शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

चार कोटींचा निधी परत जाण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 1:11 AM

विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याची तक्रार नगरसेवकांकडून सुरू असते. परंतु जिल्ह्यातील दोन नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निष्काळजी व दुर्लक्षितपणामुळे सुमारे चार कोटींचा निधी पडून आहे.

- सुरेश लोखंडेठाणे : विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याची तक्रार नगरसेवकांकडून सुरू असते. परंतु जिल्ह्यातील दोन नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निष्काळजी व दुर्लक्षितपणामुळे सुमारे चार कोटींचा निधी पडून आहे. मागणी व कामांचे प्रस्ताव प्राप्त नसल्यामुळे तो यंदाही परत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.जिल्ह्यात अंबरनाथ नगरपालिका असून कुळगाव-बदलापूर नगर परिषद आहे. याशिवाय, मुरबाड आणि शहापूर नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील विकासकामांसाठी जिल्हा नियोजन समितीकडे सुमारे १२ कोटींचा निधी आहे. त्याचे तीन टप्प्यांत वाटप होण्याची अपेक्षा आहे. त्यातील शेवटच्या टप्प्याच्या सुमारे चार कोटींच्या मागणीसाठी संबंधित नगरपालिका, नगर परिषद व नगरपंचायतींकडून अद्याप विकासकामांचे प्रस्ताव आलेले नसल्याची गंभीर बाब नियोजन समितीच्या (डीपीसी) बैठकीस उघड झाली आहे. यामुळे यंदाही हा निधी परत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.या टप्प्यातील सुमारे चार कोटी रुपयांचे वितरण करण्यासाठी प्रशासन तत्पर असल्याची बाब डीपीसीच्या बैठकीत उघड झाली. पण, मार्चअखेरपर्यंत नगरपालिका, नगर परिषदांच्या प्रशासनाकडून प्रस्ताव येणे शक्य नाही. या निष्काळजीमुळे राखीव १२ कोटींमधील वितरित होणाऱ्या आठ कोटींपैकी चार कोटी वाटप झाले. उर्वरित चार कोटी रुपये मात्र अद्याप पडून आहेत. नगरोत्थानाच्या नावाखाली डीपीसीद्वारे दिल्या जाणाºया या निधीची मागणी चार कोटी याप्रमाणे तीन टप्प्यांत होणे अपेक्षित आहे. गेल्या वर्षापासून हा निधी नगरपालिका, नगरपंचायतींना मिळत आहे. नावीन्यपूर्णसारख्या नवीन योजना राबवण्यासाठी हा निधी दोन वर्षांपासून राखीव ठेवला जातो. मागील वर्षाचा निधीदेखील मार्चनंतर शासनजमा झाल्याचे निदर्शनास आले. यंदाही सुमारे चार कोटी रुपये संबंधित नगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शासनजमा होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.>कामे मंजूर, निविदा नाही!नगरपालिका, नगरपंचायतींसाठी सुमारे १२ वर्षांपासून हेड तयार करण्यात आले होते. त्यात केवळ हजार रुपये जमा होत असत. पण, आता नगरोत्थानाच्या नावे दोन वर्षांपासून १२ कोटी रुपये ठेवले जात आहेत.पण, या निधीची मागणी होत नसल्याची खंत जिल्हा नियोजन अधिकारी खंडारे यांनी डीपीसी सभागृहात व्यक्त केली. या निधीतून मागील वर्षी कामे मंजूर केली, पण या कामांच्या निविदा संंबंधित नगरपालिकांच्या प्रशासनाने काढल्याच नाहीत. यामुळे निधी खर्च झाला नाही. यावर्षीदेखील १२ कोटी ठेवण्यात आले.त्यातील आठ कोटी द्यायचे आहेत. त्यातील चार कोटी दिले, पण उर्वरित चार कोटी शासनजमा होण्यापूर्वी प्रस्ताव पाठवण्याची अपेक्षा आहे. यंदाच्या नियोजनात मिळणाºया वाढीव निधीतून आवश्यक ठिकाणी फायर ब्रिगेडसाठी निधी देण्याची चर्चा डीपीसीत झाली आहे.