शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

पाणी दरवाढीचा ठामपावर वार्षिक पाच कोटींचा भुर्दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 00:15 IST

५0 टक्के दरवाढ; मुंबई महापालिकेकडून अद्याप पत्रव्यवहार नाही

- अजित मांडके ठाणे : एकीकडे ठाणे महापालिकेने प्रती चौरस फुटाप्रमाणे पाणी बिलांची वसुली सुरु केली असून, येत्या काही महिन्यांत नळांना मीटरही लावले जाणार आहेत. त्यामुळे ठाणेकरांना अतिरिक्त भूर्दंड सोसावा लागण्याची शक्यता आहे. त्यात ठाण्याच्या भरवशावर तहान भागवणाऱ्या मुंबई महापालिकेने आता ठाण्यालाच केल्या जाणाºया पाणी पुरवठ्याच्या दरात ५० टक्के वाढ सुचविली आहे. यासंदर्भातील पत्र अद्याप ठाणे महापालिकेला प्राप्त झालेले नाही. परंतु या दरवाढीतून मुंबई महापालिकेला वार्षिक नफा वाढून मिळणार असला तरी ठाणेकरांना वार्षिक ५ कोटी ११ लाखांचा वाढीव बोजा सहन करावा लागणार आहे.मुंबई महापालिकेने १५ वर्षानंतर ही दरवाढ प्रस्तावित केली आहे. त्यानुसार सध्याच्या पाणी दरात ५० टक्के वाढ सुचविली आहे. ठाणे महापालिका सध्या विविध स्त्रोतांकडून ४८५ दशलक्ष लीटर पाणी उचलत आहे. त्यानुसार स्टेमकडून प्रती हजार लीटरमागे ९.५० रुपये, एमआयडीसीकडून प्रती हजार लीटरमागे ९.०० रुपये, तर स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेतून ४ रुपये दराने पाणी उचलत आहे. मुंबई महापालिकेकडून ठाणे शहराला ३० दशलक्ष लीटर कच्चे (प्रक्रिया न केलेले) पाणी आणि ३५ दशलक्ष लीटर पक्के (प्रक्रिया केलेले) पाणी पुरविले जात आहे. त्यानुसार ही वाढ पक्या पाण्यावर करण्याचे निश्चित केल्याची माहिती महापालिकेतील सुत्रांनी दिली. मुंबई महापालिकेडून होणाºया कच्या पाण्यासाठी एक हजार लीटरमागे ४ रुपये आणि पक्क्या पाण्यासाठी एक हजार लीटरमागे ८ रुपये ठाणे महापालिका मोजत आहे. याचाच अर्थ एक दशलक्ष लीटरमागे ८ हजार याप्रमाणे ३५ दशलक्ष लीटरमागे दिवसाला २ लाख ८० हजार आणि वर्षाकाठी ही रक्कम १० कोटी २२ लाख एवढी होत आहे.मुंबई महापालिकेने यात ५0 टक्के वाढ सुचविली असल्याने ठाणे महापालिकेला १ हजार लीटरमागे १२ रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे एक दशलक्ष लीटरमागे १२ हजार आणि ३५ दशलक्ष लीटरमागे ४ लाख २० हजार रुपये दिवसाला मोजावे लागणार आहे.सामान्य ठाणेकरांवर बोजा नाहीदरवाढीमुळे मुंबई महापालिकेला वाढीव उत्पन्न मिळणार असले तरी ठाणे महापालिकेला मात्र हा वाढीव भुर्दंड सहन करावा लागणार आहे.मुंबई महापालिकेने जरी ही दरवाढ सुचविली असली तरी त्यासंदर्भातील पत्र अद्यापही ठाणे महापालिकेला प्राप्त झालेले नाही.मुंबई महापालिकेचे पत्र प्राप्त झाले तरी यासंदर्भात आयुक्तांबरोबर चर्चा करुनच पुढील निर्णय घेतला जाईल अशी माहिती ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली. या दरवाढीचा भूर्दंड सामान्य ठाणेकरांवर पडू देणार नसल्याचेही पालिका सूत्रांनी स्पष्ट केले.मुंबई महापालिकेकडून होणारा ६५ दशलक्ष लीटर पाणी पुरवठा हा ठाण्यातील कोपरी, गावदेवी, टेकडी बंगला आदी भागात होत आहे. आधी ६० दशलक्ष लीटर पाणी पुरवठा होत होता. त्यात नुकतीच पाच दशलक्ष लीटरची वाढ झालेली आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाWaterपाणी