शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
2
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
3
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
4
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
5
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
6
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
7
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
8
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
9
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
10
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
11
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
12
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
13
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
14
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
15
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
16
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
17
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
18
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
19
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
20
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!

पाणी दरवाढीचा ठामपावर वार्षिक पाच कोटींचा भुर्दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 00:15 IST

५0 टक्के दरवाढ; मुंबई महापालिकेकडून अद्याप पत्रव्यवहार नाही

- अजित मांडके ठाणे : एकीकडे ठाणे महापालिकेने प्रती चौरस फुटाप्रमाणे पाणी बिलांची वसुली सुरु केली असून, येत्या काही महिन्यांत नळांना मीटरही लावले जाणार आहेत. त्यामुळे ठाणेकरांना अतिरिक्त भूर्दंड सोसावा लागण्याची शक्यता आहे. त्यात ठाण्याच्या भरवशावर तहान भागवणाऱ्या मुंबई महापालिकेने आता ठाण्यालाच केल्या जाणाºया पाणी पुरवठ्याच्या दरात ५० टक्के वाढ सुचविली आहे. यासंदर्भातील पत्र अद्याप ठाणे महापालिकेला प्राप्त झालेले नाही. परंतु या दरवाढीतून मुंबई महापालिकेला वार्षिक नफा वाढून मिळणार असला तरी ठाणेकरांना वार्षिक ५ कोटी ११ लाखांचा वाढीव बोजा सहन करावा लागणार आहे.मुंबई महापालिकेने १५ वर्षानंतर ही दरवाढ प्रस्तावित केली आहे. त्यानुसार सध्याच्या पाणी दरात ५० टक्के वाढ सुचविली आहे. ठाणे महापालिका सध्या विविध स्त्रोतांकडून ४८५ दशलक्ष लीटर पाणी उचलत आहे. त्यानुसार स्टेमकडून प्रती हजार लीटरमागे ९.५० रुपये, एमआयडीसीकडून प्रती हजार लीटरमागे ९.०० रुपये, तर स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेतून ४ रुपये दराने पाणी उचलत आहे. मुंबई महापालिकेकडून ठाणे शहराला ३० दशलक्ष लीटर कच्चे (प्रक्रिया न केलेले) पाणी आणि ३५ दशलक्ष लीटर पक्के (प्रक्रिया केलेले) पाणी पुरविले जात आहे. त्यानुसार ही वाढ पक्या पाण्यावर करण्याचे निश्चित केल्याची माहिती महापालिकेतील सुत्रांनी दिली. मुंबई महापालिकेडून होणाºया कच्या पाण्यासाठी एक हजार लीटरमागे ४ रुपये आणि पक्क्या पाण्यासाठी एक हजार लीटरमागे ८ रुपये ठाणे महापालिका मोजत आहे. याचाच अर्थ एक दशलक्ष लीटरमागे ८ हजार याप्रमाणे ३५ दशलक्ष लीटरमागे दिवसाला २ लाख ८० हजार आणि वर्षाकाठी ही रक्कम १० कोटी २२ लाख एवढी होत आहे.मुंबई महापालिकेने यात ५0 टक्के वाढ सुचविली असल्याने ठाणे महापालिकेला १ हजार लीटरमागे १२ रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे एक दशलक्ष लीटरमागे १२ हजार आणि ३५ दशलक्ष लीटरमागे ४ लाख २० हजार रुपये दिवसाला मोजावे लागणार आहे.सामान्य ठाणेकरांवर बोजा नाहीदरवाढीमुळे मुंबई महापालिकेला वाढीव उत्पन्न मिळणार असले तरी ठाणे महापालिकेला मात्र हा वाढीव भुर्दंड सहन करावा लागणार आहे.मुंबई महापालिकेने जरी ही दरवाढ सुचविली असली तरी त्यासंदर्भातील पत्र अद्यापही ठाणे महापालिकेला प्राप्त झालेले नाही.मुंबई महापालिकेचे पत्र प्राप्त झाले तरी यासंदर्भात आयुक्तांबरोबर चर्चा करुनच पुढील निर्णय घेतला जाईल अशी माहिती ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली. या दरवाढीचा भूर्दंड सामान्य ठाणेकरांवर पडू देणार नसल्याचेही पालिका सूत्रांनी स्पष्ट केले.मुंबई महापालिकेकडून होणारा ६५ दशलक्ष लीटर पाणी पुरवठा हा ठाण्यातील कोपरी, गावदेवी, टेकडी बंगला आदी भागात होत आहे. आधी ६० दशलक्ष लीटर पाणी पुरवठा होत होता. त्यात नुकतीच पाच दशलक्ष लीटरची वाढ झालेली आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाWaterपाणी