शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेकरांचं जीवन गॅसवर? आगीच्या घटनांमध्ये सात वर्षांत दुप्पट वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 23:45 IST

शहराची आजची लोकसंख्या २३ लाखांच्या घरात आहे. लोकसंख्येच्या मानाने आजघडीला १४ अग्निशमन केंद्रांची आवश्यकता असताना शहरात केवळ सात केंद्रे आहेत.

ठाणे : वाढती लोकसंख्या आणि वाढत्या शहरीकरणाबरोबरच ठाणे शहरात मागील सात वर्षांत आगीच्या घटनांमध्येही तिपटीने वाढ झाली आहे. २०१३ मध्ये शहरात ३३२ आगीच्या घटना घडल्या होत्या. २०१८ मध्ये तब्बल ८४२ घटना घडल्या, तर २०१९ मध्ये आगीच्या ७८२ घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे एकीकडे आगीबाबत विविध सोसायट्यांना प्रशिक्षण दिले जात असल्याचा दावा केला जात आहे. परंतु, असे असतानाही या वाढत्या घटनांमध्ये ठाणे आता आगी लागण्याचे केंद्र बनते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.

शहराची आजची लोकसंख्या २३ लाखांच्या घरात आहे. लोकसंख्येच्या मानाने आजघडीला १४ अग्निशमन केंद्रांची आवश्यकता असताना शहरात केवळ सात केंद्रे आहेत. तर, लोकसंख्येच्या मानाने या अग्निशमन केंद्रांसाठी ४३५ जणांचा स्टाफ आवश्यक असतानादेखील ३४० अधिकारी, कर्मचारी आहेत. पर्यवेक्षक, तांडेल, वाहनचालक आणि फायरमन यांची कित्येक पदे रिक्त आहेत. एका अग्निशमन केंद्रासाठी तीन पाळ्यांमध्ये ३२ अधिक सहा असे ३८ कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ आवश्यक आहे. परंतु, सध्या प्रत्येक केंद्रावर मनुष्यबळाची वानवा आहे.असे असताना २०१३ पासून ते आजघडीला शहराची लोकसंख्याही वेगाने वाढत आहे. वाहनांची संख्याही वेगाने वाढत आहे. परंतु, शहराचा आवाका वाढत नाही. मात्र, आगीच्या घटना वेगाने वाढत आहेत. नव्या इमारतींना एनओसी देताना दोन जिन्यांची गरज आवश्यक केली आहे. परंतु, त्याची योग्य ती दखल घेतली जाते का? हादेखील प्रश्न आहे.ठाणे शहरात २०१३ मध्ये आगीच्या ३३२ घटना घडल्या आहेत. २०१४ मध्ये त्यात वाढ होऊन त्यांची संख्या ५०४ एवढी झाली. तर, २०१५ मध्ये ५१३ तसेच २०१६ मध्ये मात्र आगीच्या घटनांमध्ये घट झाल्याचे दिसून आले. या वर्षभराच्या कालावधीत ३९५ आगीच्या घटना घडल्या आहेत. तर, २०१७ मध्ये पुन्हा वाढ झाल्याचे दिसून आले आहे. या कालावधीत ६०४, सन २०१८ मध्ये ८४२ तर २०१९ मध्ये आगीच्या घटनांमध्ये काहीशी घट होऊन ही संख्या ७८२ एवढी दिसून आली आहे.

टॅग्स :fireआग