शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! जसलोक, केईएमसह मुंबईतील ५० हून अधिक हॉस्पिटलना बॉम्बने उडविण्याची धमकी
2
पाणीपुरी खाल्ल्याने ८० पेक्षा अधिक जणांना विषबाधा;पिंप्री, चांदसणी, कमळगाव येथील रुग्णांवर उपचार सुरू
3
हरियाणात काँग्रेसला मोठा धक्का; आमदार, माजी खासदारांनी ४० वर्षांचे नाते संपविले, सदस्यत्वाचा राजीनामा
4
दिल्लीत फडणवीसांबाबत ठरले! महाराष्ट्रात नो चेंज; देवेंद्रना प्रश्न विचारताच गोयल मधेच बोलले...
5
टॅक्सी - रिक्षा चालकांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; कल्याणकारी मंडळ, विमा, मुलांना नोकरी...
6
उत्तर प्रदेशातील मतदारांनी भाजपला का नाकारले? आढावा घेण्यासाठी पक्षाने तयार केली 40 पथके
7
अन्नधान्याच्या वाढलेल्या किंमती महागाई रोखण्यात अडथळा; RBI गव्हर्नरांचे महत्वाचे वक्तव्य
8
अभिषेक बच्चनला बंपर लॉटरी लागली; खटाखट खटाखट १५ कोटींचे सहा आलिशान फ्लॅट खरेदी केले
9
मोठी बातमी! पंढरपूर- कराड रोडवर भीषण अपघात; सहा महिला जागीच ठार, एक गंभीर
10
उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली; आक्रमक ओबीसी आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्ग रोखला
11
Reliance Jio : जिओचे नेटवर्क बंद!; इंटरनेटपासून फायबरपर्यंत सर्वच बंद झाल्याने युजर्सचा संताप
12
शेतकऱ्यांनो खात्यात खटाखट खटाखट २००० रुपये आले का? मोदींनी एक बटन दाबले, २० हजार कोटी वळते केले
13
सन्मान निधीनंतर आता कोट्यवधी शेतकऱ्यांना NDA सरकार देणार आणखी एक गिफ्ट?
14
'अ‍ॅनिमल पार्क'संदर्भात रणबीर कपूरच्या सहकलाकाराने दिली मोठी अपडेट, म्हणाला- "सिनेमाची कथा..."
15
पुढच्यावेळी रॉबर्ट वाड्रा संसदेत दिसणार?; प्रियंका गांधी वायनाडला जाताच पतीची घोषणा
16
लोकसभा अध्यक्षाची निवड कशी केली जाते? कोणते अधिकार मिळतात? जाणून घ्या...
17
सरकारचा एक निर्णय अन् लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला; RTE प्रवेश पुन्हा रखडले
18
वयाच्या चाळीशीतही अभिनेत्रीच्या हॉटनेसची चर्चा; साऊथ नंतर आता बॉलिवूडमध्येही बोलबाला
19
मुंबई, पाटणा, जयपूर, कोलकाता...देशभरातील 40 विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी
20
वर्षा गायकवाडांचा आमदारकीचा राजीनामा; काँग्रेस- शिवसेनेचे आणखी काही आमदार राजीनामा देणार

पूरग्रस्तांची पुन्हा आवराआवर; शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2019 12:18 AM

पुराचा दोनवेळा फटका, नागरिक अजूनही भीतीच्या छायेत

बदलापूर : २६ आणि २७ जुलै रोजी आलेल्या महापुराने शेकडो कुटुंबे बाधित झाली. पूर ओसरल्यावर त्यांनी आपल्या घरांची आणि सामानांची आवराआवर सुरू केली. यातून सावरून आठवडाही उलटत नाही, तोच रविवारी बदलापूरला पुन्हा पुराचा जोरदार फटका बसला. जी कुटुंबे आधीच उद्ध्वस्त झाली होती, त्यांना पुन्हा एकदा फटका बसल्याने आता त्यांचा धीर खचला आहे. तरीसुद्धा दु:ख बाजूला सारून पूरग्रस्त कुटुंबांनी पुन्हा आपल्या संसाराची आवराआवर सुरू केली आहे.२६ आणि २७ जुलैच्या पुराचा फटका सहन केल्यावर त्याच कुटुंबांवर ४ आॅगस्टच्या पुराचा फटका सहन करण्याची वेळ पुन्हा आली आहे. रविवारी पहाटेपासून पुराची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पूरग्रस्त सावध झाले होते. मात्र, पुन्हा घरात पाणी भरेल, असे वाटले नव्हते. मात्र, उल्हास नदीने पुन्हा आपले रौद्ररूप दाखवत पूरग्रस्तांची धास्ती वाढवली आहे. रविवारी बसलेल्या पुराच्या तडाख्यानंतर पुन्हा एकदा घर आवरण्यात ही कुटुंबे व्यस्त झाली होती. पहिल्या पुरात बाधित झाल्यानंतर नागरिकांना आलेल्या मदतीचे साहित्यदेखील रविवारच्या पुरात वाहून गेले. हेंदे्रपाडा, यादवनगर भागातील नागरिकांना दोन दिवस आधीच जे जीवनावश्यक साहित्य मिळाले होते, ते साहित्यही रविवारच्या पुरात भिजले. त्यामुळे अन्नधान्याची गरज नव्याने निर्माण झाली आहे. आधीच भिजलेले दुकानातील सामान फेकले असताना, या दुकानदारांनाही दुसऱ्यांदा पुराचा फटका सहन करावा लागला. सोमवारी दिवसभर पूरग्रस्तांची आवराआवर सुरू होती. पूर ओसरत आला असला तरी, अजूनही बदलापूरचा धोका कमी झालेला नाही.पूर ओसरला; पंचनामे सुरूभिवंडी : भिवंडी शहरासह ग्रामीण भागात तीन दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने या पावसामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे अनेक नागरिकांच्या घरात, दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. या पूरग्रस्त बाधित नागरिकांच्या मालमत्तेचा महापालिका प्रशासन आणि ग्रामीण भागात तहसीदारांच्या आदेशानुसार मंडळ अधिकारी, तलाठी यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सोमवारपासून हाती घेतले आहे. घरे, जनावरे वाहून गेली असतील अथवा मनुष्यहानी झालेल्या नागरिकांच्या पंचनाम्यांना प्राधान्य दिले जात आहे. नुकसानीचा आकडा निश्चित होण्यासाठी किमान चार दिवस लागणार आहेत. त्यानंतर, अहवालानुसार शासकीय मदत पूरग्रस्तांना दिली जाईल, अशी माहिती तहसीलदार शशिकांत गायकवाड यांनी दिली.तीनबत्ती चौक, ईदगाह रोड, बाजारपेठ, शिवाजी चौक, शिवाजीनगर, नवीचाळ, म्हाडा कॉलनी, बंदर मोहल्ला, अंबिकानगर, पद्मानगर या भागात पाणी साचल्याने अनेक नागरिकांची दुकाने व घरांमध्ये पाणी शिरल्याने घरगुती सामानासह मालाचे मोठे नुकसान झाले आहे, तर भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांच्या अन्नधान्यासह कपडे, भांडी व किमती वस्तूंचे नुकसान झाले आहे. त्यामुळे तहसीलदार शशिकांत गायकवाड यांनी नुकसान झालेल्या लोकांच्या मालमत्तेचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना दिल्याने सकाळपासून महसूल यंत्रणा कामाला लागली आहे.

टॅग्स :floodपूर