शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

वरप आगप्रकरणी पाच जणांना अटक, मांगरूळ आग समाजकंटकांनी पेटवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2018 15:37 IST

कल्याणजवळ वरप येथे मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण केलेल्या रोपवनात तसेच खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने अंबरनाथजवळील मांगरूळ येथील रोपवनास लागलेल्या आगीची गंभीर दाखल वन विभागाने घेतली आहे.

ठळक मुद्देवरप प्रकरणी पाच आरोपींना अटक करून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.मांगरूळ प्रकरणी उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.मांगरूळ येथील आगीत ७ हेक्टर क्षेत्रातील १२ हजार ६३३ रोपांना आगीची झळ बसली आहे.

ठाणे - कल्याणजवळ वरप येथे मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण केलेल्या रोपवनात तसेच खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने अंबरनाथजवळील मांगरूळ येथील रोपवनास लागलेल्या आगीची गंभीर दाखल वन विभागाने घेतली आहे. वरप प्रकरणी पाच आरोपींना अटक करून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. मांगरूळ प्रकरणी उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हे कृत्य करणाऱ्या समाजकंटकांचा तपास सुरू असल्याची माहिती उपवनसंरक्षक डॉ जितेंद्र रामगावकर यांनी दिली. दोन्ही घटनांमध्ये आगीची झळ पोहचलेल्या रोपांना जिवंत ठेवण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.

वरप येथे रोपवनालगत मौजे कांबा येथील तुकाराम आडे, रामू राठोड, अनिल आडे, शुभम आडे, प्रकाश राठोड या व्यक्तींनी शेणाच्या गोवऱ्या थापण्यासाठी जागा साफ केलेली आढळून आली,  तेथूनच आग पसरल्याचे तपास केला असता आढळले. महाराष्ट्र वन नियमावली व वन अधिनियमाप्रमाणे त्यांच्यावर गुन्हे दाखल करून प्रथम वर्ग न्यायालयामार्फत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी घेण्यात आली आहे. वरप येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत १८.७ हेक्टर क्षेत्रावर ९ हजार रोपांची लागवड करण्यात आली होती. त्यापैकी ३ हेक्टर क्षेत्र जाळले असून १ हजार रोपांना आगीची झळ पोहचली आहे.

मांगरूळ येथील आगीत ७ हेक्टर क्षेत्रातील १२ हजार ६३३ रोपांना आगीची झळ बसली आहे. याच ठिकाणी डिसेंबर २०१७ मध्ये लागलेल्या आगीत ८ हेक्टर क्षेत्रातील गावात व पालापाचोळा जाळून २० हजार रोपांना झळ बसली होती. त्यानंतर वन विभागाने याठिकाणच्या रोपांना अति तातडीने पाणी देण्यासाठी बोअरवेल घेणे, मोटार वासाविणे, वीज पुरवठा करणे  यासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ६ लाख ७२ हजार ५०० रुपये खर्च केला होता. या रोपवनात मे २०१८ पर्यंत जिवंत रोपांची टक्केवारी ८२ टक्के होती. या रोपवनाच्या रखवालीसाठी २ रखवालदारही नेमले आहेत. याठिकाणी गावात कापणे, जाळ रेषा घेण्याचे काम बदलापूर वन क्षेत्रपाल यांनी सुरु केले होते. पावसाळ्यानंतर दाट वाढलेले गवत काढण्याचे, निंदनी व बेणणी करण्याचे नियोजनही  केल होते. याकामासाठी दिवाळीमुळे स्थानिक मजूर न मिळाल्याने बाहेरून मजूर आणून कामे सुरू केली होती, मात्र या ठिकाणी काही समाजकंटकांनी परत आग लावली. या वनातील मृत होणाऱ्या झाडांना वाचविण्यासाठी पाईपलाईनने पाणी देण्यात येत आहे तसेच दाट वाढलेले गावात काढण्याचे काम परत सुरू केले आहे. ज्या क्षेत्रात आग लागली नाही तिथे ९१ टक्के रोपं जिवंत असून हे पालकमंत्री आणि खासदार यांच्या पुढाकाराने व मेहनतीने लावलेले रोपवनदेखील वाचविण्याचे आटोकाट प्रयत्न करण्यात येत आहे असेही डॉ रामगावकर यांनी सांगितले.

टॅग्स :fireआगambernathअंबरनाथShrikant Shindeश्रीकांत शिंदेArrestअटकPoliceपोलिस