शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
3
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
4
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
5
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
6
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
7
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
8
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
9
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
10
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
11
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
12
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
14
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

अग्निरोधक यंत्रांची मुदत संपूनही डोळेझाक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 12:15 AM

मीरा-भाईंदर महापालिका मुख्यालयासह पालिका शाळा व नगरभवनमधील अग्निरोधक यंत्रांची मुदत गेल्या वर्षी संपूनही पालिकेने त्याकडे डोळेझाक चालवल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे.

मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिका मुख्यालयासह पालिका शाळा व नगरभवनमधील अग्निरोधक यंत्रांची मुदत गेल्या वर्षी संपूनही पालिकेने त्याकडे डोळेझाक चालवल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. विद्यार्थ्यांसह नागरिक व पालिका कर्मचाऱ्यांची सुरक्षाच रामभरोसे आहे. मीरा-भाईंदर महापालिकेकडून सामान्य नागरिकांच्या गृहनिर्माण संस्थांसह शाळा, विविध आस्थापनांना अग्निशामक यंत्रणा बसवण्याचे उपदेश देत असते. अग्निशामक यंत्रणा बसवणे बंधनकारक असताना त्याची काटेकोर अंमलबजावणीच केली जात नाही. त्यातच, आता महापालिका मुख्यालयासह पालिकेच्या ३६ शाळा, नगरभवन येथील कार्यालये व सभागृह आदी ठिकाणी लावलेल्या अग्निरोधक यंत्रांची मुदत गेल्यावर्षीच संपली आहे. मुख्यालयासह नगरभवनमध्ये पालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांची दालने आहेत.सामान्य नागरिक, लोकप्रतिनिधीही मोठ्या संख्येने येत असतात. तर पालिका शाळांमध्ये पहिली ते आठवीचे विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारीवर्ग असतो. मुख्यालय व नगरभवनमध्ये अग्निरोधक यंत्रांसह अग्निशमन यंत्रणा आहे. पण, शाळांमध्ये केवळ अग्निरोधक यंत्रांवरच सुरक्षेची भिस्त आहे.अग्निरोधक यंत्रांची मुदत गेल्या वर्षीच संपल्याने आग लागल्यास ती कूचकामी ठरणार आहेत. त्यामुळे आपत्कालीन स्थितीत आग शमवण्यासाठी यंत्रच नसल्याने अनर्थ होण्याची भीती आहे. गंभीर बाब म्हणजे गेल्या वर्षी मुदत संपलेली असतानाही पालिका प्रशासनाने आजतागायत त्याकडे डोळेझाक केली आहे.>गेल्या वर्षी अग्निरोधक यंत्रांची मुदत संपूनही पालिकेने अजूनही ते रिफिलिंग न करणे गंभीर बाब आहे. पालिकाच नियमांचे पालन करत नाही, हे पुन्हा स्पष्ट झाले आहे. त्यांना नागरिकांच्या सुरक्षिततेचे काही पडलेले नाही.- डॉ. जितेंद्र जोशी, नागरिक