शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

प्रभात फिल्म सोसायटीचे संस्थापक चित्रपट अभ्यासक सुधीर नांदगावकर यांचे निधन

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: January 1, 2023 17:52 IST

प्रभात फिल्म सोसायटीचे संस्थापक, चित्रपट अभ्यासक सुधीर नांदगावकर यांचे दुपारी तीनच्या सुमारास प्रदीर्घ आजाराने निधन झाले.

ठाणे : प्रभात फिल्म सोसायटीचे संस्थापक, चित्रपट अभ्यासक सुधीर नांदगावकर यांचे दुपारी तीनच्या सुमारास प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. माजीवडा येथे ते वास्तव्यास होते, मुलगी, मुले सुना, जावई, पत्नी, नातवंडे आहेत. गेले ५६ वर्षे प्रभात फिल्म सोसायटीचे काम पाहत होते. बऱ्याच फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. मामी फेस्टिव्हल हा नांदगावकर यांच्या संकल्पनेतून उभा राहीला होता.

नाटकाचे वेड असलेल्‍या महाराष्‍ट्रात सिनेमासारखी नवी विज्ञानाधिष्ठित कला रुजवण्‍याचे खडतर काम सुधीर नांदगावकरने केले. त्याने महाराष्‍ट्रात आणि भारतातही फिल्‍म सोसायटीची चळवळ पसरवली. नांदगावकरचा प्रवास छापील माध्‍यमाकडून दृकश्राव्य माध्‍यमाकडे असा झालेला दिसतो.

नांदगावकर हा साहित्यशास्त्राचा विद्यार्थी, तो मराठी घेऊन एम.ए. झाला. अनंत काणेकर, रमेश तेंडुलकर अशा प्राध्यापकगणांच्या संगतीत वाढला. त्‍याला कवितांची विशेष आवड होती. त्याने काही काळ मुंबईच्या पोद्दार कॉलेज मध्ये मराठी विषय शिकवलादेखील, पण त्या काळी सारा सांस्कृतिक माहोल बदलत होता. नव्या विचारांची व त्याचबरोबर नव्या कलांची समजूत समाजात पसरत होती, त्या टप्प्यावर नांदगावकर सिनेमाकडे, माध्यम म्हणून खेचला गेला. भारतदेश तसा सिनेमावेडा 1930 नंतर (बोलपट अवतरल्यानंतर) झाला होताच. स्वातंत्र्योत्तर, ते खूळ वाढतच गेले. पोटाला मिळाले नाही तरी लोक झुंडीने सिनेमा थिएटरांत जात होते.

भारतात सिनेमाने असे व्यसनाचे स्वरूप धारण केले असताना जगात सिनेमा माध्यमातील कलात्मकता शोधण्याचे प्रयोग चालू होते आणि ते नांदगावकरची पिढी वयात आली तोवर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, फिल्म सोसायटी चळवळ अशा व्यासपीठांमार्फत भारतात येऊन पोचले होते. नांदगावकर ‘फिल्म फोरम’ या संस्थेचा सभासद बनला तो 1964-65 च्या सुमारास. तेथे तो जागतिक सिनेमा पाहून प्रभावित झाला आणि त्याच्या पुढाकाराने 5 जुलै 1968 रोजी प्रभात चित्र मंडळाची स्थापना झाली. नांदगावकर म्हणतो, की ‘प्रभात’ स्थापन करण्यामागे दोन हेतू होते: एक- फिल्म सोसायटी चळवळ दक्षिण मुंबईत केंद्रित झाली होती, ती उपनगरांत आणायची आणि दुसरा हेतू म्हणजे मराठी माणसांना चांगल्या सिनेमाची, या माध्यमातील ‘कले’ची जाण करून द्यायची.

प्रभात चित्र मंडळ अव्याहत चालू आहे. नांदगावकरने दोन्ही हेतू साधण्यासाठी परोपरीने प्रयत्न केले, पण त्याची खंत अशी, की मराठी समाज काही त्याच्या प्रयत्नांना बधला नाही. तो आपल्या डबक्यातील साहित्यकलेत खुळावून राहिला. टेलिव्हिजनचे माध्यम आल्यानंतर तर तो त्यात अधिकच रमून गेला! ‘प्रभात’ने जुने भारतीय-मराठी अभिजात सिनेमा दाखवले, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भरवले, वेगवेगळ्या देशांच्या उत्तमोत्तम चित्रपटकृती आणवत त्यांचे प्रदर्शन घडवले, भारतीय समांतर सिनेमाची माहिती करून दिली, चित्रपटविषयक चर्चा घडवून आणल्या, ‘प्रभात’च्या या कार्यक्रमांचा कर्ता असे तो नांदगावकर. कार्यक्रमांना प्रेक्षक-श्रोत्यांची गर्दी होई, परंतु त्यांमुळे त्यांची उत्सुकता, जिज्ञासा वाढल्याचे आढळून आले नाही.

टॅग्स :thaneठाणे