शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

वरप आगप्रकरणी पाच जणांना अटक, मांगरूळ आग समाजकंटकांनी पेटवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2018 15:37 IST

कल्याणजवळ वरप येथे मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण केलेल्या रोपवनात तसेच खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने अंबरनाथजवळील मांगरूळ येथील रोपवनास लागलेल्या आगीची गंभीर दाखल वन विभागाने घेतली आहे.

ठळक मुद्देवरप प्रकरणी पाच आरोपींना अटक करून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.मांगरूळ प्रकरणी उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.मांगरूळ येथील आगीत ७ हेक्टर क्षेत्रातील १२ हजार ६३३ रोपांना आगीची झळ बसली आहे.

ठाणे - कल्याणजवळ वरप येथे मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण केलेल्या रोपवनात तसेच खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने अंबरनाथजवळील मांगरूळ येथील रोपवनास लागलेल्या आगीची गंभीर दाखल वन विभागाने घेतली आहे. वरप प्रकरणी पाच आरोपींना अटक करून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. मांगरूळ प्रकरणी उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हे कृत्य करणाऱ्या समाजकंटकांचा तपास सुरू असल्याची माहिती उपवनसंरक्षक डॉ जितेंद्र रामगावकर यांनी दिली. दोन्ही घटनांमध्ये आगीची झळ पोहचलेल्या रोपांना जिवंत ठेवण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.

वरप येथे रोपवनालगत मौजे कांबा येथील तुकाराम आडे, रामू राठोड, अनिल आडे, शुभम आडे, प्रकाश राठोड या व्यक्तींनी शेणाच्या गोवऱ्या थापण्यासाठी जागा साफ केलेली आढळून आली,  तेथूनच आग पसरल्याचे तपास केला असता आढळले. महाराष्ट्र वन नियमावली व वन अधिनियमाप्रमाणे त्यांच्यावर गुन्हे दाखल करून प्रथम वर्ग न्यायालयामार्फत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी घेण्यात आली आहे. वरप येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत १८.७ हेक्टर क्षेत्रावर ९ हजार रोपांची लागवड करण्यात आली होती. त्यापैकी ३ हेक्टर क्षेत्र जाळले असून १ हजार रोपांना आगीची झळ पोहचली आहे.

मांगरूळ येथील आगीत ७ हेक्टर क्षेत्रातील १२ हजार ६३३ रोपांना आगीची झळ बसली आहे. याच ठिकाणी डिसेंबर २०१७ मध्ये लागलेल्या आगीत ८ हेक्टर क्षेत्रातील गावात व पालापाचोळा जाळून २० हजार रोपांना झळ बसली होती. त्यानंतर वन विभागाने याठिकाणच्या रोपांना अति तातडीने पाणी देण्यासाठी बोअरवेल घेणे, मोटार वासाविणे, वीज पुरवठा करणे  यासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ६ लाख ७२ हजार ५०० रुपये खर्च केला होता. या रोपवनात मे २०१८ पर्यंत जिवंत रोपांची टक्केवारी ८२ टक्के होती. या रोपवनाच्या रखवालीसाठी २ रखवालदारही नेमले आहेत. याठिकाणी गावात कापणे, जाळ रेषा घेण्याचे काम बदलापूर वन क्षेत्रपाल यांनी सुरु केले होते. पावसाळ्यानंतर दाट वाढलेले गवत काढण्याचे, निंदनी व बेणणी करण्याचे नियोजनही  केल होते. याकामासाठी दिवाळीमुळे स्थानिक मजूर न मिळाल्याने बाहेरून मजूर आणून कामे सुरू केली होती, मात्र या ठिकाणी काही समाजकंटकांनी परत आग लावली. या वनातील मृत होणाऱ्या झाडांना वाचविण्यासाठी पाईपलाईनने पाणी देण्यात येत आहे तसेच दाट वाढलेले गावात काढण्याचे काम परत सुरू केले आहे. ज्या क्षेत्रात आग लागली नाही तिथे ९१ टक्के रोपं जिवंत असून हे पालकमंत्री आणि खासदार यांच्या पुढाकाराने व मेहनतीने लावलेले रोपवनदेखील वाचविण्याचे आटोकाट प्रयत्न करण्यात येत आहे असेही डॉ रामगावकर यांनी सांगितले.

टॅग्स :fireआगambernathअंबरनाथShrikant Shindeश्रीकांत शिंदेArrestअटकPoliceपोलिस