शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

वरसावे नाका ते काजूपाडापर्यंतचा घोडबंदर मार्ग पाण्याखाली जाण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:30 IST

मीरा रोड : इकोसेन्सेटिव्ह झोन असूनदेखील नदी व नैसर्गिक ओढ्यात तसेच परिसरात प्रचंड प्रमाणात झालेल्या भरावामुळे वरसावे नाका ...

मीरा रोड : इकोसेन्सेटिव्ह झोन असूनदेखील नदी व नैसर्गिक ओढ्यात तसेच परिसरात प्रचंड प्रमाणात झालेल्या भरावामुळे वरसावे नाका ते काजूपाडादरम्यानच्या घोडबंदर महामार्गावर यंदासुद्धा पावसाळ्यात पाणी साचून रस्ता बंद होण्याची भीती आहे. वाहतूक पोलिसांनी ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह या भागाची पाहणी केली; परंतु मीरा भाईंदर महापालिकेने या पाहणीकडे पाठ फिरवत समस्येबाबत गांभीर्य दाखवले नाही.

वरसावे ते चेणे परिसरात लगतच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याचे लोंढे खाली वाहून येतात. हा परिसर इकोसेन्सेटिव्ह झोन आहे. वरसावे येथील अनुहा लॉजजवळच्या परिसरात प्रचंड प्रमाणात भराव करण्यात आला आहे. येथून महामार्गाच्या खालून जाणारी नैसर्गिक उपखाडी तर भराव करून अतिशय अरुंद केली असून, महापालिकेने तर चक्क काँक्रिटचे बांधकाम करून टाकले आहे.

एक्स्प्रेस इन हॉटेलजवळून जाणारा नैसर्गिक पाण्याचा प्रवाहसुद्धा नावापुरताच उरला आहे. येथील सीएन रॉक हॉटेल परिसरात मातीचा प्रचंड भराव झाला आहे. चेणे येथील लक्ष्मी नदीपात्रातच प्रचंड भराव करून नदीचे पात्र अरुंद बनले आहे. शिवाय परिसरातसुद्धा मोठ्या प्रमाणात भराव झालेले आहेत. इकोसेन्सेटिव्ह झोन तसेच नदी व ओढे आणि परिसरात गेल्या काही वर्षात झालेल्या प्रचंड भरावामुळे पावसाळ्यात येथील घोडबंदर महामार्ग पाण्याखाली जातो. महामार्गावरील वाहतूक ठप्प होते. तसेच चेणे गावात पूर येतो.

स्थानिक ग्रामस्थ आणि आदिवासी पाड्यातील रहिवाशांनी या भरावा विरोधात तक्रारी केल्या असल्या तरी त्यांना कोणी दाद देत नाही. येथील अजय पाठक यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने आदेश देऊनदेखील महापालिकेने अजून काही कारवाई केलेली नाही.

घोडबंदर महामार्ग पाण्याखाली जात असल्याने त्यावर उपाययोजना करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी महापालिकेस पत्र दिले होते; परंतु पालिकेने सदर रस्ता शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने त्यांच्याशी संपर्क करण्याचे वाहतूक शाखेला कळवले. त्याअनुषंगाने वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक रमेश भामे, उपनिरीक्षक एम. जी. पाटील यांच्यासह ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे वरसावे नाका ते काजूपाडा भागाची पाहणी केली. यावेळी पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील यावर चर्चा झाली. या दौऱ्यानंतर आवश्यक पावले उचलली जाणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.