शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भाईंदरमधील १ हजार ३६ हेक्टर सरकारी जागेतील कांदळवन अखेर वन विभागाच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 22:05 IST

वन कायदा लागू झाल्याने माफिया - दलालांचे धाबे दणाणले 

मीरारोड - २००५ साली मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची तब्बल १५ वर्षांनी अमलबजावणी होऊन मीरा भाईंदर मधील सरकारी जमिनीवरील १ हजार ३६ हेक्टर इतके कांदळवन क्षेत्र शुक्रवारी महसूल विभागाने वन विभागाच्या कांदळवन कक्षास हस्तांतरित केले . या मुळे कांदळवनला वन कायद्याचे सुरक्षा कवच लाभले असून कांदळवन नष्ट करून बेकायदा बांधकामे करणाऱ्या आणि त्यांना सोयी सुविधा पुरवणाऱ्या माफिया - दलालांचे धाबे दणाणले आहेत . 

२००५ साली मुंबई उच्च न्यायालयाने कांदळवन व त्या पासूनच्या ५० मीटर चा बफर झोन संरक्षित करून कांदळवन क्षेत्र हे वन म्हणून संरक्षित करायचे आदेश दिले होते . कांदळवन नष्ट करून झालेले बेकायदा भराव , बांधकामे काढून पूर्वीची नैसर्गिक स्थिती निर्माण करण्याचे आदेश त्यावेळी न्यायालयाने दिले होते .  

न्यायालयाच्या आदेशा नंतर २००५ साली नवघर भागात कांदळवन ऱ्हास केल्याने पहिला गुन्हा मीरा भाईंदर महापालिकेच्या अधिकारी आणि ठेकेदारांवर दाखल करण्यात आला होता . त्या नंतर आज तागायत मीरा भाईंदर महापालिकेसह अनेक विकासक ,  राजकारणी तसेच सरकारी जमिनी वर कांदळवन नष्ट करून बांधकामे करणाऱ्यांवर पर्यावरण संरक्षण कायद्या नुसार असंख्य गुन्हे शहरातील विविध पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत . परंतु दाखल गुन्ह्यांचा तपासा पासून न्यायालयात प्रभावी बाजू मांडण्यात सुद्धा आरोपीना पाठीशी घालण्याची भूमिका प्रशासनाची दिसून आली आहे . 

एकीकडे गुन्हे दाखल होत असताना दुसरीकडे कांदळवन नष्ट करून भराव - बांधकामे आदी प्रकार सुरूच होते . कांदळवन व खाडीपात्र परिसरात अनेक बेकायदा बांधकामे झाली असताना एकही बांधकाम तोडुन भराव काढुन पुर्वी सारखी नैसर्गिक स्थिती केल्याचे उदाहरण नाही.  शहरातील पुरस्थितीला हे मोठे कारण ठरले आहे . 

 सरकारी कांदळवन क्षेत्रात भराव करुन बेकायदा बांधकामे , जागा वा खोल्या विक्री आणि खरेदी केल्या गेल्या आहेत. यातुन करोडो रुपयांची उलाढाल झाली. बांधकाम होताच त्याला घरपट्टी, नळ जोडणी, शिधावाटप पत्रिका, मतदार यादीत नाव , फोटोपास व वीज जोडणी पासुनच्या सर्व काही सुविधा लोकप्रतिनिधी व प्रशासनासह संबंधित माफिया व दलालांनी पुरवल्या. परंतु एकाही माफिया, दलाल आणि वरदहस्त असलेल्या नगरसेवक आदींवर फौजदारी कारवाई केली गेली नाही. नोट आणि वोट हे सूत्रच निसर्गाच्या मुळावर उठले आहे . 

बेकायदेशीर भराव आणि बांधकामां सोबतच या वस्त्यांचे मलमुत्र, सांडपाणी व कचरा देखील कांदळवनात जातोय .  पालिकेचे नाले देखील प्रक्रिया न करताच सांडपाणी व कचरा वाहुन नेणारे प्रदुषणकारी मार्ग ठरलेत. जानेवारी २०२१ मध्ये सरकारी जमिनी वरील कांदळवन क्षेत्र हे अधिसूचना काढून राखीव वन म्हणून जाहीर करण्याची कार्यवाही सुरु झाली . मार्च मध्ये सात बारा सदरी राखीव वन म्हणून नोंदी करण्यात आल्या . 

२ जून पासून कांदळवन कक्षाचे अधिकारी संरक्षित कांदळवन क्षेत्राची पाहणी करत होते . शुक्रवार ४ जून रोजी मंडळ अधिकारी प्रशांत कापडे यांनी ठाणे कांदळवन कक्षाचे वनपाल सचिन मोरे यांना सरकारी जमिनीवरील सदर कांदळवन क्षेत्राचा ताबा पावती दिली . 

तब्बल १५ वर्षा नंतर आता कुठे शहरातील कांदळवन ला राखीव वन संरक्षणाचे कवच लाभले आहे .  आता कांदळवन क्षेत्रात घुसखोरी करणाऱ्यांना वन कायद्याच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे . त्यामुळे नोट आणि वोट साठी कांदळवनचा ऱ्हास करण्यात सहभागी असलेल्या माफिया व दलालांसह काही नगरसेवक , अधिकारी यांच्या वर सुद्धा वन कायद्याने कारवाई केली जावी अशी मागणी वनशक्तीचे संचालक स्टॅलिन दयानंद यांनी केली आहे . 

शहरातील सरकारी जागा आणि त्यावरील कांदळवन आता अधिक सुरक्षित होईल आणि त्यात झालेली बेकायदा बांधकामे , भराव आदी पाडून टाकून निसर्गाचे संरक्षण प्रभावीपणे केले जाईल अशी अपेक्षा शहरात पर्यावरणासाठी कार्यरत कृष्णा गुप्ता , रुपाली श्रीवास्तव , इरबा कोनापुरे, राजू गोयल आदींनी व्यक्त केली आहे

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर