शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

ठाणेकरांचं जीवन गॅसवर? आगीच्या घटनांमध्ये सात वर्षांत दुप्पट वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 23:45 IST

शहराची आजची लोकसंख्या २३ लाखांच्या घरात आहे. लोकसंख्येच्या मानाने आजघडीला १४ अग्निशमन केंद्रांची आवश्यकता असताना शहरात केवळ सात केंद्रे आहेत.

ठाणे : वाढती लोकसंख्या आणि वाढत्या शहरीकरणाबरोबरच ठाणे शहरात मागील सात वर्षांत आगीच्या घटनांमध्येही तिपटीने वाढ झाली आहे. २०१३ मध्ये शहरात ३३२ आगीच्या घटना घडल्या होत्या. २०१८ मध्ये तब्बल ८४२ घटना घडल्या, तर २०१९ मध्ये आगीच्या ७८२ घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे एकीकडे आगीबाबत विविध सोसायट्यांना प्रशिक्षण दिले जात असल्याचा दावा केला जात आहे. परंतु, असे असतानाही या वाढत्या घटनांमध्ये ठाणे आता आगी लागण्याचे केंद्र बनते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.

शहराची आजची लोकसंख्या २३ लाखांच्या घरात आहे. लोकसंख्येच्या मानाने आजघडीला १४ अग्निशमन केंद्रांची आवश्यकता असताना शहरात केवळ सात केंद्रे आहेत. तर, लोकसंख्येच्या मानाने या अग्निशमन केंद्रांसाठी ४३५ जणांचा स्टाफ आवश्यक असतानादेखील ३४० अधिकारी, कर्मचारी आहेत. पर्यवेक्षक, तांडेल, वाहनचालक आणि फायरमन यांची कित्येक पदे रिक्त आहेत. एका अग्निशमन केंद्रासाठी तीन पाळ्यांमध्ये ३२ अधिक सहा असे ३८ कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ आवश्यक आहे. परंतु, सध्या प्रत्येक केंद्रावर मनुष्यबळाची वानवा आहे.असे असताना २०१३ पासून ते आजघडीला शहराची लोकसंख्याही वेगाने वाढत आहे. वाहनांची संख्याही वेगाने वाढत आहे. परंतु, शहराचा आवाका वाढत नाही. मात्र, आगीच्या घटना वेगाने वाढत आहेत. नव्या इमारतींना एनओसी देताना दोन जिन्यांची गरज आवश्यक केली आहे. परंतु, त्याची योग्य ती दखल घेतली जाते का? हादेखील प्रश्न आहे.ठाणे शहरात २०१३ मध्ये आगीच्या ३३२ घटना घडल्या आहेत. २०१४ मध्ये त्यात वाढ होऊन त्यांची संख्या ५०४ एवढी झाली. तर, २०१५ मध्ये ५१३ तसेच २०१६ मध्ये मात्र आगीच्या घटनांमध्ये घट झाल्याचे दिसून आले. या वर्षभराच्या कालावधीत ३९५ आगीच्या घटना घडल्या आहेत. तर, २०१७ मध्ये पुन्हा वाढ झाल्याचे दिसून आले आहे. या कालावधीत ६०४, सन २०१८ मध्ये ८४२ तर २०१९ मध्ये आगीच्या घटनांमध्ये काहीशी घट होऊन ही संख्या ७८२ एवढी दिसून आली आहे.

टॅग्स :fireआग