शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ दहशतवादी हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचा मोठा गौप्यस्फोट; पाकिस्तानवर सैन्य कारवाई का नाही?
2
कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
3
"या योजनेचं आम्ही स्वागत करतो"; ट्रम्प यांच्या 'गाझा शांतता योजने'वर PM मोदींनी काय मांडली भूमिका?
4
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
5
या स्वस्त सात सीटर कारला मिळाले फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग; मारुती अर्टिगापेक्षा खूपच सुरक्षित, भारत एनकॅपमध्ये चाचणी...
6
ईव्हीचा 'सायलेंट धोका' संपणार! इलेक्ट्रिक वाहनांसाठी AVAS ध्वनी प्रणाली अनिवार्य होणार? काय आहे प्रकार?
7
मंजूचा मृतदेह बेडवर, तर पतीचा लटकलेला; रात्री खोलीत दोघांचे मृतदेह पाहून वडील हादरले
8
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निफ्टी ८० अंकांनी वधारला, मेटल-आयटी शेअर्समध्ये जोरदार खरेदी
10
October Baby Astro: कसे असतात ऑक्टोबरमध्ये जन्माला आलेले लोक? स्वभाव, गुण, दोष; सगळंच जाणून घ्या
11
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
12
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
14
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
15
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
16
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
17
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
18
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
19
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
20
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?

वरसावे नाका ते काजूपाडापर्यंतचा घोडबंदर मार्ग पाण्याखाली जाण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:30 IST

मीरा रोड : इकोसेन्सेटिव्ह झोन असूनदेखील नदी व नैसर्गिक ओढ्यात तसेच परिसरात प्रचंड प्रमाणात झालेल्या भरावामुळे वरसावे नाका ...

मीरा रोड : इकोसेन्सेटिव्ह झोन असूनदेखील नदी व नैसर्गिक ओढ्यात तसेच परिसरात प्रचंड प्रमाणात झालेल्या भरावामुळे वरसावे नाका ते काजूपाडादरम्यानच्या घोडबंदर महामार्गावर यंदासुद्धा पावसाळ्यात पाणी साचून रस्ता बंद होण्याची भीती आहे. वाहतूक पोलिसांनी ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह या भागाची पाहणी केली; परंतु मीरा भाईंदर महापालिकेने या पाहणीकडे पाठ फिरवत समस्येबाबत गांभीर्य दाखवले नाही.

वरसावे ते चेणे परिसरात लगतच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याचे लोंढे खाली वाहून येतात. हा परिसर इकोसेन्सेटिव्ह झोन आहे. वरसावे येथील अनुहा लॉजजवळच्या परिसरात प्रचंड प्रमाणात भराव करण्यात आला आहे. येथून महामार्गाच्या खालून जाणारी नैसर्गिक उपखाडी तर भराव करून अतिशय अरुंद केली असून, महापालिकेने तर चक्क काँक्रिटचे बांधकाम करून टाकले आहे.

एक्स्प्रेस इन हॉटेलजवळून जाणारा नैसर्गिक पाण्याचा प्रवाहसुद्धा नावापुरताच उरला आहे. येथील सीएन रॉक हॉटेल परिसरात मातीचा प्रचंड भराव झाला आहे. चेणे येथील लक्ष्मी नदीपात्रातच प्रचंड भराव करून नदीचे पात्र अरुंद बनले आहे. शिवाय परिसरातसुद्धा मोठ्या प्रमाणात भराव झालेले आहेत. इकोसेन्सेटिव्ह झोन तसेच नदी व ओढे आणि परिसरात गेल्या काही वर्षात झालेल्या प्रचंड भरावामुळे पावसाळ्यात येथील घोडबंदर महामार्ग पाण्याखाली जातो. महामार्गावरील वाहतूक ठप्प होते. तसेच चेणे गावात पूर येतो.

स्थानिक ग्रामस्थ आणि आदिवासी पाड्यातील रहिवाशांनी या भरावा विरोधात तक्रारी केल्या असल्या तरी त्यांना कोणी दाद देत नाही. येथील अजय पाठक यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने आदेश देऊनदेखील महापालिकेने अजून काही कारवाई केलेली नाही.

घोडबंदर महामार्ग पाण्याखाली जात असल्याने त्यावर उपाययोजना करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी महापालिकेस पत्र दिले होते; परंतु पालिकेने सदर रस्ता शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने त्यांच्याशी संपर्क करण्याचे वाहतूक शाखेला कळवले. त्याअनुषंगाने वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक रमेश भामे, उपनिरीक्षक एम. जी. पाटील यांच्यासह ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे वरसावे नाका ते काजूपाडा भागाची पाहणी केली. यावेळी पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील यावर चर्चा झाली. या दौऱ्यानंतर आवश्यक पावले उचलली जाणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.