शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मानव-निर्मित जंगलांचे नुकसान करणाऱ्यांना पाच वर्षांपर्यंत कारावास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 11:13 IST

झाडांचे संगोपन व्हावे, त्यांना नुकसान पोहोचवणाऱ्या समाजकंटकांना शिक्षा व्हावी, अशी कुठलीही तरतूद सध्याच्या कायद्यांमध्ये नसल्यामुळे मानव-निर्मित जंगलांनाही सध्याच्या कायद्यांच्या कक्षेत आणणारे खासगी विधेयक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी लोकसभेत मांडले.

ठळक मुद्देभारतात प्रदूषणाच्या प्रश्नाने गंभीर रूप धारण केले आहे. जगातील २० सर्वोच्च प्रदूषित शहरांपैकी १४ शहरे भारतात आहेत. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात अंबरनाथ तालुक्यातील मांगरुळ या गावी वन विभागाच्या जागेवर मानव-निर्मित जंगल तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला.भारतीय वन कायदा १९८० मधील कलम ६ मध्ये वन जमिनीच्या व्याख्येत मानव-निर्मित जंगल याचाही समावेश या विधेयकाद्वारे करण्यात आला आहे.

ठाणे - प्रदूषणाचे प्रमाण वाढत असल्यामुळे सरकारी पातळीवरून वृक्षारोपणाचे मोठमोठे कार्यक्रम होत आहेत. पण या झाडांचे संगोपन व्हावे, त्यांना नुकसान पोहोचवणाऱ्या समाजकंटकांना शिक्षा व्हावी, अशी कुठलीही तरतूद सध्याच्या कायद्यांमध्ये नसल्यामुळे मानव-निर्मित जंगलांनाही सध्याच्या कायद्यांच्या कक्षेत आणणारे खासगी विधेयक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी लोकसभेत मांडले. 

भारतात प्रदूषणाच्या प्रश्नाने गंभीर रूप धारण केले आहे. जगातील २० सर्वोच्च प्रदूषित शहरांपैकी १४ शहरे भारतात आहेत. देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्रफळाच्या ३३ टक्के क्षेत्रफळ जंगलव्याप्त करण्याचे बंधन भारताने जागतिक करारान्वये स्वतःवर घालून घेतले आहे. मात्र, इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट २०१७ या अहवालानुसार २०१५ ते २०१७ या कालावधीत भारतातील जंगलक्षेत्राची अवघे ०.२१ टक्का वाढ झाली आहे. एकीकडे वृक्षारोपणाचे मोठमोठे कार्यक्रम होतात. सरकार देखील अशा मोहिमांवर करोडो रुपये खर्च करते. मात्र, अशा उपक्रमांच्या माध्यमातून लावल्या जाणाऱ्या झाडांचे संगोपन आणि त्यांचे संरक्षण यासाठी विद्यमान कायद्यांमध्ये तरतूदच नाही.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात अंबरनाथ तालुक्यातील मांगरुळ या गावी वन विभागाच्या जागेवर मानव-निर्मित जंगल तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. ६ जुलै २०१७ रोजी तब्बल २० हजारहून अधिक लोकांच्या सहभागातून अवघ्या काही तासांत एक लाख झाडे लावण्यात आली होती. त्यांच्या संगोपनासाठी बोअरवेल, पाण्याची टाकी, पाइपलाइन आदी व्यवस्थाही खा. डॉ. शिंदे यांनी केली होती. मात्र, समाजकंटकांनी सलग दोन वर्षे या झाडांना आगी लावून या प्रयत्नांना हरताळ फासण्याचे काम केले होते.

असे प्रकार देशभरात अनेक ठिकाणी होतात. जाणीवपूर्वक वणवे लावून जंगले नष्ट केली जातात. त्यामुळे मानव-निर्मित जंगलांनाही कायद्याचा आधार असला पाहिजे, या जंगलांना घातपाताद्वारे हानी पोहोचवणाऱ्या समाजकंटकांना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि विविध प्रकल्पांसाठी वनविभागाची जागा देत असताना मानव-निर्मित जंगलांची जागाही केंद्र सरकारच्या परवानगीविना कुठल्याही राज्य सरकारला देता येणार नाही, अशा तरतुदी असलेले खासगी विधेयक खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी लोकसभेत मांडले. या अन्वये अशा मानव-निर्मित जंगलांची हानी करणाऱ्या समाजकंटकांना सहा महिने ते पाच वर्षे सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये ते पाच लाख रुपये आर्थिक दंडाची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, भारतीय वन कायदा १९८० मधील कलम ६ मध्ये वन जमिनीच्या व्याख्येत मानव-निर्मित जंगल याचाही समावेश या विधेयकाद्वारे करण्यात आला आहे. तर, कलम २ (iv) नुसार विविध प्रकल्पांसाठी वनजमीन देत असताना नैसर्गिक जंगलांबरोबरच मानव-निर्मित जंगलांसाठीही केंद्र सरकारची परवानगी अनिवार्य करण्यात आली आहे.

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेthaneठाणेpollutionप्रदूषण