शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवार नाद करायचा नाही"; मुलाच्या इशाऱ्यानंतर राजन पाटील म्हणाले, "त्याला पार्थ सारखं..."
2
Pune Crime: रात्री दीड वाजेची वेळ, हातात कोयते; पुण्यातील रेस्टॉरंटमध्ये गुंडांचा हैदोस, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
3
सरकारच्या 'या' स्कीममध्ये मिळवा विना गॅरेंटी व्यवसाय सुरू करण्यासाठी लोन; केवळ एका डॉक्युमेंटची लागेल गरज
4
आरक्षण मर्यादेचं उल्लंघन, राज्यातील निवडणुकांचं काय होणार? आता २५ नोव्हेंबरला पुढील सुनावणी, सुप्रिम कोर्टात आज काय घडलं
5
दुसऱ्या मुलीशी लग्न करत होता बॉयफ्रेंड, अचानक भर लग्नात धडकली गर्लफ्रेंड; मंडपात तमाशा सुरू होताच...
6
निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचा प्रयत्न; देशातील 272 प्रतिष्ठित व्यक्तींचा पत्रातून काँग्रेसवर निशाणा
7
SIP सुरू करण्यापूर्वी वाचा! इंडेक्स फंडात 'कमी खर्च' तर Active फंडात 'जास्त रिटर्न'ची संधी; कोणता निवडावा?
8
“काँग्रेस-वंचित पक्षाची आघाडी व्हावी ही स्थानिक कार्यकर्त्यांची भावना”; नेते म्हणाले...
9
'अजित पवार आणि सुनेत्राआत्या ज्याप्रमाणे माझे नातेवाईक...", राणा जगजितसिंह यांचं सुप्रिया सुळेंना पत्र; नेमकं प्रकरण काय?
10
"पंतप्रधान मोदींमुळे माझ्या आईचा जीव वाचला..."; शेख हसीना यांचा मुलगा सजीब यांचे विधान
11
Parasocial: केंब्रिज डिक्शनरीचा मोठा निर्णय! २०२५ चा 'वर्ड ऑफ द इयर' ठरला 'पॅरासोशल'
12
११ युवकांचं ब्रेनवॉश करण्यासाठी... ; दिल्ली स्फोटातील दहशतवादी डॉ. उमरबाबत आणखी धक्कादायक माहिती उघड
13
राज ठाकरेंमुळे काँग्रेस आणि ठाकरे गटात दुरावा?, वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘त्यांना सोबत घेण्यापूर्वी…’  
14
Delhi Blast: ‘बूट सुसाइड बॉम्बर’च्या तंत्रामुळे गुप्तचर-तपास यंत्रणा झाली सतर्क!
15
‘श्री स्वामी समर्थ अथर्वशीर्ष’ दररोज म्हणता का? कालातीत लाभ होतात, स्वामी कायम कृपा करतात!
16
Shubman Gill Medical Update : गिल टीम इंडियासोबत गुवाहटीला जाणार का? BCCI नं माहिती दिली, पण अर्धवट
17
"...मग हा ग्रुप आला कुठून, या अपयशाला जबाबदार कोण?" ; ओवेसींनी अमित शाहांना करून जुनी दाव्याची आठवण
18
५४ तास विपरीत महालक्ष्मी राजयोग: ५ राशींना ४ पट लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; अकल्पनीय फायदा!
19
जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांना वगळले! अंबादास दानवे म्हणाले, '९९% भागीदारी असताना चौकशी अहवालात नाव कसं नाही?'
20
वेदनादायी! ऑस्ट्रेलियात BMW ची भारतीय महिलेला धडक, जागीच मृत्यू; होती ८ महिन्यांची गर्भवती
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भाईंदरमधील १ हजार ३६ हेक्टर सरकारी जागेतील कांदळवन अखेर वन विभागाच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 22:05 IST

वन कायदा लागू झाल्याने माफिया - दलालांचे धाबे दणाणले 

मीरारोड - २००५ साली मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची तब्बल १५ वर्षांनी अमलबजावणी होऊन मीरा भाईंदर मधील सरकारी जमिनीवरील १ हजार ३६ हेक्टर इतके कांदळवन क्षेत्र शुक्रवारी महसूल विभागाने वन विभागाच्या कांदळवन कक्षास हस्तांतरित केले . या मुळे कांदळवनला वन कायद्याचे सुरक्षा कवच लाभले असून कांदळवन नष्ट करून बेकायदा बांधकामे करणाऱ्या आणि त्यांना सोयी सुविधा पुरवणाऱ्या माफिया - दलालांचे धाबे दणाणले आहेत . 

२००५ साली मुंबई उच्च न्यायालयाने कांदळवन व त्या पासूनच्या ५० मीटर चा बफर झोन संरक्षित करून कांदळवन क्षेत्र हे वन म्हणून संरक्षित करायचे आदेश दिले होते . कांदळवन नष्ट करून झालेले बेकायदा भराव , बांधकामे काढून पूर्वीची नैसर्गिक स्थिती निर्माण करण्याचे आदेश त्यावेळी न्यायालयाने दिले होते .  

न्यायालयाच्या आदेशा नंतर २००५ साली नवघर भागात कांदळवन ऱ्हास केल्याने पहिला गुन्हा मीरा भाईंदर महापालिकेच्या अधिकारी आणि ठेकेदारांवर दाखल करण्यात आला होता . त्या नंतर आज तागायत मीरा भाईंदर महापालिकेसह अनेक विकासक ,  राजकारणी तसेच सरकारी जमिनी वर कांदळवन नष्ट करून बांधकामे करणाऱ्यांवर पर्यावरण संरक्षण कायद्या नुसार असंख्य गुन्हे शहरातील विविध पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत . परंतु दाखल गुन्ह्यांचा तपासा पासून न्यायालयात प्रभावी बाजू मांडण्यात सुद्धा आरोपीना पाठीशी घालण्याची भूमिका प्रशासनाची दिसून आली आहे . 

एकीकडे गुन्हे दाखल होत असताना दुसरीकडे कांदळवन नष्ट करून भराव - बांधकामे आदी प्रकार सुरूच होते . कांदळवन व खाडीपात्र परिसरात अनेक बेकायदा बांधकामे झाली असताना एकही बांधकाम तोडुन भराव काढुन पुर्वी सारखी नैसर्गिक स्थिती केल्याचे उदाहरण नाही.  शहरातील पुरस्थितीला हे मोठे कारण ठरले आहे . 

 सरकारी कांदळवन क्षेत्रात भराव करुन बेकायदा बांधकामे , जागा वा खोल्या विक्री आणि खरेदी केल्या गेल्या आहेत. यातुन करोडो रुपयांची उलाढाल झाली. बांधकाम होताच त्याला घरपट्टी, नळ जोडणी, शिधावाटप पत्रिका, मतदार यादीत नाव , फोटोपास व वीज जोडणी पासुनच्या सर्व काही सुविधा लोकप्रतिनिधी व प्रशासनासह संबंधित माफिया व दलालांनी पुरवल्या. परंतु एकाही माफिया, दलाल आणि वरदहस्त असलेल्या नगरसेवक आदींवर फौजदारी कारवाई केली गेली नाही. नोट आणि वोट हे सूत्रच निसर्गाच्या मुळावर उठले आहे . 

बेकायदेशीर भराव आणि बांधकामां सोबतच या वस्त्यांचे मलमुत्र, सांडपाणी व कचरा देखील कांदळवनात जातोय .  पालिकेचे नाले देखील प्रक्रिया न करताच सांडपाणी व कचरा वाहुन नेणारे प्रदुषणकारी मार्ग ठरलेत. जानेवारी २०२१ मध्ये सरकारी जमिनी वरील कांदळवन क्षेत्र हे अधिसूचना काढून राखीव वन म्हणून जाहीर करण्याची कार्यवाही सुरु झाली . मार्च मध्ये सात बारा सदरी राखीव वन म्हणून नोंदी करण्यात आल्या . 

२ जून पासून कांदळवन कक्षाचे अधिकारी संरक्षित कांदळवन क्षेत्राची पाहणी करत होते . शुक्रवार ४ जून रोजी मंडळ अधिकारी प्रशांत कापडे यांनी ठाणे कांदळवन कक्षाचे वनपाल सचिन मोरे यांना सरकारी जमिनीवरील सदर कांदळवन क्षेत्राचा ताबा पावती दिली . 

तब्बल १५ वर्षा नंतर आता कुठे शहरातील कांदळवन ला राखीव वन संरक्षणाचे कवच लाभले आहे .  आता कांदळवन क्षेत्रात घुसखोरी करणाऱ्यांना वन कायद्याच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे . त्यामुळे नोट आणि वोट साठी कांदळवनचा ऱ्हास करण्यात सहभागी असलेल्या माफिया व दलालांसह काही नगरसेवक , अधिकारी यांच्या वर सुद्धा वन कायद्याने कारवाई केली जावी अशी मागणी वनशक्तीचे संचालक स्टॅलिन दयानंद यांनी केली आहे . 

शहरातील सरकारी जागा आणि त्यावरील कांदळवन आता अधिक सुरक्षित होईल आणि त्यात झालेली बेकायदा बांधकामे , भराव आदी पाडून टाकून निसर्गाचे संरक्षण प्रभावीपणे केले जाईल अशी अपेक्षा शहरात पर्यावरणासाठी कार्यरत कृष्णा गुप्ता , रुपाली श्रीवास्तव , इरबा कोनापुरे, राजू गोयल आदींनी व्यक्त केली आहे

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर