7
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
8
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
9
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
10
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
11
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
12
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
14
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
15
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
16
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
17
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
18
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
19
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
20
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

मीरा-भाईंदरमधील १ हजार ३६ हेक्टर सरकारी जागेतील कांदळवन अखेर वन विभागाच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 22:05 IST

वन कायदा लागू झाल्याने माफिया - दलालांचे धाबे दणाणले 

मीरारोड - २००५ साली मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची तब्बल १५ वर्षांनी अमलबजावणी होऊन मीरा भाईंदर मधील सरकारी जमिनीवरील १ हजार ३६ हेक्टर इतके कांदळवन क्षेत्र शुक्रवारी महसूल विभागाने वन विभागाच्या कांदळवन कक्षास हस्तांतरित केले . या मुळे कांदळवनला वन कायद्याचे सुरक्षा कवच लाभले असून कांदळवन नष्ट करून बेकायदा बांधकामे करणाऱ्या आणि त्यांना सोयी सुविधा पुरवणाऱ्या माफिया - दलालांचे धाबे दणाणले आहेत . 

२००५ साली मुंबई उच्च न्यायालयाने कांदळवन व त्या पासूनच्या ५० मीटर चा बफर झोन संरक्षित करून कांदळवन क्षेत्र हे वन म्हणून संरक्षित करायचे आदेश दिले होते . कांदळवन नष्ट करून झालेले बेकायदा भराव , बांधकामे काढून पूर्वीची नैसर्गिक स्थिती निर्माण करण्याचे आदेश त्यावेळी न्यायालयाने दिले होते .  

न्यायालयाच्या आदेशा नंतर २००५ साली नवघर भागात कांदळवन ऱ्हास केल्याने पहिला गुन्हा मीरा भाईंदर महापालिकेच्या अधिकारी आणि ठेकेदारांवर दाखल करण्यात आला होता . त्या नंतर आज तागायत मीरा भाईंदर महापालिकेसह अनेक विकासक ,  राजकारणी तसेच सरकारी जमिनी वर कांदळवन नष्ट करून बांधकामे करणाऱ्यांवर पर्यावरण संरक्षण कायद्या नुसार असंख्य गुन्हे शहरातील विविध पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत . परंतु दाखल गुन्ह्यांचा तपासा पासून न्यायालयात प्रभावी बाजू मांडण्यात सुद्धा आरोपीना पाठीशी घालण्याची भूमिका प्रशासनाची दिसून आली आहे . 

एकीकडे गुन्हे दाखल होत असताना दुसरीकडे कांदळवन नष्ट करून भराव - बांधकामे आदी प्रकार सुरूच होते . कांदळवन व खाडीपात्र परिसरात अनेक बेकायदा बांधकामे झाली असताना एकही बांधकाम तोडुन भराव काढुन पुर्वी सारखी नैसर्गिक स्थिती केल्याचे उदाहरण नाही.  शहरातील पुरस्थितीला हे मोठे कारण ठरले आहे . 

 सरकारी कांदळवन क्षेत्रात भराव करुन बेकायदा बांधकामे , जागा वा खोल्या विक्री आणि खरेदी केल्या गेल्या आहेत. यातुन करोडो रुपयांची उलाढाल झाली. बांधकाम होताच त्याला घरपट्टी, नळ जोडणी, शिधावाटप पत्रिका, मतदार यादीत नाव , फोटोपास व वीज जोडणी पासुनच्या सर्व काही सुविधा लोकप्रतिनिधी व प्रशासनासह संबंधित माफिया व दलालांनी पुरवल्या. परंतु एकाही माफिया, दलाल आणि वरदहस्त असलेल्या नगरसेवक आदींवर फौजदारी कारवाई केली गेली नाही. नोट आणि वोट हे सूत्रच निसर्गाच्या मुळावर उठले आहे . 

बेकायदेशीर भराव आणि बांधकामां सोबतच या वस्त्यांचे मलमुत्र, सांडपाणी व कचरा देखील कांदळवनात जातोय .  पालिकेचे नाले देखील प्रक्रिया न करताच सांडपाणी व कचरा वाहुन नेणारे प्रदुषणकारी मार्ग ठरलेत. जानेवारी २०२१ मध्ये सरकारी जमिनी वरील कांदळवन क्षेत्र हे अधिसूचना काढून राखीव वन म्हणून जाहीर करण्याची कार्यवाही सुरु झाली . मार्च मध्ये सात बारा सदरी राखीव वन म्हणून नोंदी करण्यात आल्या . 

२ जून पासून कांदळवन कक्षाचे अधिकारी संरक्षित कांदळवन क्षेत्राची पाहणी करत होते . शुक्रवार ४ जून रोजी मंडळ अधिकारी प्रशांत कापडे यांनी ठाणे कांदळवन कक्षाचे वनपाल सचिन मोरे यांना सरकारी जमिनीवरील सदर कांदळवन क्षेत्राचा ताबा पावती दिली . 

तब्बल १५ वर्षा नंतर आता कुठे शहरातील कांदळवन ला राखीव वन संरक्षणाचे कवच लाभले आहे .  आता कांदळवन क्षेत्रात घुसखोरी करणाऱ्यांना वन कायद्याच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे . त्यामुळे नोट आणि वोट साठी कांदळवनचा ऱ्हास करण्यात सहभागी असलेल्या माफिया व दलालांसह काही नगरसेवक , अधिकारी यांच्या वर सुद्धा वन कायद्याने कारवाई केली जावी अशी मागणी वनशक्तीचे संचालक स्टॅलिन दयानंद यांनी केली आहे . 

शहरातील सरकारी जागा आणि त्यावरील कांदळवन आता अधिक सुरक्षित होईल आणि त्यात झालेली बेकायदा बांधकामे , भराव आदी पाडून टाकून निसर्गाचे संरक्षण प्रभावीपणे केले जाईल अशी अपेक्षा शहरात पर्यावरणासाठी कार्यरत कृष्णा गुप्ता , रुपाली श्रीवास्तव , इरबा कोनापुरे, राजू गोयल आदींनी व्यक्त केली आहे

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर