शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मानव-निर्मित जंगलांचे नुकसान करणाऱ्यांना पाच वर्षांपर्यंत कारावास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 11:13 IST

झाडांचे संगोपन व्हावे, त्यांना नुकसान पोहोचवणाऱ्या समाजकंटकांना शिक्षा व्हावी, अशी कुठलीही तरतूद सध्याच्या कायद्यांमध्ये नसल्यामुळे मानव-निर्मित जंगलांनाही सध्याच्या कायद्यांच्या कक्षेत आणणारे खासगी विधेयक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी लोकसभेत मांडले.

ठळक मुद्देभारतात प्रदूषणाच्या प्रश्नाने गंभीर रूप धारण केले आहे. जगातील २० सर्वोच्च प्रदूषित शहरांपैकी १४ शहरे भारतात आहेत. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात अंबरनाथ तालुक्यातील मांगरुळ या गावी वन विभागाच्या जागेवर मानव-निर्मित जंगल तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला.भारतीय वन कायदा १९८० मधील कलम ६ मध्ये वन जमिनीच्या व्याख्येत मानव-निर्मित जंगल याचाही समावेश या विधेयकाद्वारे करण्यात आला आहे.

ठाणे - प्रदूषणाचे प्रमाण वाढत असल्यामुळे सरकारी पातळीवरून वृक्षारोपणाचे मोठमोठे कार्यक्रम होत आहेत. पण या झाडांचे संगोपन व्हावे, त्यांना नुकसान पोहोचवणाऱ्या समाजकंटकांना शिक्षा व्हावी, अशी कुठलीही तरतूद सध्याच्या कायद्यांमध्ये नसल्यामुळे मानव-निर्मित जंगलांनाही सध्याच्या कायद्यांच्या कक्षेत आणणारे खासगी विधेयक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी लोकसभेत मांडले. 

भारतात प्रदूषणाच्या प्रश्नाने गंभीर रूप धारण केले आहे. जगातील २० सर्वोच्च प्रदूषित शहरांपैकी १४ शहरे भारतात आहेत. देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्रफळाच्या ३३ टक्के क्षेत्रफळ जंगलव्याप्त करण्याचे बंधन भारताने जागतिक करारान्वये स्वतःवर घालून घेतले आहे. मात्र, इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट २०१७ या अहवालानुसार २०१५ ते २०१७ या कालावधीत भारतातील जंगलक्षेत्राची अवघे ०.२१ टक्का वाढ झाली आहे. एकीकडे वृक्षारोपणाचे मोठमोठे कार्यक्रम होतात. सरकार देखील अशा मोहिमांवर करोडो रुपये खर्च करते. मात्र, अशा उपक्रमांच्या माध्यमातून लावल्या जाणाऱ्या झाडांचे संगोपन आणि त्यांचे संरक्षण यासाठी विद्यमान कायद्यांमध्ये तरतूदच नाही.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात अंबरनाथ तालुक्यातील मांगरुळ या गावी वन विभागाच्या जागेवर मानव-निर्मित जंगल तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. ६ जुलै २०१७ रोजी तब्बल २० हजारहून अधिक लोकांच्या सहभागातून अवघ्या काही तासांत एक लाख झाडे लावण्यात आली होती. त्यांच्या संगोपनासाठी बोअरवेल, पाण्याची टाकी, पाइपलाइन आदी व्यवस्थाही खा. डॉ. शिंदे यांनी केली होती. मात्र, समाजकंटकांनी सलग दोन वर्षे या झाडांना आगी लावून या प्रयत्नांना हरताळ फासण्याचे काम केले होते.

असे प्रकार देशभरात अनेक ठिकाणी होतात. जाणीवपूर्वक वणवे लावून जंगले नष्ट केली जातात. त्यामुळे मानव-निर्मित जंगलांनाही कायद्याचा आधार असला पाहिजे, या जंगलांना घातपाताद्वारे हानी पोहोचवणाऱ्या समाजकंटकांना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि विविध प्रकल्पांसाठी वनविभागाची जागा देत असताना मानव-निर्मित जंगलांची जागाही केंद्र सरकारच्या परवानगीविना कुठल्याही राज्य सरकारला देता येणार नाही, अशा तरतुदी असलेले खासगी विधेयक खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी लोकसभेत मांडले. या अन्वये अशा मानव-निर्मित जंगलांची हानी करणाऱ्या समाजकंटकांना सहा महिने ते पाच वर्षे सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये ते पाच लाख रुपये आर्थिक दंडाची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, भारतीय वन कायदा १९८० मधील कलम ६ मध्ये वन जमिनीच्या व्याख्येत मानव-निर्मित जंगल याचाही समावेश या विधेयकाद्वारे करण्यात आला आहे. तर, कलम २ (iv) नुसार विविध प्रकल्पांसाठी वनजमीन देत असताना नैसर्गिक जंगलांबरोबरच मानव-निर्मित जंगलांसाठीही केंद्र सरकारची परवानगी अनिवार्य करण्यात आली आहे.

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेthaneठाणेpollutionप्रदूषण