शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

वरप आगप्रकरणी पाच जणांना अटक, मांगरूळ आग समाजकंटकांनी पेटवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2018 15:37 IST

कल्याणजवळ वरप येथे मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण केलेल्या रोपवनात तसेच खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने अंबरनाथजवळील मांगरूळ येथील रोपवनास लागलेल्या आगीची गंभीर दाखल वन विभागाने घेतली आहे.

ठळक मुद्देवरप प्रकरणी पाच आरोपींना अटक करून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.मांगरूळ प्रकरणी उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.मांगरूळ येथील आगीत ७ हेक्टर क्षेत्रातील १२ हजार ६३३ रोपांना आगीची झळ बसली आहे.

ठाणे - कल्याणजवळ वरप येथे मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण केलेल्या रोपवनात तसेच खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने अंबरनाथजवळील मांगरूळ येथील रोपवनास लागलेल्या आगीची गंभीर दाखल वन विभागाने घेतली आहे. वरप प्रकरणी पाच आरोपींना अटक करून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. मांगरूळ प्रकरणी उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हे कृत्य करणाऱ्या समाजकंटकांचा तपास सुरू असल्याची माहिती उपवनसंरक्षक डॉ जितेंद्र रामगावकर यांनी दिली. दोन्ही घटनांमध्ये आगीची झळ पोहचलेल्या रोपांना जिवंत ठेवण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.

वरप येथे रोपवनालगत मौजे कांबा येथील तुकाराम आडे, रामू राठोड, अनिल आडे, शुभम आडे, प्रकाश राठोड या व्यक्तींनी शेणाच्या गोवऱ्या थापण्यासाठी जागा साफ केलेली आढळून आली,  तेथूनच आग पसरल्याचे तपास केला असता आढळले. महाराष्ट्र वन नियमावली व वन अधिनियमाप्रमाणे त्यांच्यावर गुन्हे दाखल करून प्रथम वर्ग न्यायालयामार्फत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी घेण्यात आली आहे. वरप येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत १८.७ हेक्टर क्षेत्रावर ९ हजार रोपांची लागवड करण्यात आली होती. त्यापैकी ३ हेक्टर क्षेत्र जाळले असून १ हजार रोपांना आगीची झळ पोहचली आहे.

मांगरूळ येथील आगीत ७ हेक्टर क्षेत्रातील १२ हजार ६३३ रोपांना आगीची झळ बसली आहे. याच ठिकाणी डिसेंबर २०१७ मध्ये लागलेल्या आगीत ८ हेक्टर क्षेत्रातील गावात व पालापाचोळा जाळून २० हजार रोपांना झळ बसली होती. त्यानंतर वन विभागाने याठिकाणच्या रोपांना अति तातडीने पाणी देण्यासाठी बोअरवेल घेणे, मोटार वासाविणे, वीज पुरवठा करणे  यासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ६ लाख ७२ हजार ५०० रुपये खर्च केला होता. या रोपवनात मे २०१८ पर्यंत जिवंत रोपांची टक्केवारी ८२ टक्के होती. या रोपवनाच्या रखवालीसाठी २ रखवालदारही नेमले आहेत. याठिकाणी गावात कापणे, जाळ रेषा घेण्याचे काम बदलापूर वन क्षेत्रपाल यांनी सुरु केले होते. पावसाळ्यानंतर दाट वाढलेले गवत काढण्याचे, निंदनी व बेणणी करण्याचे नियोजनही  केल होते. याकामासाठी दिवाळीमुळे स्थानिक मजूर न मिळाल्याने बाहेरून मजूर आणून कामे सुरू केली होती, मात्र या ठिकाणी काही समाजकंटकांनी परत आग लावली. या वनातील मृत होणाऱ्या झाडांना वाचविण्यासाठी पाईपलाईनने पाणी देण्यात येत आहे तसेच दाट वाढलेले गावात काढण्याचे काम परत सुरू केले आहे. ज्या क्षेत्रात आग लागली नाही तिथे ९१ टक्के रोपं जिवंत असून हे पालकमंत्री आणि खासदार यांच्या पुढाकाराने व मेहनतीने लावलेले रोपवनदेखील वाचविण्याचे आटोकाट प्रयत्न करण्यात येत आहे असेही डॉ रामगावकर यांनी सांगितले.

टॅग्स :fireआगambernathअंबरनाथShrikant Shindeश्रीकांत शिंदेArrestअटकPoliceपोलिस