शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
5
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
6
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
7
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
8
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
9
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
10
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
11
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
12
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
13
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
14
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
15
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
16
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
17
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
18
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
19
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
20
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"

पाणी दरवाढीचा ठामपावर वार्षिक पाच कोटींचा भुर्दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 00:15 IST

५0 टक्के दरवाढ; मुंबई महापालिकेकडून अद्याप पत्रव्यवहार नाही

- अजित मांडके ठाणे : एकीकडे ठाणे महापालिकेने प्रती चौरस फुटाप्रमाणे पाणी बिलांची वसुली सुरु केली असून, येत्या काही महिन्यांत नळांना मीटरही लावले जाणार आहेत. त्यामुळे ठाणेकरांना अतिरिक्त भूर्दंड सोसावा लागण्याची शक्यता आहे. त्यात ठाण्याच्या भरवशावर तहान भागवणाऱ्या मुंबई महापालिकेने आता ठाण्यालाच केल्या जाणाºया पाणी पुरवठ्याच्या दरात ५० टक्के वाढ सुचविली आहे. यासंदर्भातील पत्र अद्याप ठाणे महापालिकेला प्राप्त झालेले नाही. परंतु या दरवाढीतून मुंबई महापालिकेला वार्षिक नफा वाढून मिळणार असला तरी ठाणेकरांना वार्षिक ५ कोटी ११ लाखांचा वाढीव बोजा सहन करावा लागणार आहे.मुंबई महापालिकेने १५ वर्षानंतर ही दरवाढ प्रस्तावित केली आहे. त्यानुसार सध्याच्या पाणी दरात ५० टक्के वाढ सुचविली आहे. ठाणे महापालिका सध्या विविध स्त्रोतांकडून ४८५ दशलक्ष लीटर पाणी उचलत आहे. त्यानुसार स्टेमकडून प्रती हजार लीटरमागे ९.५० रुपये, एमआयडीसीकडून प्रती हजार लीटरमागे ९.०० रुपये, तर स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेतून ४ रुपये दराने पाणी उचलत आहे. मुंबई महापालिकेकडून ठाणे शहराला ३० दशलक्ष लीटर कच्चे (प्रक्रिया न केलेले) पाणी आणि ३५ दशलक्ष लीटर पक्के (प्रक्रिया केलेले) पाणी पुरविले जात आहे. त्यानुसार ही वाढ पक्या पाण्यावर करण्याचे निश्चित केल्याची माहिती महापालिकेतील सुत्रांनी दिली. मुंबई महापालिकेडून होणाºया कच्या पाण्यासाठी एक हजार लीटरमागे ४ रुपये आणि पक्क्या पाण्यासाठी एक हजार लीटरमागे ८ रुपये ठाणे महापालिका मोजत आहे. याचाच अर्थ एक दशलक्ष लीटरमागे ८ हजार याप्रमाणे ३५ दशलक्ष लीटरमागे दिवसाला २ लाख ८० हजार आणि वर्षाकाठी ही रक्कम १० कोटी २२ लाख एवढी होत आहे.मुंबई महापालिकेने यात ५0 टक्के वाढ सुचविली असल्याने ठाणे महापालिकेला १ हजार लीटरमागे १२ रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे एक दशलक्ष लीटरमागे १२ हजार आणि ३५ दशलक्ष लीटरमागे ४ लाख २० हजार रुपये दिवसाला मोजावे लागणार आहे.सामान्य ठाणेकरांवर बोजा नाहीदरवाढीमुळे मुंबई महापालिकेला वाढीव उत्पन्न मिळणार असले तरी ठाणे महापालिकेला मात्र हा वाढीव भुर्दंड सहन करावा लागणार आहे.मुंबई महापालिकेने जरी ही दरवाढ सुचविली असली तरी त्यासंदर्भातील पत्र अद्यापही ठाणे महापालिकेला प्राप्त झालेले नाही.मुंबई महापालिकेचे पत्र प्राप्त झाले तरी यासंदर्भात आयुक्तांबरोबर चर्चा करुनच पुढील निर्णय घेतला जाईल अशी माहिती ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली. या दरवाढीचा भूर्दंड सामान्य ठाणेकरांवर पडू देणार नसल्याचेही पालिका सूत्रांनी स्पष्ट केले.मुंबई महापालिकेकडून होणारा ६५ दशलक्ष लीटर पाणी पुरवठा हा ठाण्यातील कोपरी, गावदेवी, टेकडी बंगला आदी भागात होत आहे. आधी ६० दशलक्ष लीटर पाणी पुरवठा होत होता. त्यात नुकतीच पाच दशलक्ष लीटरची वाढ झालेली आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाWaterपाणी