पहिले संक्रमण शिबिर जमीनदोस्त?
By Admin | Updated: September 9, 2016 02:54 IST2016-09-09T02:54:09+5:302016-09-09T02:54:09+5:30
ठाणे शहरात घडणाऱ्या इमारत किंवा नैसर्गिक आपत्तीच्या दुर्घटनेत बेघर झालेल्यांना तात्पुरता निवारा मिळावा, यासाठी ठाणे महापालिकेने बांधलेले पहिले संक्रमण शिबिर

पहिले संक्रमण शिबिर जमीनदोस्त?
घोडबंदर : ठाणे शहरात घडणाऱ्या इमारत किंवा नैसर्गिक आपत्तीच्या दुर्घटनेत बेघर झालेल्यांना तात्पुरता निवारा मिळावा, यासाठी ठाणे महापालिकेने बांधलेले पहिले संक्रमण शिबिर आता काळाच्या पडद्याआड जाणार आहे. तळ अधिक दोन मजल्यांच्या असलेल्या या इमारती धोकादायक घोषित केल्याने तेथे नव्याने बीएसयूपी योजनेतून चार इमारती बांधल्या जाणार आहेत. नवीन इमारतींत जवळपास ५०० घरे महापालिकेकडे उपलब्ध होऊ शकणार आहेत. त्यामुळे मनपाच्या विकासात बाधित होणाऱ्यांचे या जागेत पुनर्वसन करण्याचा मार्ग मोकळा केला जाणार आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात नगरपालिका काळापासून आणि मागील १५ ते २० वर्षांत अनेक बेकायदा इमारती बांधल्या गेल्या आहेत. आजच्या स्थितीत सुमारे ८० टक्के अनधिकृत बांधकामे झाल्याचे चित्र आहे. तसेच या बांधकामांपैकी असंख्य इमारतींचे बांधकाम निकृष्ट झाल्यामुळे शेकडो इमारती धोकादायक आणि अतिधोकादायक घोषित केल्या आहेत. अशा धोकादायक इमारती कोसळून अनेकांना प्राण गमवावे लागले आहे. तसेच बेघर झालेल्या कुटुंबांना तात्पुरता निवारा देण्याचे काम पालिकेला करावे लागले आहे. १९९७ मध्ये किसननगरमधील साईराज इमारत दुर्घटनेतील १७ बेघर कुटुंबे तेव्हापासून तुळशीधाम येथील संक्र मण शिबिरात राहतात. १५० घरे असलेल्या या संक्र मण शिबिरातील काही इमारती अनेक वर्षांपासून वाईट स्थितीत रिकाम्या होत्या. त्यांचा वापर बेकायदा राहण्यासाठी केल्याचे दिसून आल्यावर ती घरे सील केली गेली होती.